शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

तंमुसने पुढाकार घेणे गरजेचे

By admin | Updated: May 23, 2014 23:51 IST

आधुनिक काळातील नवतरुण व्यसनाधिनतेकडे वळले आहेत़ त्यामुळे त्यांची अधोगती होत आहे़ सुशिक्षित तरुणांनी स्वत: पुढाकार घेऊन व्यसनाधिनता थांबविणे गरजेचे आहे़ ग्रामीण भागात अंधश्रेद्धेचे मूळ

जनजागृती आवश्यक : अनिष्ट रूढी, अंधश्रद्धेवर तंटामुक्ती हाच इलाज

देसाईगंज : आधुनिक काळातील नवतरुण व्यसनाधिनतेकडे वळले आहेत़ त्यामुळे त्यांची अधोगती होत आहे़ सुशिक्षित तरुणांनी स्वत: पुढाकार घेऊन व्यसनाधिनता थांबविणे गरजेचे आहे़ ग्रामीण भागात अंधश्रेद्धेचे मूळ खोलवर गेले आहेत. समाजातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी तंटामुक्त समितीच्या माध्यमातून ताबा मिळविता येऊ शकतो, त्यासाठी तंटामुक्त मोहिमेतून जनजागृती करून अधिक प्रयत्न करणे गरजेचे आहे़ आजची तरुण पिढी शिक्षण तथा स्पर्धा परीक्षेकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे़ ग्रामीण भागासह शहरी भागातीलही तरूण व्यसनाच्या गर्तेत अडकले आहेत. व्यसनाकडे तरुणवर्ग वळल्यामुळे त्यांचे भविष्य अंधकारमय झाले आहे़ राष्टÑसंत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज यांनी समाज प्रबोधनाच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचा प्रचार केला. कमावलेला पैसा सत्कारणी लागला तर तरुण पिढीचे भविष्य उज्ज्वल होऊ शकते़ सध्या तरुण वर्ग व्यसनाधिनतेकडे वळल्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तरूण पिढीला व्यसनमुक्त करण्यासाठी योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. त्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त मोहिमेतून पुढाकार घेतला जाऊ शकतो. २००६ पासून राज्यात तंटामुक्त गाव अभियान राबविण्यात येत आहे़ या अभियानामुळे देसाईगंज तालुक्यातील काही गावांमध्ये दारूबंदी करण्यात आली़ सुरूवातीच्या काळात दारूबंदीला गावातून चांगला प्रतिसाद मिळाला. गावातील महिलांनीसुध्दा तंटामुक्त समितीच्या माध्यमातून दारू बंदीला पाठींबा दिला़ मात्र कालांतराने गावातील तंट्याच्या वातावरणात दारूबंदीकडे तंटामुक्त समित्यांनी पाठ फिरविली़ हल्ली संपूर्ण जिल्ह्यात तंटामुक्त समितीच्यासमक्ष मोठ्याप्रमाणात दारूचा व्यवसाय फोफावत चालला आहे. काही ठिकाणी तर या समितीच्या पदाधिकार्‍यांना हप्तेवारी पैसे मिळत असल्याचीही चर्चा अनेक गावांमध्ये ऐकायला मिळत आहे. काही गावांमध्ये महिलांच्या पुढाकाराने दारूबंदीची चळवळ यशस्वी झाली आहे़ मात्र गावातील राजकारणाने तंटामुक्त समितीच्या नवनवीन पदाधिकार्‍यामुळे दारूबंदीचे वाभाडे निघाले आहेत. त्यामुळेच व्यसनाधिनतेकडे वळलेल्या ग्रामीण तरुणांना व्यसनमुक्तीसाठी प्रवृत्त करण्याचे आव्हान महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्यांपुढे आहे. ग्रामीण भागातील वाढलेली अंधश्रध्दा आणी अनिष्ट चालीरीती, रूढी-पंरपरा केवळ तंटामुक्त समितीच्या पुढाकारातून दूर होऊ शकतात़ तंटामुक्त समितीची कार्यकारिणी दरवर्षी घोषित केली जाते. परंतु कार्यकारिणी घोषित करतांना अध्यक्षपदावरून वाद निर्माण होण्याच्या घटनाही अनेकदा घडलेल्या आहेत. त्यामुळे तंटामुक्तीसाठी स्थापन होणारी समिती स्वत:च तंट्याला सामोरे जाते. तंटामुक्ती समिती गठीत करतांना तंटे होऊ नये यासाठी गावपातळीवर विचारमंथन होणे आवश्यक आहे. बहुतेक तंटामुक्त समित्या दारूबंदी व अंधश्रंध्देसाठी प्रयत्नरत आहेत़ मात्र गावातील सर्वसामान्याकडून या बाबतीत गती देण्यासाठी सुशिक्षित वर्गानेसुद्घा पुढाकार घेणे गरजेचे आहे. व्यसनमुक्ती व अंधश्रध्दा निवारणाला गती देणारी चळवळ उभारली तर तंटामुक्ती समित्यांना बळकटी प्राप्त होऊ शकते. गावपातळीवर तंटामुक्त समित्यांचा वचक कायम राहण्यासाठी पोलिसांचेही सहकार्य महत्वाचे आहे. त्यामुळे तंटामुक्त समित्यांचा दरारा गावात राहू शकेल या दृष्टीने प्रयत्न होणे आवश्यक आहे. (वार्ताहर)