शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

शिक्षकांची पाठ

By admin | Updated: September 1, 2014 23:33 IST

शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना दरवर्षी राज्य शासनाकडून राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार तर जिल्हा परिषदेमार्फत जिल्हास्तरीय आदर्श दिला जातो.

अनास्था : जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी ११ प्रस्तावगडचिरोली : शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना दरवर्षी राज्य शासनाकडून राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार तर जिल्हा परिषदेमार्फत जिल्हास्तरीय आदर्श दिला जातो. मात्र जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे प्राथमिक शिक्षकांचे पुरस्कारांसाठी केवळ ११ प्रस्ताव दाखल झाले आहेत. फारच कमी प्रस्ताव दाखल झाल्याने आदर्श शिक्षक पुरस्काराप्रती शिक्षकांमध्ये अनास्था असल्याचे दिसून येते. या पुरस्काराकडे अनेक लायक व पात्र शिक्षकांनी पाठ फिरविली असल्याचे दिसून येते.भारताचे दुसरे राष्ट्रपती थोर शिक्षण तज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस ५ सप्टेंबर रोजी सर्वत्र शिक्षक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. याच दिवशी शिक्षक दिनी शासन व प्रशासनाकडून राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार व जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन शिक्षकांच्या कार्यांचा गौरव केला जातो. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाच्यावतीने आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी इच्छुक शिक्षकांकडून १५ जुलैपासून १ सप्टेंबरपर्यंत सर्व आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव मागविण्यात आले. आज १ सप्टेंबरच्या तारखेत अखेरच्या दिवशी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्राथमिक शिक्षकांचे केवळ ११ प्रस्ताव शिक्षण विभागाकडे सादर करण्यात आले आहे. माध्यमिक शिक्षकांकडून आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी एकही प्रस्ताव अद्यापर्यंत शिक्षण विभागाकडे प्राप्त झाले नसल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी पाच वर्षाच्या शिक्षक सेवेचा गोपनिय अहवाल, सलग १५ वर्षाची सेवा, मुख्याध्यापकांसाठी सलग २० वर्षाची सेवा व उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचे चारित्र्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. (प्रतिनिधी)वेतनवाढ व आर्थिक लाभाच्या अभावामुळे प्रस्ताव कमीखूप वर्षापूर्वी राज्य शासनाकडून राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त तसेच जिल्हा परिषदेकडून जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना आगावू वेतनवाढ देण्यात येत होती. मात्र सदर वेतनवाढ बंद करण्यात आल्याने या पुरस्कारासाठी सादर करण्यात येणाऱ्या प्रस्तावामध्ये घट झाली आहे. पुरस्कारप्राप्त शिक्षकांना रोख स्वरूपात कोणत्याही प्रकारचा आर्थिक लाभ देण्यात येत नाही. यामुळे बहुतांश शिक्षक पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करीत नसल्याचे दिसून येते. याशिवाय पुरस्कारासाठी इच्छुक शिक्षकांनाच स्वत: प्रस्ताव दाखल करावा लागतो.