शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
4
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
5
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
6
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
7
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
8
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
9
धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
10
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
11
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
12
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
13
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
14
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
15
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
16
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
18
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
19
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
20
Air India Plane Crash Insurance Claim : अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?

टॅक्सीतून सुरू आहे जीवघेणा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2016 02:10 IST

गडचिरोली जिल्ह्यात केवळ शहरी भागातील रस्ते चांगले आहेत. मात्र अहेरी उपविभागातील पाचही तालुक्यातील अनेक ठिकाणचे रस्ते प्रचंड खराब झाले आहेत.

रस्ता दुरवस्थेचा परिणाम : लोकप्रतिनिधींसह प्रशासनही कमालीचे सुस्तआष्टी/गुंडापल्ली : गडचिरोली जिल्ह्यात केवळ शहरी भागातील रस्ते चांगले आहेत. मात्र अहेरी उपविभागातील पाचही तालुक्यातील अनेक ठिकाणचे रस्ते प्रचंड खराब झाले आहेत. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अनेक दुर्गम गावांना राज्य परिवहन महामंडळाची बस पोहोचत नाही. परिणामी प्रवाशांना जीव धोक्यात घालून खासगी काळीपिवळी टॅक्सीने प्रवास करावा लागतो. सध्या महाशिवरात्रीनिमित्त मार्र्कंडादेव, चपराळा येथे यात्रा सुरू आहे. त्यामुळे या दोन्ही स्थळाकडे जाणाऱ्या भाविक प्रवाशांची संख्या प्रचंड वाढली आहे. याचा फायदा घेऊन काळीपिवळी टॅक्सीचालक क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी आपल्या टॅक्सीत कोंबून त्याची वाहतूक करीत आहेत. मात्र याकडे परिवहन विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. अहेरी उपविभागात अहेरी, एटापल्ली, सिरोंचा, भामरागड, मुलचेरा या पाच तालुक्यात रस्त्यांची मोठी समस्या निर्माण झाली आहे. या उपविभागात अनेक रस्ते मंजूर करण्यात आले आहे. मात्र नक्षलवाद्यांच्या दहशतीमुळे अनेक ठिकाणचे रस्त्याचे काम रखडले आहे. अहेरी उपविभागात नदी, नाले असल्याने पुलाची गरज आहे. मात्र गडअहेरी नाल्यासह अनेक ठिकाणच्या नाल्यावरील पुलाची उंची फार कमी आहे. परिणामी पावसाळ्यात पुलावर पाणी चढत असल्याने वाहतूक पूर्णत: ठप्प होते. पावसाळ्यात अहेरी उपविभागात वाहतूक प्रभावीत होऊन शेकडो गावांचा संपर्क तुटतो. राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने चामोर्शी व अहेरी तालुक्याच्या दुर्गम भागात मोजक्या बसगाड्या सोडल्या जातात. त्यामुळे या भागात काळीपिवळी टॅक्सीची वाहतूक मोठ्या प्रमाणात चालते. काळीपिवळी टॅक्सीचालक नियम धाब्यावर बसवून क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची धोकादायक वाहतूक करतात. गेल्या दोन वर्षात या भागात काळीपिवळी टॅक्सी वाहनांना अनेकदा अपघात घडले. ही समस्या निकाली काढण्यासाठी रस्त्याची पुनर्बांधणी करणे अत्यावश्यक आहे. यासंदर्भात अनेकदा मागणी करूनही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह प्रशासन रस्ता सुविधेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत आहे. (वार्ताहर)