शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

भाजप सरकारचा दुटप्पी व फोलपणा गावागावात सांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 00:33 IST

काँग्रेस सरकारच्या काळात विविध शासकीय योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत सहज पोहोचत होता. मात्र विद्यमान भाजपप्रणित सरकारने जुन्याच योजनांचे नाव बदलवून अनेक योजनांचे नविनीकरण केले.

ठळक मुद्दे नामदेव उसेंडी यांचे आवाहन : काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : काँग्रेस सरकारच्या काळात विविध शासकीय योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत सहज पोहोचत होता. मात्र विद्यमान भाजपप्रणित सरकारने जुन्याच योजनांचे नाव बदलवून अनेक योजनांचे नविनीकरण केले. यात जाचक अटी व निकष समाविष्ट केले. त्यामुळे मागासवर्गीय लोकांना मिळणाºया सवलती बंद झाल्या. भाजपच्या सत्ताधारी पुढाºयांनी निवडणुकीपूर्वी अनेक मोठमोठी आश्वासने जनतेला दिली. मात्र तीन वर्षात गडचिरोली जिल्ह्यात विकासाचा पत्ता नाही. केवळ दिखावूपणा सुरू आहे. भाजपचा हा दुटप्पी व फोलपणा आता गावागावात सांगण्याची गरज आहे. हे काम काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी करावे, असे आवाहन जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी केले.गडचिरोली तालुका व शहर काँग्रेस कमिटीतर्फे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक रविवारी येथील सभागृहात पार पडली. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.यावेळी मंचावर प्रामुख्याने माजी खासदार मारोतराव कोवासे, जि.प. सदस्य अ‍ॅड. राम मेश्राम, नगरसेवक तथा शहर अध्यक्ष सतीश विधाते, जिल्हा महासचिव समशेर खॉ. पठाण, पंकज गुड्डेवार, पांडुरंग घोटेकर, युकाँचे लोकसभा क्षेत्र अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, प्रभाकर वासेकर, सी. बी. आवळे, नेताजी गावतुरे, पी. टी. मसराम, समया पसुला, रजनीकांत मोटघरे, नंदू वाईलकर, आशिष कन्नमवार, लहुकुमार टिपले, पं.स. सभापती दुर्लभा बांबोळे, पं.स. सदस्य मालता मडावी, शंकरराव सालोटकर, आशा मेश्राम आदी मान्यवर उपस्थित होते.पुढे बोलताना डॉ. उसेंडी म्हणाले, काँग्रेसने एससी, एसटी, एनटी, ओबीसीसह बहुजन व मागासवर्गीयांना नेहमीच न्याय देण्याचा प्रयत्न केला. मात्र आता विद्यमान सरकारने मागासवर्गीयांच्या शिष्यवृत्ती योजनेच्या लाभाला रोख लावण्याचा प्रयत्न चालविला आहे. गेल्या तीन वर्षांपासून मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती प्रलंबित आहे. त्यामुळे हे विद्यार्थी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. जाती-जाती व समाजात भेदभावाची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न सरकारकडून होत आहे. भाजप सरकारची नोटबंदी पूर्णत: फसली असून याचा सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास झाला. शाळांमध्ये राबविण्यात येणाºया मोफत गणवेश योजनेत जाचक अटी घातल्याने या योजनेचा बट्ट्याबोळ झाला आहे. योजना द्यायच्या मात्र त्यात जाचक निकष टाकून प्रक्रिया गुंतागुंतीची करून सर्वसामान्यांना वेठीस धरण्याचे काम विद्यमान सरकार करीत आहे. त्यामुळे या सरकारवरील जनतेचा विश्वास आता उडाला आहे, असेही डॉ. उसेंडी यावेळी म्हणाले. त्यामुळे सर्वसामान्य गोरगरिबांच्या हिताची काँग्रेस पुढे येणे आवश्यक आहे. त्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजप नेत्यांचा व सरकारचा दुटप्पीपणा जनतेपुढे मांडावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी माजी खा.मारोतराव कोवासे यांनीही मार्गदर्शन केले. जि.प. सदस्य अ‍ॅड. रामभाऊ मेश्राम, नगरसेवक सतीश विधाते यांनी काँग्रेस पक्ष संघटनेबाबत महत्त्वाच्या सूचना करून भाजप सरकारच्या धोरणावर जोरदार टिका केली. प्रास्ताविक शंकरराव सालोटकर, संचालन एजाज शेख यांनी केले.पारित झालेले ठरावयावेळी जिल्हा काँग्रेस पार्टीतर्फे विविध महत्त्वपूर्ण ठराव पारित करण्यात आले. यामध्ये गडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त घोषीत करून शेतकºयांना प्रती एकरी ५० हजार रूपयांची मदत द्यावी, शेतकºयांना सरसकट कर्जमाफी द्यावी, खनिज संपत्तीवर प्रक्रिया उद्योग निर्माण करावेत, विद्यार्थ्यांची प्रलंबित शिष्यवृत्ती त्वरीत द्यावी तसेच रखडलेले सिंचन प्रकल्पांना निधी देऊन हे प्रकल्प मार्गी लावावे, आदींचा समावेश आहे.