शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

चामोर्शी तालुक्यातील विद्यार्थी आहेत पाठ्यपुस्तकांविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:40 IST

यंदा शिक्षण विभागाने इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंत पुस्तकांचे अजूनपर्यंत मोफत वाटप न केल्यामुळे मागील वर्षीच्या मुलाकडून सुस्थितीत असलेल्या पुस्तकांचे ...

यंदा शिक्षण विभागाने इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंत पुस्तकांचे अजूनपर्यंत मोफत वाटप न केल्यामुळे मागील वर्षीच्या मुलाकडून सुस्थितीत असलेल्या पुस्तकांचे योग्य संकलन करून ती पुस्तके विद्यार्थ्यांना देत आहेत. त्यामुळे तालुक्यातील शिक्षक वर्गशाळा सुरू झाल्यानंतर गावागावात जाऊन विद्यार्थ्यांना पुस्तके देण्याचे काम केलेले होते. काही शाळांमध्ये विद्यार्थी संख्या कमी अधिक असल्यामुळे तेवढ्याच पटीत पुस्तके उपलब्ध होऊ शकत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना पुस्तके मिळण्यास विलंब होत आहे. बहुतांश शाळांनी इयत्ता पाचवी व सातवीचे ऑनलाईन क्लासेस सुरू केलेले आहेत. पण विद्यार्थ्यांच्या हातात परिपूर्ण पुस्तके नसल्याने त्यांच्या अभ्यासात खोळंबा होऊन त्यांचा हिरमोड होत आहे. इयत्ता पाचवी ते आठवीचे विद्यार्थी अभ्यास सोडून इतर कामाकडे जास्त लक्ष देत असल्याचा आरोप पालकांनी शिक्षण विभागावर केला आहे. इयत्ता आठवीचे प्रत्यक्ष वर्ग शाळेत सुरू होऊन जवळपास दीड महिना होत आहे. विद्यार्थ्याकडे परिपूर्ण पुस्तकांचा संच अजूनपर्यंत मिळाला नसल्याने विद्यार्थी शाळेमध्ये रोज येत नसल्याचे दिसून येत आहे. काही शाळांमध्ये ऑनलाइन वर्ग सुरू झालेले आहेत पण त्या शाळेतील शिक्षकांनाही शिकविताना अडचणी निर्माण होत आहेत.

शिक्षण विभागाने गतवर्षी पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पाठ्यपुस्तकांचा पुनर्वापर करण्याचे ठरविले आहे. यावर्षी ८० टक्के पुस्तकांची निर्मिती करून प्रत्येक विद्यार्थ्याना ही पुस्तके मिळतील असे शिक्षण विभागाने सांगितले होते. या उपक्रमातून कागदाची बचत होऊन झाडांचे संवर्धन होण्यास मदत होणार आहे असेही सांगितले होते. चामोर्शी गटसाधन केंद्राला पुस्तके आली असूनही अजूनपर्यंत वाटप केले नसल्याने शिक्षण विभाग किती जागरूक आहे हे दिसून येत आहे.

२०१९-२० किंवा २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात जुनी वापरलेली पाठ्यपुस्तके शाळेत जमा करावीत, असे आवाहन शाळांनी पालक आणि विद्यार्थ्यांना केले होते. त्यामुळे जवळपास संपूर्ण विद्यार्थ्यांनी जुनी पुस्तके शाळेला परत केलेली आहेत. त्यामुळे शाळेतील शिक्षकांनीच घरोघरी फिरून पुस्तकांचे संकलन करण्याची मोहीम हाती घेऊन अनेक नवीन विद्यार्थ्यांना पुस्तके वितरित करण्याचे काम पूर्ण केले. पण नवीन पुस्तके अजूनपर्यंत विद्यार्थ्याच्या हातात पोहोचली नसल्याने विद्यार्थ्याचा हिरमोड होत आहे. त्यामुळे या पुस्तकाचे वितरण लवकरात लवकर करावे, अशी मागणी विद्यार्थी, पालक व शिक्षक करीत आहेत.

काेट :

या महिन्याच्या दोन ते तीन तारखेला चामोर्शी गटसाधन केंद्रात तालुक्यात जेवढे केंद्र आहेत त्या सर्व केंद्रांकरिता पुस्तके आलेली आहेत. त्या सर्व पुस्तकांचे गट साधन केंद्राने केंद्रनिहाय, विषयनिहाय संकलन केले असून या पुस्तकांचे गठ्ठे बांधून तयार आहेत. या संकलन प्रक्रियेला तीन ते चार दिवस लागले. पण ज्या पुरवठादाराने या पुस्तकाचा पुरवठा केलेला आहे. सर्व केंद्रामध्ये पुस्तके पोहोच करण्याची त्या पुरवठादाराची जबाबदारी आहे. पण अजूनपर्यंत तो पुरवठादार पुस्तके पोहोच करण्यासाठी आलेला नाही. म्हणून विद्यार्थ्यांना पुस्तके मिळण्यासाठी विलंब होतं आहे. त्यामुळे दहा ते पंधरा दिवसांपासून पुस्तके अशीच पडून आहेत.

पंचफुलीवार, केंद्रप्रमुख, भेंडाळा