शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

राष्ट्रीय महामार्गावरील सोमनपल्लीचा नवनिर्मित पूल ठरला कुचकामी; पहिल्याच पावसाळ्यात पोलखोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2022 16:31 IST

अयोग्य पद्धतीचे बांधकाम

कौसर खान

सिरोंचा (गडचिरोली) : तेलंगणापासून सुरू होणाऱ्या आणि छत्तीसगडमध्ये संपणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६३ मध्ये तीन राज्यांना जोडणारा महत्त्वपूर्ण मार्ग आहे. पण, या महामार्गावर सोमनपल्ली नाल्यावर उभारण्यात आलेला पूल पावसाळ्यात कुचकामी ठरत आहे. अयोग्य पद्धतीने करण्यात आलेल्या बांधकामावर मार्गावर पाणी साचून वाहतूक खोळंबते. या अयोग्य पद्धतीच्या बांधकामाची पावसाने पोलखोल केली असताना आता त्यात योग्य दुरूस्ती केली जाणार का?, असा प्रश्न कायम आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६३ हा सिरोंचा तालुक्यात ५६ किलोमीटरचा आहे. याची सुरुवात तेलंगणाच्या निजामाबादपासून होते. तो सिरोंचा तालुक्यातून पुढे छत्तीसगडच्या जगदलपूरपर्यंत जातो. तीन राज्यांना जोडणारा हा महामार्ग म्हणजे सुवर्णरेखाच आहे. पण, या मार्गात सिरोंचा तालुक्यात असलेला सोमनपल्ली नाला मोठा अडसर ठरला होता. सदर पुलाला जोडणाऱ्या रस्त्याचा नवीन सुधारित आराखडा तयार करून पुन्हा योग्य पद्धतीने रस्त्याचे बांधकाम केले नाही तर हा पूल आणि रस्ता पावसाळ्यात कुचकामी ठरणार आहे.

प्रगत राज्यात अप्रगत तंत्रज्ञान?

तेलंगणा आणि छत्तीसगड हे दोन्ही राज्य महाराष्ट्राच्या तुलनेत बरेच नवीन आणि अप्रगत मानले जातात. मात्र या महामार्गावरून प्रवास करणारे लोक तीनही राज्यांची तुलना करतात. हे करताना अशा पद्धतीने राष्ट्रीय महामार्गावर तेलंगणा किंवा छत्तीसगडमध्ये कुठेही अडथळा नाही, पण प्रगत म्हटल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील तंत्रज्ञान अप्रगत आहे का?, येथील अभियंत्यांचे ज्ञान कमकुवत आहे का?, असे प्रश्न प्रवासी करतात. कोट्यवधी रुपये खर्च करूनही महामार्गाच्या या दुरवस्थेसाठी जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करावी अशी भावना व्यक्त होत आहे.

चुकीच्या कामामुळे रस्त्यावर साचते पाणी

सिरोंचा या तालुका मुख्यालयापासून ४० कि.मी. अंतरावर असलेल्या सोमनपल्ली गावाजवळील नाल्यावर हा पूल बांधून जेमतेम एक वर्षही झालेले नाही. या पुलामुळे आता पावसाळ्यातही वाहतूक सुरळीत सुरू राहील असे वाटले असताना पहिल्याच पावसाने चुकीच्या बांधकामाची पोलखोल केली. रस्त्यावर साचणाऱ्या पाण्यामुळे बऱ्याच वेळा वाहतूक खोळंबून राहात आहे. या चुकीची दुरूस्ती करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकgadchiroli-acगडचिरोली