शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
2
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
3
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
4
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
5
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
6
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
7
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
8
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
9
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
10
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत
11
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
12
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
13
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
14
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
15
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
16
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
17
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
18
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
19
दही की ताक... आरोग्यासाठी सर्वात बेस्ट काय? फायदे समजल्यावर व्हाल चकित
20
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!

८०० बेघरांना मिळाला तात्पुरता निवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 05:00 IST

ठिकठिकाणच्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये, तर काही ठिकाणी नगर परिषदेच्या शाळांमध्ये परजिल्ह्यातील नागरिकांची निवास व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय त्यांच्या मागणीनुसार त्यांना स्वयंपाकासाठी लागणारे किराणा सामानही पुरविण्यात आले आहे. संचारबंदीचा आदेश आहे तोपर्यंत त्यांची अशा पद्धतीने व्यवस्था प्रशासनाकडून केली जाणार आहे.

ठळक मुद्देसंचारबंदीमुळे पडले अडकून : जिल्हा प्रशासनाकडून निवास आणि स्वयंपाकाच्या साहित्याची व्यवस्था

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कोरोना विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या संचारबंदी व जिल्हाबंदीचा फटका बसलेले ८०० नागरिक सध्या जिल्ह्याच्या विविध भागात अडकून पडले आहेत. त्यांनी स्वगृही न जाता आहे तिथेच थांबावे असे आवाहन करून शासनाने त्यांची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे सर्व तालुका प्रशासनाच्या वतीने त्या-त्या भागातील अशा बेघर नागरिकांच्या आश्रयाची व्यवस्था करण्यात आली आहे.ठिकठिकाणच्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये, तर काही ठिकाणी नगर परिषदेच्या शाळांमध्ये परजिल्ह्यातील नागरिकांची निवास व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय त्यांच्या मागणीनुसार त्यांना स्वयंपाकासाठी लागणारे किराणा सामानही पुरविण्यात आले आहे. संचारबंदीचा आदेश आहे तोपर्यंत त्यांची अशा पद्धतीने व्यवस्था प्रशासनाकडून केली जाणार आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून जिल्ह्यात १४ हजार नागरिक दाखल झाले आहेत. त्यातील जवळपास ८०० नागरिक इतर जिल्ह्यातील आणि इतर राज्यातील आहेत. काही जण विविध कामानिमित्त या जिल्ह्यात आले तर काही जण लगतच्या तेलंगणा राज्यातून गोंदिया किंवा पलिकडच्या बालाघाट आणि छत्तीसगडमधील आपल्या गृह जिल्ह्यात जाण्यासाठी गडचिरोलीत पोहोचले आहेत. त्या सर्वांना प्रशासनाने विविध ठिकाणी आश्रय दिला आहे.अधिकाऱ्यांची अशीही सहृदयताउन्हाळी हंगामातील शेतीच्या कामासह इतर रोजगारासाठी महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यातील हजारो मजूर तेलंगणात जातात. पण कोरानासाठी लॉकडाऊन केल्यानंतर त्यांना गावाकडे जाण्यासाठी वाहन नसल्यामुळे अनेक लोक शेकडो किलोमीटरचा प्रवास करून पायीत गावाकडे निघाले आहेत. रविवारच्या रात्री असेच एक कुटुंब गोंदियाकडे जाण्यासाठी गडचिरोलीच्या रस्त्याने जात होते. दिवसभर चालून ते थकून गेले होते. त्यांच्याकडे खाण्यासाठीही काही नव्हते. आपल्या वाहनातून जात असलेले गडचिरोलीचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सुनील मडावी यांची नजर त्यांच्यावर पडल्यानंतर त्यांनी त्यांची चौकशी केली. तेव्हा त्यात एक गरोदर महिलासुद्धा होती. डॉ.मडावी यांनी तहसीलदार महेंद्र गणवीर यांना सांगताच त्यांनी न.प.च्या शाळेत रात्री ११.३० वाजता त्यांची निवास व्यवस्था केली. एवढेच नाही तर डॉ.अनुपम महैशगोरी, आनंद मोडक यांच्या सहकार्याने स्वत:च्या घरून भोजन बनवून आणून त्यांची व्यवस्था केली.४.३२ लाख लोकांना स्वस्त गहू-तांदळाचा लाभजिल्ह्यातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील सदस्यांची संख्या ४ लाख ३२ हजार आहे. या सर्वांना २ रुपये किलो दराने गहू तर ३ रुपये किलो दराने ३ तांदूळ वाटप केले जात आहे. अंत्योदयच्या लाभार्थ्याना प्रतिकार्ड १० किलो गहू आणि २५ किलो तांदूळ तर प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना प्रतिव्यक्ती २ किलो गहू आणि ३ किलो तांदूळ दिले जात आहे. या सर्व लाभार्थ्यांना आता अतिरिक्त ५ किलो धान्य देण्याचा निर्णय झाल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी नरेंद्र भागडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.शाळेच्या आवारात पेटताहेत चुलीबेघर कुटुंबियांना ५ रुपयात शिवभोजन देऊन भोजन व्यवस्था करण्याचे शासनाचे निर्देश होते. परंतू मर्यादित ठिकाणी शिवभोजनाची व्यवस्था असल्याने ते आश्रयितांना पोहोचविणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांना स्वयंपाकाचे साहित्यच देण्यात आले. त्यात गव्हाची कणिक, तांदूळ, तेल-तिखट, मीठ आदी सर्व साहित्य दिल्यामुळे अनेक ठिकाणी या आश्रयितांच्या चुली पेटताना दिसत आहेत.

टॅग्स :social workerसमाजसेवक