शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात साथरोगांचे थैमान

By admin | Updated: September 2, 2014 23:46 IST

जिल्ह्यात साथीच्या रोगांनी थैमान घातले असून यामुळे नऊ नागरिकांचा मृत्यू झाला असल्याची नोंद सरकारी दप्तरात आहे. प्रत्यक्षात यापेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू साथ रोगांनी झाला असल्याची शक्यता

गडचिरोली : जिल्ह्यात साथीच्या रोगांनी थैमान घातले असून यामुळे नऊ नागरिकांचा मृत्यू झाला असल्याची नोंद सरकारी दप्तरात आहे. प्रत्यक्षात यापेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू साथ रोगांनी झाला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. दुर्गम भागातील नागरिकांच्या मृत्यूची नोंद व्यवस्थित होत नसल्याने प्रशासनाकडे साथ रोगांनी झालेल्या मृत्यूचा आकडा कमी नोंदविण्यात आला आहे. आरमोरी तालुक्यांतर्गत येत असलेल्या बोरी येथील तीन वर्षीय बालिका मागील आठवड्यात डेंग्यू आजाराने दगावली. मात्र याबाबतची नोंद शासकीय दप्तरात करण्यात आली नाही. त्यामुळे शासनाकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. जिल्हा मुख्यालय असलेल्या गडचिरोली तालुक्यात साथीच्या आजाराने पाच रूग्ण दगावले. त्याचबरोबर कुरखेडा तालुक्यातील दोन व चामोर्शी तसेच धानोरा तालुक्यातील प्रत्येक एका रूग्णाचा मृत्यू झाला. गडचिरोली तालुक्यात विश्रामपूर येथील दोन नागरिकांचा हिवतापाने मृत्यू झाला. साखरा येथे एका जणाचा मृत्यू झाला. आंबेशिवणी येथील दोन रूग्णांचा हिवतापाने मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाकडे आहे. मागील वर्षी कुरखेडा तालुक्यातील काही गावांमध्ये डेंग्यूच्या आजाराने थैमान घातले होते. शेकडो नागरिकांना साथ रोगाची लागण झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. कोरची, भामरागड, सिरोंचा, धानोरा या तालुक्यांमधील दुर्गम भागामध्ये नेहमीच साथीचे रोग पसरतात. मात्र बहुतांश नागरिक रूग्णालयामध्ये न जाता गावठी उपचार करतात. उपचाराला उशीर झाल्याने त्यांचा मृत्यू होतो. मात्र त्याची नोंद दवाखान्यामध्ये राहत नाही. त्यामुळे एखाद्या रोगाने मृत्यू झाला असल्याची आकडेवारी नेहमीच कमी राहत असल्याचे दिसून येते. जिल्ह्याला लागलेले रिक्त पदांचे ग्रहण अजूनही सुटलेले नाही. यापासून आरोग्य विभागसुद्धा अपवाद नाही. आरोग्य विभागातील जवळपास ३० टक्के पदे रिक्त आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांची तर नेहमीच वानवा असल्याचे दिसून येते. जे कर्मचारी कार्यरत आहेत. ते सुद्धा व्यवस्थित काम करीत नाही. तालुका किंवा जिल्हा मुख्यालयी राहून जवळपास ५० किमीच्या अंतरावर सेवा देतात. ये- जा करण्यातच त्यांचा बराचसा कालावधी जातो. त्यामुळे रूग्ण खाटेवरच तडफडत राहतो. ही जिल्ह्यातील सत्य परिस्थिती असली तरी रूग्णांची नोंद नसल्याने त्याची परिणामकारकता दिसून येत नाही. (नगर प्रतिनिधी)