शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
2
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
3
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
4
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
5
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
6
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
7
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
8
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
9
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
10
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
11
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
12
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
13
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
14
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
15
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
16
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
17
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
18
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
19
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
20
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...

जगातील सत्य बदलविण्याची ताकद कुणातच नाही

By admin | Updated: January 31, 2015 23:19 IST

सत्य म्हणजे रूचा, रूचा अर्थातच वेद होय. प्राचीन ऋषीमुनींनी लिहिलेल्या वेदामध्ये सत्य भरभरून आहे. जगातील सत्य बदलविण्याची ताकद कुणातच नाही, असे प्रतिपादन वेद अभ्यासक माणिक आबाजी गुट्टे यांनी केले.

वेदावर व्याख्यान : माणिक गुट्टे यांचे प्रतिपादनगडचिरोली : सत्य म्हणजे रूचा, रूचा अर्थातच वेद होय. प्राचीन ऋषीमुनींनी लिहिलेल्या वेदामध्ये सत्य भरभरून आहे. जगातील सत्य बदलविण्याची ताकद कुणातच नाही, असे प्रतिपादन वेद अभ्यासक माणिक आबाजी गुट्टे यांनी केले.शनिवारी संस्कृती लॉनमध्ये ‘वर्तमान वेळेस वेदची प्रासंगिकता’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अतुल विनोद गुडधे पाटील, प्रकाश अर्जुनवार, नंदकुमार काबरा, सुनिल पोरेड्डीवार, प्राचार्य कविता पोरेड्डीवार, दुधराम समर्थ, सुधा सेता, माणिक ढोले, विवेक चडगुलवार आदी उपस्थित होते. वेदाबाबत माहिती सांगताना माणिक गुट्टे म्हणाले, महर्षी व्यासाच्या ब्रह्मसूत्रातील ब्रह्मजिज्ञासा हे पहिले सूत्र आहे. ज्यांना वैराग्याची पूर्ण माहिती आहे व ज्यांचे अंत:करण व मन शुध्द आहे. तसेच लोक ब्रह्मजिज्ञासेचे अधिकारी होऊ शकतात. भारत देशात शुध्द अंत:करण असणारे अनेक साधूसंत व ऋषीमुनी खऱ्या अर्थाने ब्रह्मजिज्ञासाचे अधिकारी आहेत. मध्यंतरीच्या काळात वेदांबाबत अनेक भ्रांती म्हणजे, गैरसमज पसरविण्यात आले. ब्रह्माला जाणतात ते ब्राह्मण असतात. विकारद्वंद झाले, त्यांना शास्त्र व संस्कृतात ब्राह्मण म्हणतात. वेदाच्या संकल्पनेनुसार जातीनुसार ब्राह्मण नाही. वेदानुसार शुद्र म्हणजे, संस्कारविहिन असा संस्कृतात अर्थ आहे. वेद म्हणजे, ज्ञान असा शब्दश: अर्थ आहे, असेही गुट्टे म्हणाले.भारतीय दर्शनामध्ये ज्ञानाचे विभाजन दोन प्रकरणात केले आहे. पहिले प्रकार म्हणजे, भौतिक ज्ञान व दुसरे अध्यात्मिक ज्ञान. भौतिक ज्ञानात प्रकृती ज्ञानाचा समावेश होतो. जे डोळ्याला दिसते अशा सर्व वस्तूबद्दलचे ज्ञानाचा यात समावेश होतो. सध्याच्या युगात भौतिक ज्ञानाची चिकित्सा, प्रचार व प्रसार मोठ्याप्रमाणात केल्या जात आहे. देशात अद्भूत शक्ती आहे. हे अध्यात्मिक ज्ञानात अंतर्भुत आहे. मनुष्याला सुखी जीवन जगण्यासाठी भौतिक व अध्यात्मिक ज्ञान असणे गरजेचे आहे. वेदात भेदभावाला स्थान नाही. त्यामुळे मनुष्यांनी विश्वरूप झाले पाहिजे. जात, धर्म, पंथ असा भेदभाव विसरून जीवन घालवावे, असे ते म्हणाले. (स्थानिक प्रतिनिधी)