शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

डुकरांच्या नासाडीची नुकसानभरपाई नाही

By admin | Updated: September 9, 2016 01:06 IST

येथील गावालगत असलेल्या ऐतिहासिक किल्ला सध्या झाडाझुडुपांनी वेढलेला आहे आणि किल्ला परिसरातील दाट झाडीत रानडुकरांचे कळप वास्तव्याला असतात.

गतवर्षीचे प्रस्ताव पडूनच : वैरागड किल्ल्यात कळप वास्तव्याला, पिकांची प्रचंड हानीवैरागड : येथील गावालगत असलेल्या ऐतिहासिक किल्ला सध्या झाडाझुडुपांनी वेढलेला आहे आणि किल्ला परिसरातील दाट झाडीत रानडुकरांचे कळप वास्तव्याला असतात. दिवसभर किल्ल्यात आश्रयाला असलेले रानडुकरे रात्री किल्ल्यालगत असलेल्या शेतातील खरीपाच्या पिकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी करतात. परंतु याकडे वनविभागाचे दुर्लक्ष असून सन २०१५ मध्ये शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाईही अद्याप करण्यात आलेली नाही, अशी माहिती मिळाली आहे.सध्या खरीपाचे धान व तूर पीक ऐन बहरात आले आहे. त्या पिकांची नासाडी सध्या चालू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरात काहीही पडण्याची शक्यता नाही. त्यामुळे शेतकरी हैराण झाला असून वन विभागाने रानडुकराच्या बंदोबस्तासाठी कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत. मागील वर्षी आॅक्टोबर २०१५ मध्ये रानडुकरांमुळे झालेल्या धानाची नुकसानभरपाई मिळालेली नाही. म्हणून वन विभागाकडे रितसर अर्ज करण्यात आला. मात्र संबंधित शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नाही. याबाबत वनपाल, वनरक्षक यांना विचारणा केली असता, अर्जात त्रूटी असल्याचे सांगितले. राज्याच्या वनमंत्र्यांनी जंगली श्वापदांकडून खरोखरच हानी झाली असेल तर त्या संबंधित शेतकऱ्यांना १७ दिवसांत नुकसान भरपाई देण्यात यावी, असे आदेश वन विभागाला दिले आहे. मात्र वन विभागाचे अधिकारी शेतकऱ्यांना भरपाई देण्याबाबत निष्काळजीपणा करीत असल्याची तक्रार उपवनसंरक्षक वडसा यांच्याकडे करण्यात आली आहे. त्यानंतरही नुकसानभरपाई देण्याच्या कामाला वेग आला नाही. तक्रार केल्यानंतर वनकर्मचारी पंचनामा करण्यास सुद्धा संबंधित ठिकाणी जात नसल्याच्या अनेक तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत. (वार्ताहर)आठ महिन्यांत चारवेळा प्रस्ताव वापसवन्य प्राण्यांकडून जी हानी होते, त्या तोकड्या मदतीसाठी लांब प्रक्रिया पार पाडावी लागते. त्यातही वन विभागाच्या चुकीच्या माहितीमुळे वैरागड येथील एका शेतकऱ्याच्या नुकसान भरपाईचा प्रस्ताव आठ महिन्यात चारवेळा परत आला.