शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
4
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
5
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
6
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
7
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
8
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
9
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
10
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
11
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
12
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
13
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
14
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
15
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
16
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
17
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
18
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
19
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
20
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

डुकरांच्या नासाडीची नुकसानभरपाई नाही

By admin | Updated: September 9, 2016 01:06 IST

येथील गावालगत असलेल्या ऐतिहासिक किल्ला सध्या झाडाझुडुपांनी वेढलेला आहे आणि किल्ला परिसरातील दाट झाडीत रानडुकरांचे कळप वास्तव्याला असतात.

गतवर्षीचे प्रस्ताव पडूनच : वैरागड किल्ल्यात कळप वास्तव्याला, पिकांची प्रचंड हानीवैरागड : येथील गावालगत असलेल्या ऐतिहासिक किल्ला सध्या झाडाझुडुपांनी वेढलेला आहे आणि किल्ला परिसरातील दाट झाडीत रानडुकरांचे कळप वास्तव्याला असतात. दिवसभर किल्ल्यात आश्रयाला असलेले रानडुकरे रात्री किल्ल्यालगत असलेल्या शेतातील खरीपाच्या पिकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी करतात. परंतु याकडे वनविभागाचे दुर्लक्ष असून सन २०१५ मध्ये शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाईही अद्याप करण्यात आलेली नाही, अशी माहिती मिळाली आहे.सध्या खरीपाचे धान व तूर पीक ऐन बहरात आले आहे. त्या पिकांची नासाडी सध्या चालू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरात काहीही पडण्याची शक्यता नाही. त्यामुळे शेतकरी हैराण झाला असून वन विभागाने रानडुकराच्या बंदोबस्तासाठी कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत. मागील वर्षी आॅक्टोबर २०१५ मध्ये रानडुकरांमुळे झालेल्या धानाची नुकसानभरपाई मिळालेली नाही. म्हणून वन विभागाकडे रितसर अर्ज करण्यात आला. मात्र संबंधित शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नाही. याबाबत वनपाल, वनरक्षक यांना विचारणा केली असता, अर्जात त्रूटी असल्याचे सांगितले. राज्याच्या वनमंत्र्यांनी जंगली श्वापदांकडून खरोखरच हानी झाली असेल तर त्या संबंधित शेतकऱ्यांना १७ दिवसांत नुकसान भरपाई देण्यात यावी, असे आदेश वन विभागाला दिले आहे. मात्र वन विभागाचे अधिकारी शेतकऱ्यांना भरपाई देण्याबाबत निष्काळजीपणा करीत असल्याची तक्रार उपवनसंरक्षक वडसा यांच्याकडे करण्यात आली आहे. त्यानंतरही नुकसानभरपाई देण्याच्या कामाला वेग आला नाही. तक्रार केल्यानंतर वनकर्मचारी पंचनामा करण्यास सुद्धा संबंधित ठिकाणी जात नसल्याच्या अनेक तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत. (वार्ताहर)आठ महिन्यांत चारवेळा प्रस्ताव वापसवन्य प्राण्यांकडून जी हानी होते, त्या तोकड्या मदतीसाठी लांब प्रक्रिया पार पाडावी लागते. त्यातही वन विभागाच्या चुकीच्या माहितीमुळे वैरागड येथील एका शेतकऱ्याच्या नुकसान भरपाईचा प्रस्ताव आठ महिन्यात चारवेळा परत आला.