शहरं
Join us  
Trending Stories
1
“माझा हक्क आहे, पण विरोधी पक्षनेता असूनही संसेदत बोलू दिले जात नाही”; राहुल गांधींचा आरोप
2
झाले बाबा एकदाचे...! ब्रिटिशांचा जीव भांड्यात पडला; केरळमध्ये अडकलेले एफ-३५ दुरुस्त झाले, उद्या उड्डाण करणार
3
'ट्रम्प यांनी २४ वेळा...', ऑपरेशन सिंदूरबाबत खरगेंच्या विधानावर जेपी नड्डा संतापले, म्हणाले...
4
Ganeshotsav 2025 Train: गुडन्यूज! पश्चिम रेल्वे कोकणसाठी चालवणार 'या' विशेष गाड्या, तिकीट बुकिंग कधीपासून?
5
अजित पवार 'अ‍ॅक्शन मोड'वर! छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाण यांना राजीनामा देण्याचे आदेश
6
"मी २५ वर्षं आमदार, १० वर्ष लोकसभेचा खासदार...!"; छावाचे कार्यकर्ते आले, पत्ते टाकले, नंतर काय घडलं? तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
7
अजित पवारांनी मौन सोडले पण कारवाईवर भाष्य टाळलं; "मारहाणीची घटना अत्यंत गंभीर, दुर्दैवी..."
8
ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे... 
9
श्रावणात नैवेद्याच्या ताटाची लज्जत वाढवेल 'हा' कोबीचा चटका; कमी साहित्यात चविष्ट रेसेपी 
10
७/११तील सर्व दोषी निर्दोष, सरकारसमोर कोणते पर्याय; पुढे काय होणार? कायदेतज्ज्ञ म्हणतात...
11
अजित पवारांविरोधात छावा संघटना आक्रमक; NCP कार्यालयावर दगडफेक, जाळण्याचाही प्रयत्न
12
ट्रम्प यांच्या धोरणाचा आता 'नासा'लाही फटका; 'या' कारणांमुळे उपग्रह काढले विक्रीला, तेही डिस्काउंटमध्ये?
13
घरात वीज, शौचालय नाही, दिव्याच्या प्रकाशात अभ्यास...; भारताच्या लेकीचं जपानमध्ये कौतुक
14
IND vs PAK : या भारतीय क्रिकेटरचं नाव घेत शाहिद आफ्रिदीनं केला मोठा दावा, म्हणाला...
15
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
16
मुंबई: कुत्रा लचके तोडत होता आणि मालक हसत होता; घाटकोपरमध्ये ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला
17
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
18
आता ATM मधून पैसे काढायला कार्डची गरज नाही! 'या' सोप्या पद्धतीने UPI द्वारे काढा कॅश
19
झोपेच्या गोळ्या, शॉक दिला... बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याचा काढला काटा, कुटुंबाने केली 'ही' मागणी
20
नेपोकिड्सचा दाईजान! 'सैय्यारा'चं कौतुक केल्यावर करण जोहर झाला ट्रोल, उत्तर देत म्हणाला...

चामोर्शी तालुक्यातील विद्यार्थी आहेत पाठ्यपुस्तकांविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:40 IST

यंदा शिक्षण विभागाने इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंत पुस्तकांचे अजूनपर्यंत मोफत वाटप न केल्यामुळे मागील वर्षीच्या मुलाकडून सुस्थितीत असलेल्या पुस्तकांचे ...

