शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

घोटसूरवासीयांना जाण्यासाठी मार्गच नाही

By admin | Updated: September 20, 2014 23:49 IST

गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे घोटसूर येथील माजी मालगुजारी तलाव फुटला. यामुळे गावात जाणारा रस्ता पूर्णत: वाहून गेला. रस्ता बांधण्याबाबत नागरिकांनी प्रशासनाकडे लेखी निवेदनाद्वारे पाठपुरावा केला

एटापल्ली : गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे घोटसूर येथील माजी मालगुजारी तलाव फुटला. यामुळे गावात जाणारा रस्ता पूर्णत: वाहून गेला. रस्ता बांधण्याबाबत नागरिकांनी प्रशासनाकडे लेखी निवेदनाद्वारे पाठपुरावा केला. मात्र प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे वर्षभरापासून घोटसूरवासीयांना गावात जाण्यासाठी रस्ताच उरला नाही. यामुळे नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. गतवर्षीच्या दमदार पावसामुळे घोटसूरचा तलाव फुटला. यामुळे तलावालगतचा गावात जाणारा रस्ता पाण्याने वाहून गेला. वर्षभरापासून या रस्त्याची दुरूस्ती करण्यात न आल्याने गावातील नागरिक या मार्गावर लाकडे टाकून जीवघेणा प्रवास करीत आहेत. घोटसूर हे गाव कसनसूरवरून १ किमी अंतरावर आहे. घोटसूरवरूनच मानेवाडा, गुंजम, भुमकान, कारका (बु.) आदी गावांना जावे लागते. कसनसूरवरून घोटसूरला जाण्याकरीता मार्ग कच्च्या स्वरूपाचा आहे. मागील वर्षी तलाव फुटून रस्ता वाहून गेल्याने गावकऱ्यांपुढे दळणवळणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. तलावापासून घोटसूर गाव १ किमी अंतरावर आहे. उन्हाळ्यामध्ये घोटसूरला जाणे शक्य होते. मात्र यंदाच्या पावसाळ्यात या गावात मोठे जीकरीचे झाले आहे. सदर मार्गाची दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी घोटसूरवासीयांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)