शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

'हा' नियम म्हणतो, नव्या तांदळाचे वय अवघे तीन महिने !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2022 07:20 IST

Gadchiroli News भारतीय खाद्य निगमच्या (एफसीआय) नियमांनुसार चांगल्या तांदळाचे वय अवघे तीन महिने निश्चित करण्यात आले आहे.

ठळक मुद्देजुना तांदूळ ‘एफसीआय’कडून सर्रास केला जातोय नापास

मनोज ताजने

गडचिरोली : जुना तांदूळ असेल तर तो अधिक चांगला शिजतो; त्यामुळे त्याचे दरही नवीन तांदळाच्या तुलनेत जास्त असतात; पण भारतीय खाद्य निगमच्या (एफसीआय) नियमांनुसार चांगल्या तांदळाचे वय अवघे तीन महिने निश्चित करण्यात आले आहे. राईस मिलर्सकडून भरडाई करून आलेला तांदूळ तीन महिन्यांपेक्षा जुना असल्यास तो सरळ ‘रिजेक्ट’ केला जात असल्यामुळे या वर्षी भरडई केलेले धानाचे लॉट नापास करण्याचे प्रमाण वाढले आहे.

राज्यात पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये धानाचे उत्पादन सर्वाधिक घेतले जाते. याच भागातून राज्यातील उर्वरित जिल्ह्यांना एफसीआयमार्फत तांदळाचा पुरवठा होतो. या वर्षी शेतकऱ्यांकडून खरीप हंगामात खरेदी केलेल्या धानाची भरडाई करण्यासाठी राईस मिलर्ससोबत करारनामे करून भरडाई सुरू आहे; पण मिलर्सच्या अडेलतट्टू धोरणामुळे सध्या गडचिरोली वगळता इतर जिल्ह्यांमध्ये धान भरडाई अत्यल्प प्रमाणात झाली आहे. भरडाईस होत असलेल्या या विलंबासोबत तांदळाचे लॉट नापास होण्याचे प्रमाणही वाढणार आहे. कारण केमिकल टेस्टनुसार भरडई झालेल्या तांदळाची तपासणी केली जात आहे.

अशी होते केमिकल टेस्ट

आधी भरडई केलेल्या तांदळात तुकड्याचे प्रमाण किती आहेत, हे तपासून लॉट पास केले जात होते. आता तुकड्यासोबतच केमिकल टेस्ट करून तांदूळ किती जुना आहे, हेसुद्धा तपासले जाते. प्रत्येक लॉटमधील ५ ग्रॅम तांदूळ काढून त्यात लिक्विड केमिकल टाकले जाते. त्यानंतर तांदळाचा रंग हिरवा आल्यास तो तांदूळ नवीन आहे, हे सिद्ध होऊन तो स्वीकारला जातो; पण तांदळाचा रंग पिवळा आल्यास तो तांदूळ ३ महिन्यांपेक्षा जुना आहे, असे मानून तो नाकारला जातो.

तीन महिन्यांत भरडाई अशक्य

शेतकऱ्यांकडील धानाची शासकीय खरेदी सुरू करण्यासाठी आता जवळपास ३ महिन्यांचा कालावधी पूर्ण होत आहे; पण लाखो क्विंटल धान अजूनही शासकीय गोदामांमध्ये आणि खरेदी केंद्रांवर भरडाईच्या प्रतीक्षेत उघड्यावर ठेवलेला आहे. धान भरडाईची संथगती पाहता तीन महिन्यांतच काय, सहा महिन्यांतही सर्व धानाची भरडाई होण्याची शक्यता नाही. अशा स्थितीत एफसीआयच्या निकषांत तो धान बसेल का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :agricultureशेती