यंदा शिक्षण विभागाने इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंत पुस्तकांचे अजूनपर्यंत मोफत वाटप न केल्यामुळे मागील वर्षीच्या मुलाकडून सुस्थितीत असलेल्या पुस्तकांचे योग्य संकलन करून ती पुस्तके विद्यार्थ्यांना देत आहेत. त्यामुळे तालुक्यातील शिक्षक वर्गशाळा सुरू झाल्यानंतर गावागावात जाऊन विद्यार्थ्यांना पुस्तके देण्याचे काम केलेले होते. काही शाळांमध्ये विद्यार्थी संख्या कमी अधिक असल्यामुळे तेवढ्याच पटीत पुस्तके उपलब्ध होऊ शकत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना पुस्तके मिळण्यास विलंब होत आहे. बहुतांश शाळांनी इयत्ता पाचवी व सातवीचे ऑनलाईन क्लासेस सुरू केलेले आहेत. पण विद्यार्थ्यांच्या हातात परिपूर्ण पुस्तके नसल्याने त्यांच्या अभ्यासात खोळंबा होऊन त्यांचा हिरमोड होत आहे. इयत्ता पाचवी ते आठवीचे विद्यार्थी अभ्यास सोडून इतर कामाकडे जास्त लक्ष देत असल्याचा आरोप पालकांनी शिक्षण विभागावर केला आहे. इयत्ता आठवीचे प्रत्यक्ष वर्ग शाळेत सुरू होऊन जवळपास दीड महिना होत आहे. विद्यार्थ्याकडे परिपूर्ण पुस्तकांचा संच अजूनपर्यंत मिळाला नसल्याने विद्यार्थी शाळेमध्ये रोज येत नसल्याचे दिसून येत आहे. काही शाळांमध्ये ऑनलाइन वर्ग सुरू झालेले आहेत पण त्या शाळेतील शिक्षकांनाही शिकविताना अडचणी निर्माण होत आहेत.

शिक्षण विभागाने गतवर्षी पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पाठ्यपुस्तकांचा पुनर्वापर करण्याचे ठरविले आहे. यावर्षी ८० टक्के पुस्तकांची निर्मिती करून प्रत्येक विद्यार्थ्याना ही पुस्तके मिळतील असे शिक्षण विभागाने सांगितले होते. या उपक्रमातून कागदाची बचत होऊन झाडांचे संवर्धन होण्यास मदत होणार आहे असेही सांगितले होते. चामोर्शी गटसाधन केंद्राला पुस्तके आली असूनही अजूनपर्यंत वाटप केले नसल्याने शिक्षण विभाग किती जागरूक आहे हे दिसून येत आहे.

२०१९-२० किंवा २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात जुनी वापरलेली पाठ्यपुस्तके शाळेत जमा करावीत, असे आवाहन शाळांनी पालक आणि विद्यार्थ्यांना केले होते. त्यामुळे जवळपास संपूर्ण विद्यार्थ्यांनी जुनी पुस्तके शाळेला परत केलेली आहेत. त्यामुळे शाळेतील शिक्षकांनीच घरोघरी फिरून पुस्तकांचे संकलन करण्याची मोहीम हाती घेऊन अनेक नवीन विद्यार्थ्यांना पुस्तके वितरित करण्याचे काम पूर्ण केले. पण नवीन पुस्तके अजूनपर्यंत विद्यार्थ्याच्या हातात पोहोचली नसल्याने विद्यार्थ्याचा हिरमोड होत आहे. त्यामुळे या पुस्तकाचे वितरण लवकरात लवकर करावे, अशी मागणी विद्यार्थी, पालक व शिक्षक करीत आहेत.

काेट :

या महिन्याच्या दोन ते तीन तारखेला चामोर्शी गटसाधन केंद्रात तालुक्यात जेवढे केंद्र आहेत त्या सर्व केंद्रांकरिता पुस्तके आलेली आहेत. त्या सर्व पुस्तकांचे गट साधन केंद्राने केंद्रनिहाय, विषयनिहाय संकलन केले असून या पुस्तकांचे गठ्ठे बांधून तयार आहेत. या संकलन प्रक्रियेला तीन ते चार दिवस लागले. पण ज्या पुरवठादाराने या पुस्तकाचा पुरवठा केलेला आहे. सर्व केंद्रामध्ये पुस्तके पोहोच करण्याची त्या पुरवठादाराची जबाबदारी आहे. पण अजूनपर्यंत तो पुरवठादार पुस्तके पोहोच करण्यासाठी आलेला नाही. म्हणून विद्यार्थ्यांना पुस्तके मिळण्यासाठी विलंब होतं आहे. त्यामुळे दहा ते पंधरा दिवसांपासून पुस्तके अशीच पडून आहेत.

पंचफुलीवार, केंद्रप्रमुख, भेंडाळा