शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

बसफेऱ्यांअभावी तेंदू मजूर दुर्गम भागातच अडकले

By admin | Updated: June 2, 2016 02:58 IST

गडचिरोली जिल्ह्यातील तेंदू हंगाम मे महिन्याच्या अखेरीस संपत आला असून या कामावर आलेले बाहेरगावचे मजूर गावाकडे जाण्यासाठी सज्ज झाले आहे.

बसफेऱ्या वाढवा : मजुरांसह प्रवाशांची मागणीजिमलगट्टा : गडचिरोली जिल्ह्यातील तेंदू हंगाम मे महिन्याच्या अखेरीस संपत आला असून या कामावर आलेले बाहेरगावचे मजूर गावाकडे जाण्यासाठी सज्ज झाले आहे. मात्र दुर्गम भागात बसफेऱ्यांची कमतरता असल्याने अनेक मजुरांना बसअभावी अडकून पडावे लागले आहे. गडचिरोली जिल्ह्यात पाच वन विभागांतर्गत १२५ ते १५० च्या वर तेंदू युनिट विकल्या गेले होते. काही ठिकाणी कंत्राटदार, ग्रामपंचायती यांच्या मार्फत तेंदू संकलनाचे काम झाले. गडचिरोली जिल्ह्यात रोजगाराचे कोणतेही साधन नसल्याने जिल्ह्यातील विविध भागातील मजूर तेंदू संकलनाच्या कामासाठी दुर्गम भागात १५ दिवस जाऊन राहतात. याशिवाय चंद्रपूर जिल्ह्यातीलही मजूर येथे तेंदू संकलनासाठी येतात. यावर्षी तेंदू संकलनाचे काम २० मे नंतर बऱ्याच ठिकाणी आटोपले. जिमलगट्टा परिसरात ३१ मे रोजी तेंदू संकलन काम आटपून मजूर बाहेरगावी जाण्यासाठी निघाले. मात्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसफेऱ्या कमी असल्याने बऱ्याच मजुरांना मंगळवारी दिवसभर बसची प्रतीक्षा करावी लागली. त्यांना वेळेत बस न मिळाल्याने काही जणांनी खासगी गाड्यांचाही वापर परत जाण्यासाठी केला. आणखी दोन-तीन दिवस तेंदू मजुरांची ही गर्दी लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाने या भागात बसफेऱ्या वाढवाव्या, अशी मागणी या मजुरांनी केली आहे. (वार्ताहर)