शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

रमाई घरकुलांसाठी निधीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 05:00 IST

जून महिन्यात पहिला हप्ता प्राप्त होईल अशी अपेक्षा होती. मात्र एकाही लाभार्थ्याला पहिला हप्ता मिळाला नाही. पावसाळा असल्याने निधी दिला नसावा अशी आशा बाळगून जानेवारी महिन्यापर्यंत लाभार्थी निधीची प्रतीक्षा करीत होते. मात्र जानेवारी तर सोडाच आता २०१९-२० हे आर्थिक वर्ष संपून तीन महिन्याचा कालावधी संपला आहे. मात्र रूपयाचाही निधी उपलब्ध झाला नाही. त्यामुळे एकाही घराच्या बांधकामाला सुरूवात झाली नाही.

ठळक मुद्देसव्वा वर्ष उलटले : जिल्हाभरातील ९०८ घरांना मंजुरी, अनुसूचित जातीचे लाभार्थी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : रमाई घरकूल योजनेंतर्गत २०१९-२० या आर्थिक वर्षात गडचिरोली जिल्ह्यासाठी ९०८ घरे मंजूर करण्यात आले आहेत. मात्र सव्वा वर्ष उलटूनही रूपयाचाही निधी उपलब्ध झाला नाही. त्यामुळे जिल्हाभरात एकाही लाभार्थ्याने घर बांधकामाला सुरूवात केली नाही.अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना घरकूल बांधून देण्यासाठी शासनामार्फत रमाई घरकूल योजना राबविली जाते. दरवर्षी या योजनेंतर्गत जिल्हाभरात १०० ते १५० एवढेच घरकूल मंजूर केले जात होते. लाभार्थ्यांपेक्षा घरांची संख्या कमी असल्याने अनेक लाभार्थ्यांना योजनेपासून वंचीत राहावे लागत होते. मात्र मागील वर्षी म्हणजे २०१९-२० या आर्थिक वर्षात सुमारे १ हजार ३०७ घरकूल लाभार्थ्यांना घरकूल देण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले होते. अर्ज व इतर कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर ९०८ घरकूल बांधमास मंजूरी प्रदान करण्यात आली.घरकूूल मंजूर झाल्याने लाभार्थी जाम खूश होते. मागील वर्षीच्या मे महिन्यापर्यंत मंजुरीचे काम आटोपले. जून महिन्यात पहिला हप्ता प्राप्त होईल अशी अपेक्षा होती. मात्र एकाही लाभार्थ्याला पहिला हप्ता मिळाला नाही. पावसाळा असल्याने निधी दिला नसावा अशी आशा बाळगून जानेवारी महिन्यापर्यंत लाभार्थी निधीची प्रतीक्षा करीत होते. मात्र जानेवारी तर सोडाच आता २०१९-२० हे आर्थिक वर्ष संपून तीन महिन्याचा कालावधी संपला आहे. मात्र रूपयाचाही निधी उपलब्ध झाला नाही. त्यामुळे एकाही घराच्या बांधकामाला सुरूवात झाली नाही.पंचायत समितीत येरझाराघरकूल मंजूर झालेले लाभार्थी पंचायत समितीत जाऊन निधीची विचारना करीत आहेत. काही लाभार्थी तर थेट जिल्हा स्तरावरील कार्यालयात भेट देत आहेत. मात्र शासनानेच निधी दिला नसल्याने आपण काय करणार असे उत्तर अधिकारी व कर्मचारी देत आहेत. विशेष म्हणजे दरवर्षीच्या तुलनेत जास्त प्रमाणात घरकूल मंजूर झाल्याने घराचे स्वप्न पूर्ण होईल अशी अपेक्षा होती. मात्र निधीच मिळाला नसल्याने लाभार्थ्यांमध्ये शासनाप्रती नाराजी व्यक्त केली जात आहे.लॉकडाऊनमुळे राज्याची व देशाची अर्थव्यवस्था कोलमडली. त्यामुळे शासनाकडे निधी नाही, असे कारण सांगीतले जात आहे. मात्र घरकूल ही अत्यंत महत्त्वाची योजना असल्याने या योजनेसाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी होत आहे.राज्यभरातील लाभार्थ्यांचीही अशीच स्थितीशासनाने रमाई घरकूल योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात घरकूल मंजूर केले आहे. मात्र अजूनपर्यंत राज्यातील एकाही जिल्ह्याला या योजनेंतर्गत घरकूल बांधकामासाठी निधी उपलब्ध करून दिला नाही. त्यामुळे राज्यभरातील अनुसूचित जातीच्या घरकूल लाभार्थ्यांची निराशा झाली आहे.

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना