शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
3
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
4
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
5
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
6
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
7
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
8
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
9
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
10
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
11
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
12
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
13
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
14
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
15
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
16
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
17
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
18
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
19
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
20
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे

शिक्षकांच्या नियुक्त्या धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2017 01:08 IST

जिल्हा परिषदेअंतर्गत मार्चमध्ये विषय शिक्षकांच्या पदभरती संदर्भात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात

उच्च न्यायालयाचा निर्णय : पुन्हा याचिका दाखल करण्याची मुभांलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हा परिषदेअंतर्गत मार्चमध्ये विषय शिक्षकांच्या पदभरती संदर्भात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात विज्ञान पदवीधरांच्या याचिकेवर ३० जून रोजी सुनावणी झाली. विषय शिक्षकांच्या पदभरतीमध्ये बारावी पास विज्ञान शिक्षकांना नियुक्ती दिल्यास याचिकाकर्त्यांना परत न्यायालयात जाण्याची मुभा राहील, असा निर्णय न्यायमूर्तीद्वय बी. पी. धर्माधिकारी व रोहीत देव यांनी दिला आहे. त्यामुळे बारावी पास विज्ञान शिक्षकांच्या नियुक्त्या धोक्यात आल्या आहेत.जिल्हा परिषदेने २० व २१ मार्च रोजी ३६९ विषय शिक्षक पदावर नियुक्ती देताना विज्ञान व गणित या विषय शिक्षकांच्या यादीमध्ये पदवीधर शिक्षकांना डावलून बारावी विज्ञान डीएड् शिक्षकांना स्थान देण्यात आले. त्यामुळे विनोद शिवाजी रायपुरे व इतर सहा शिक्षकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. याची सुनावणी ३० जून रोजी झाली. बारावी विज्ञान शिक्षकांना नियुक्ती आदेश दिल्याचे पुरावे सादर करण्यास न्यायालयाने सांगितले. मात्र संबंधित शिक्षकांना आदेशपत्रच दिले गेले नसल्याने याचिकाकर्त्यांना पुरावे सादर करता आले नाही. त्यामुळे न्यायालयाने याचिका निकालात काढली आहे. मात्र विज्ञान विषयात पदवीधर नसलेल्या शिक्षकांना प्रत्यक्ष नियुक्ती दिल्यास न्यायालयात याचिका दाखल करण्याची मुभा दिली आहे. या निर्णयामुळे जिल्हा परिषदेने गणित व विज्ञान या विषयांसाठी बारावी उत्तीर्ण शिक्षकांची नियुक्ती केल्यास या नियुक्त्या धोक्यात येण्याची शक्यता आहे. शिक्षण विभाग नेमका कोणता निर्णय घेते, याकडे लक्ष लागले आहे.