शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

-तर सात मीटरच रस्ता उरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 05:00 IST

देसाईगंज येथील विर्शी तुकूम सर्वे नं. १७८/४ च्या लेआऊटमध्ये नियोजन प्राधिकरण नगरविकास विभाग यांच्या वतीने १६ आॅक्टोबर २००१ रोजी नऊ मीटरचा रस्ता जिल्हाधिकारी कार्यालयाने मंजूर केला. परंतु या रस्त्याच्या दुतर्फा लगतच्या रहिवाशांनी घर बांधकाम करताना रस्त्यावरील जागेवर पक्के बांधकाम करून अतिक्रमण केले. रस्त्याची नियोजित जागा अनधिकृतरित्या कब्जात घेतली.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार : कस्तुरबा वॉर्डातील अतिक्रमण हटविण्याकडे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : शहराच्या कस्तुरबा वॉर्डातील सिद्धांत नगरात नालीचे बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम करताना अतिक्रमण हटवून रस्त्यासाठी नऊ मीटर जागा सोडणे आवश्यक होते. परंतु याकडे दुर्लक्ष करून सिमेंट काँक्रिट नालीचे बांधकाम प्रशासनाच्या वतीने सुरू करण्यात आले. रस्त्यासाठी आता केवळ सात मीटरच जागा उरत आहे. त्यामुळे येथून आवागमन करणाऱ्या लोकांसाठी अडचणीचे ठरणार आहे. ही बाब लक्षात घेऊन नागरिकांनी स्थानिक प्रशासनासह जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.देसाईगंज येथील विर्शी तुकूम सर्वे नं. १७८/४ च्या लेआऊटमध्ये नियोजन प्राधिकरण नगरविकास विभाग यांच्या वतीने १६ आॅक्टोबर २००१ रोजी नऊ मीटरचा रस्ता जिल्हाधिकारी कार्यालयाने मंजूर केला. परंतु या रस्त्याच्या दुतर्फा लगतच्या रहिवाशांनी घर बांधकाम करताना रस्त्यावरील जागेवर पक्के बांधकाम करून अतिक्रमण केले. रस्त्याची नियोजित जागा अनधिकृतरित्या कब्जात घेतली. तरीसुद्धा काहीच कारवाई झाली नाही. सध्या नगर परिषदेच्या वतीने रस्त्याच्या बाजूने नाली बांधकामाचे काम सुरू आहे. नाली बांधकाम करताना नऊ मीटरच्या रस्त्यावर असलेले अनधिकृत अतिक्रमण हटविण्यासंदर्भात तक्रार मुख्याधिकाऱ्यांना दोनवेळा देण्यात आली. परंतु प्रशासनाने रस्त्यावरील व ले-आऊटमधील कोणतेही अतिक्रमण हटविले नाही. उपलब्ध सात मीटर रस्त्याच्या बाजूने नाली बांधकाम करण्याचे प्रस्तावित केले आहे. त्यामुळे या मार्गावर नऊ ऐवजी सात मीटरचाच रस्ता उरणार आहे. सार्वजनिक रहदारीच्या दृष्टीने येथील अतिक्रमण हटवून नऊ मीटरचा रस्ता उपलब्ध करावा, अशी मागणी एम. आर. बोटकावार, ए. जी. रामटेके, एम. एच. तिरपुडे, के. पी. सहारे, बी. टी. ढोमणे, आर. एन. गभणे, एच. एस. लाडे, डी. लोनबले यांनी तक्रारीद्वारे केली.पांदण रस्ता म्हणून नोंद२००१ मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नगरविकास विभागाने कस्तुरबा वॉर्डातील हा रस्ता शेतीकडे जाणारा पांदण रस्ता म्हणून प्रस्तावित केले होते. परंतु कालांतराने या भागात लोकवस्ती वाढली. अनेक ले-आऊटधारकांनी अतिक्रमण केल्याने नऊ मीटरचा रस्ता केवळ सात मीटर रूंद उरला आहे. परंतु याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने ले-आऊटधारकांचे फावले व रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमणही फोफावले.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणcollectorजिल्हाधिकारी