शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
जर्मनीतील म्युनिक विमानतळावर ड्रोन दिसला, १७ उड्डाणे रद्द; युरोपमध्ये घबराट पसरली
3
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
4
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
5
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
6
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
7
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
8
‘अनैतिकते’मुळे अफगाणमध्ये ब्लॅकआउट! इंटरनेटबंदीमागे तालिबानचा नेमका हेतू काय?
9
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
10
सोने खरेदीची लगीनघाई; दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईतील बाजारात संध्याकाळी तेजी; चांदी फॉर्मात
11
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
12
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
13
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
14
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
15
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
16
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
17
आता पाहा, मित्र-मित्रच एकमेकांना कापताना दिसतील!
18
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
19
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
20
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

टॅक्सीतून सुरू आहे जीवघेणा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2016 02:10 IST

गडचिरोली जिल्ह्यात केवळ शहरी भागातील रस्ते चांगले आहेत. मात्र अहेरी उपविभागातील पाचही तालुक्यातील अनेक ठिकाणचे रस्ते प्रचंड खराब झाले आहेत.

रस्ता दुरवस्थेचा परिणाम : लोकप्रतिनिधींसह प्रशासनही कमालीचे सुस्तआष्टी/गुंडापल्ली : गडचिरोली जिल्ह्यात केवळ शहरी भागातील रस्ते चांगले आहेत. मात्र अहेरी उपविभागातील पाचही तालुक्यातील अनेक ठिकाणचे रस्ते प्रचंड खराब झाले आहेत. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अनेक दुर्गम गावांना राज्य परिवहन महामंडळाची बस पोहोचत नाही. परिणामी प्रवाशांना जीव धोक्यात घालून खासगी काळीपिवळी टॅक्सीने प्रवास करावा लागतो. सध्या महाशिवरात्रीनिमित्त मार्र्कंडादेव, चपराळा येथे यात्रा सुरू आहे. त्यामुळे या दोन्ही स्थळाकडे जाणाऱ्या भाविक प्रवाशांची संख्या प्रचंड वाढली आहे. याचा फायदा घेऊन काळीपिवळी टॅक्सीचालक क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी आपल्या टॅक्सीत कोंबून त्याची वाहतूक करीत आहेत. मात्र याकडे परिवहन विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. अहेरी उपविभागात अहेरी, एटापल्ली, सिरोंचा, भामरागड, मुलचेरा या पाच तालुक्यात रस्त्यांची मोठी समस्या निर्माण झाली आहे. या उपविभागात अनेक रस्ते मंजूर करण्यात आले आहे. मात्र नक्षलवाद्यांच्या दहशतीमुळे अनेक ठिकाणचे रस्त्याचे काम रखडले आहे. अहेरी उपविभागात नदी, नाले असल्याने पुलाची गरज आहे. मात्र गडअहेरी नाल्यासह अनेक ठिकाणच्या नाल्यावरील पुलाची उंची फार कमी आहे. परिणामी पावसाळ्यात पुलावर पाणी चढत असल्याने वाहतूक पूर्णत: ठप्प होते. पावसाळ्यात अहेरी उपविभागात वाहतूक प्रभावीत होऊन शेकडो गावांचा संपर्क तुटतो. राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने चामोर्शी व अहेरी तालुक्याच्या दुर्गम भागात मोजक्या बसगाड्या सोडल्या जातात. त्यामुळे या भागात काळीपिवळी टॅक्सीची वाहतूक मोठ्या प्रमाणात चालते. काळीपिवळी टॅक्सीचालक नियम धाब्यावर बसवून क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची धोकादायक वाहतूक करतात. गेल्या दोन वर्षात या भागात काळीपिवळी टॅक्सी वाहनांना अनेकदा अपघात घडले. ही समस्या निकाली काढण्यासाठी रस्त्याची पुनर्बांधणी करणे अत्यावश्यक आहे. यासंदर्भात अनेकदा मागणी करूनही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह प्रशासन रस्ता सुविधेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत आहे. (वार्ताहर)