शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलवर मोर्चा धडकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 21:58 IST

शेतकरी, शेतमजूर व बेरोजगारांच्या न्याय हक्कासाठी बहूजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वतीने शुक्रवारी आरमोरी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढून विविध मागण्यांचे निवेदन .....

ठळक मुद्देबीआरएसपीचे नेतृत्व : शेतकरी, शेतमजूर व बेरोजगारांच्या समस्या सोडवा

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : शेतकरी, शेतमजूर व बेरोजगारांच्या न्याय हक्कासाठी बहूजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वतीने शुक्रवारी आरमोरी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढून विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.मोर्चाचे नेतृत्व बीआरएसपीचे विदर्भ महासचिव राजू झोडे, प्रा. संजय मंगर यांनी केले. दुपारी जुन्या बसथांब्याजवळील तथागत बुद्ध विहारापासून मोर्चाला सुरूवात होऊन शहरातील मुख्य मार्गाने तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला. केंद्र व राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. शासनाच्या सर्व योजना अपयशी झाल्या असून जनतेमध्ये शासनाप्रति तीव्र नाराजी आहे. शेतकरी कर्जमाफीची घोषणा करून सहा महिन्यांचा कालावधी उलटत आहे. परंतु शेतकºयांना कर्जमाफी मिळाली नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. शासनाने ६५ वर्षावरील शेतकरी, शेतमजूर व बेरोजगारांना मासिक पाच हजार रूपये पेंशन लागू करावी, या प्रमुख मागणीसह शेतकरी, शेतमजूर व बेरोजगारांच्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला.स्वामी नाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या, कोणत्याही शेतकºयांच्या जमिनी बळजबरीने शासनाने संपादन करू नये, शेतमालाच्या किमती ठरविण्याचा अधिकार शेतकºयांना मिळावा, याकरिता शेतकरी लवादाची निर्मिती करावी, कर्जमाफी झालेल्या शेतकºयांची यादी तत्काळ जाहीर करून बँकेच्या मुख्य फलकावर लावावी, मच्छिमार सोसायट्यांना जिल्हा परिषद अंतर्गत लिजवर तलाव द्यावे, ग्रा. पं. द्वारा ठेका पद्धती बंद करण्यात यावी, मच्छिमार सोसायट्यांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून द्यावे, आदी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. मोर्चात शेकडो शेतकरी, शेतमजूर सहभागी झाले. याप्रसंगी श्रावण भानारकर, विलास कोडापे, डॉ. कैलास नगराळे, जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, देवानंद बाविस्कर, क्षीरसागर शेंडे, सचिन गेडाम, प्रवीण डांगे, सुमित खोब्रागडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.