शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
3
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
4
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
5
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
6
‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
7
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
8
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
9
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
10
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
11
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
12
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
13
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
14
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
15
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
16
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
17
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
18
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
19
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
20
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा

जिल्ह्यात साथरोगांचे थैमान

By admin | Updated: September 2, 2014 23:46 IST

जिल्ह्यात साथीच्या रोगांनी थैमान घातले असून यामुळे नऊ नागरिकांचा मृत्यू झाला असल्याची नोंद सरकारी दप्तरात आहे. प्रत्यक्षात यापेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू साथ रोगांनी झाला असल्याची शक्यता

गडचिरोली : जिल्ह्यात साथीच्या रोगांनी थैमान घातले असून यामुळे नऊ नागरिकांचा मृत्यू झाला असल्याची नोंद सरकारी दप्तरात आहे. प्रत्यक्षात यापेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू साथ रोगांनी झाला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. दुर्गम भागातील नागरिकांच्या मृत्यूची नोंद व्यवस्थित होत नसल्याने प्रशासनाकडे साथ रोगांनी झालेल्या मृत्यूचा आकडा कमी नोंदविण्यात आला आहे. आरमोरी तालुक्यांतर्गत येत असलेल्या बोरी येथील तीन वर्षीय बालिका मागील आठवड्यात डेंग्यू आजाराने दगावली. मात्र याबाबतची नोंद शासकीय दप्तरात करण्यात आली नाही. त्यामुळे शासनाकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. जिल्हा मुख्यालय असलेल्या गडचिरोली तालुक्यात साथीच्या आजाराने पाच रूग्ण दगावले. त्याचबरोबर कुरखेडा तालुक्यातील दोन व चामोर्शी तसेच धानोरा तालुक्यातील प्रत्येक एका रूग्णाचा मृत्यू झाला. गडचिरोली तालुक्यात विश्रामपूर येथील दोन नागरिकांचा हिवतापाने मृत्यू झाला. साखरा येथे एका जणाचा मृत्यू झाला. आंबेशिवणी येथील दोन रूग्णांचा हिवतापाने मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाकडे आहे. मागील वर्षी कुरखेडा तालुक्यातील काही गावांमध्ये डेंग्यूच्या आजाराने थैमान घातले होते. शेकडो नागरिकांना साथ रोगाची लागण झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. कोरची, भामरागड, सिरोंचा, धानोरा या तालुक्यांमधील दुर्गम भागामध्ये नेहमीच साथीचे रोग पसरतात. मात्र बहुतांश नागरिक रूग्णालयामध्ये न जाता गावठी उपचार करतात. उपचाराला उशीर झाल्याने त्यांचा मृत्यू होतो. मात्र त्याची नोंद दवाखान्यामध्ये राहत नाही. त्यामुळे एखाद्या रोगाने मृत्यू झाला असल्याची आकडेवारी नेहमीच कमी राहत असल्याचे दिसून येते. जिल्ह्याला लागलेले रिक्त पदांचे ग्रहण अजूनही सुटलेले नाही. यापासून आरोग्य विभागसुद्धा अपवाद नाही. आरोग्य विभागातील जवळपास ३० टक्के पदे रिक्त आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांची तर नेहमीच वानवा असल्याचे दिसून येते. जे कर्मचारी कार्यरत आहेत. ते सुद्धा व्यवस्थित काम करीत नाही. तालुका किंवा जिल्हा मुख्यालयी राहून जवळपास ५० किमीच्या अंतरावर सेवा देतात. ये- जा करण्यातच त्यांचा बराचसा कालावधी जातो. त्यामुळे रूग्ण खाटेवरच तडफडत राहतो. ही जिल्ह्यातील सत्य परिस्थिती असली तरी रूग्णांची नोंद नसल्याने त्याची परिणामकारकता दिसून येत नाही. (नगर प्रतिनिधी)