शहरं
Join us  
Trending Stories
1
धनत्रयोदशीला एकट्या मारुतीने विकल्या ५०००० गाड्या, बुकिंगचा आकडा बघाल तर...; आजही मुहूर्त सुरूच...
2
'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!
3
आपल्यापेक्षा ५० वर्ष लहान तरुणीशी लग्न अन् अफवांचा बाजार; १.६ कोटींचा हुंड्याचा चेक बनावट निघाला, फोटोग्राफरचे पैसे न देताच...
4
वर्दीतली माणुसकी! एकही पणती विकली गेली नाही; पोलिसांनी 'असं' आणलं आजीच्या चेहऱ्यावर हसू
5
Kritika Reddy : डॉक्टर कपल, कोट्यवधींचं घर अन् रहस्यमयी मृत्यू...; ६ महिन्यांनी 'परफेक्ट मर्डरचा' पर्दाफाश
6
खळबळजनक! भावाची किडनी फेल, बहीण बनली चोर; नवऱ्याच्या घरात मारला ३० लाखांचा डल्ला
7
आई-वडिलांची उपेक्षा केल्यास पगारातून १५% रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा होणार, 'हे' राज्य आणणार कायदा
8
रॉकेट सायन्स...! इतर सर्व फटाके जमिनीवरच फुटतात...मग रॉकेटच का जाते आकाशात? विचार करा, मुलांनाही सांगा...
9
IND vs AUS 1st ODI : किंग कोहलीच्या पदरी 'भोपळा'; ऑस्ट्रेलियातील मैदानात पहिल्यांदाच आली अशी वेळ!
10
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
11
IND vs AUS 1st ODI : हिटमॅन रोहितनं मैदानात उतरत इतिहास रचला; पण हेजलवूडनं 'जोश' दाखवला अन्...
12
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
13
IND vs AUS 1st ODI : गिलच्या कॅप्टन्सीत या युवा क्रिकेटरला पहिली संधी; रोहितनं दिली वनडे डेब्यू कॅप
14
क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी...
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
16
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
17
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
18
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
19
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
20
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास

८०० बेघरांना मिळाला तात्पुरता निवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 05:00 IST

ठिकठिकाणच्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये, तर काही ठिकाणी नगर परिषदेच्या शाळांमध्ये परजिल्ह्यातील नागरिकांची निवास व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय त्यांच्या मागणीनुसार त्यांना स्वयंपाकासाठी लागणारे किराणा सामानही पुरविण्यात आले आहे. संचारबंदीचा आदेश आहे तोपर्यंत त्यांची अशा पद्धतीने व्यवस्था प्रशासनाकडून केली जाणार आहे.

ठळक मुद्देसंचारबंदीमुळे पडले अडकून : जिल्हा प्रशासनाकडून निवास आणि स्वयंपाकाच्या साहित्याची व्यवस्था

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कोरोना विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या संचारबंदी व जिल्हाबंदीचा फटका बसलेले ८०० नागरिक सध्या जिल्ह्याच्या विविध भागात अडकून पडले आहेत. त्यांनी स्वगृही न जाता आहे तिथेच थांबावे असे आवाहन करून शासनाने त्यांची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे सर्व तालुका प्रशासनाच्या वतीने त्या-त्या भागातील अशा बेघर नागरिकांच्या आश्रयाची व्यवस्था करण्यात आली आहे.ठिकठिकाणच्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये, तर काही ठिकाणी नगर परिषदेच्या शाळांमध्ये परजिल्ह्यातील नागरिकांची निवास व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय त्यांच्या मागणीनुसार त्यांना स्वयंपाकासाठी लागणारे किराणा सामानही पुरविण्यात आले आहे. संचारबंदीचा आदेश आहे तोपर्यंत त्यांची अशा पद्धतीने व्यवस्था प्रशासनाकडून केली जाणार आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून जिल्ह्यात १४ हजार नागरिक दाखल झाले आहेत. त्यातील जवळपास ८०० नागरिक इतर जिल्ह्यातील आणि इतर राज्यातील आहेत. काही जण विविध कामानिमित्त या जिल्ह्यात आले तर काही जण लगतच्या तेलंगणा राज्यातून गोंदिया किंवा पलिकडच्या बालाघाट आणि छत्तीसगडमधील आपल्या गृह जिल्ह्यात जाण्यासाठी गडचिरोलीत पोहोचले आहेत. त्या सर्वांना प्रशासनाने विविध ठिकाणी आश्रय दिला आहे.अधिकाऱ्यांची अशीही सहृदयताउन्हाळी हंगामातील शेतीच्या कामासह इतर रोजगारासाठी महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यातील हजारो मजूर तेलंगणात जातात. पण कोरानासाठी लॉकडाऊन केल्यानंतर त्यांना गावाकडे जाण्यासाठी वाहन नसल्यामुळे अनेक लोक शेकडो किलोमीटरचा प्रवास करून पायीत गावाकडे निघाले आहेत. रविवारच्या रात्री असेच एक कुटुंब गोंदियाकडे जाण्यासाठी गडचिरोलीच्या रस्त्याने जात होते. दिवसभर चालून ते थकून गेले होते. त्यांच्याकडे खाण्यासाठीही काही नव्हते. आपल्या वाहनातून जात असलेले गडचिरोलीचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सुनील मडावी यांची नजर त्यांच्यावर पडल्यानंतर त्यांनी त्यांची चौकशी केली. तेव्हा त्यात एक गरोदर महिलासुद्धा होती. डॉ.मडावी यांनी तहसीलदार महेंद्र गणवीर यांना सांगताच त्यांनी न.प.च्या शाळेत रात्री ११.३० वाजता त्यांची निवास व्यवस्था केली. एवढेच नाही तर डॉ.अनुपम महैशगोरी, आनंद मोडक यांच्या सहकार्याने स्वत:च्या घरून भोजन बनवून आणून त्यांची व्यवस्था केली.४.३२ लाख लोकांना स्वस्त गहू-तांदळाचा लाभजिल्ह्यातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील सदस्यांची संख्या ४ लाख ३२ हजार आहे. या सर्वांना २ रुपये किलो दराने गहू तर ३ रुपये किलो दराने ३ तांदूळ वाटप केले जात आहे. अंत्योदयच्या लाभार्थ्याना प्रतिकार्ड १० किलो गहू आणि २५ किलो तांदूळ तर प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना प्रतिव्यक्ती २ किलो गहू आणि ३ किलो तांदूळ दिले जात आहे. या सर्व लाभार्थ्यांना आता अतिरिक्त ५ किलो धान्य देण्याचा निर्णय झाल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी नरेंद्र भागडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.शाळेच्या आवारात पेटताहेत चुलीबेघर कुटुंबियांना ५ रुपयात शिवभोजन देऊन भोजन व्यवस्था करण्याचे शासनाचे निर्देश होते. परंतू मर्यादित ठिकाणी शिवभोजनाची व्यवस्था असल्याने ते आश्रयितांना पोहोचविणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांना स्वयंपाकाचे साहित्यच देण्यात आले. त्यात गव्हाची कणिक, तांदूळ, तेल-तिखट, मीठ आदी सर्व साहित्य दिल्यामुळे अनेक ठिकाणी या आश्रयितांच्या चुली पेटताना दिसत आहेत.

टॅग्स :social workerसमाजसेवक