शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

टॅक्सीतून सुरू आहे जीवघेणा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2016 02:10 IST

गडचिरोली जिल्ह्यात केवळ शहरी भागातील रस्ते चांगले आहेत. मात्र अहेरी उपविभागातील पाचही तालुक्यातील अनेक ठिकाणचे रस्ते प्रचंड खराब झाले आहेत.

रस्ता दुरवस्थेचा परिणाम : लोकप्रतिनिधींसह प्रशासनही कमालीचे सुस्तआष्टी/गुंडापल्ली : गडचिरोली जिल्ह्यात केवळ शहरी भागातील रस्ते चांगले आहेत. मात्र अहेरी उपविभागातील पाचही तालुक्यातील अनेक ठिकाणचे रस्ते प्रचंड खराब झाले आहेत. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अनेक दुर्गम गावांना राज्य परिवहन महामंडळाची बस पोहोचत नाही. परिणामी प्रवाशांना जीव धोक्यात घालून खासगी काळीपिवळी टॅक्सीने प्रवास करावा लागतो. सध्या महाशिवरात्रीनिमित्त मार्र्कंडादेव, चपराळा येथे यात्रा सुरू आहे. त्यामुळे या दोन्ही स्थळाकडे जाणाऱ्या भाविक प्रवाशांची संख्या प्रचंड वाढली आहे. याचा फायदा घेऊन काळीपिवळी टॅक्सीचालक क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी आपल्या टॅक्सीत कोंबून त्याची वाहतूक करीत आहेत. मात्र याकडे परिवहन विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. अहेरी उपविभागात अहेरी, एटापल्ली, सिरोंचा, भामरागड, मुलचेरा या पाच तालुक्यात रस्त्यांची मोठी समस्या निर्माण झाली आहे. या उपविभागात अनेक रस्ते मंजूर करण्यात आले आहे. मात्र नक्षलवाद्यांच्या दहशतीमुळे अनेक ठिकाणचे रस्त्याचे काम रखडले आहे. अहेरी उपविभागात नदी, नाले असल्याने पुलाची गरज आहे. मात्र गडअहेरी नाल्यासह अनेक ठिकाणच्या नाल्यावरील पुलाची उंची फार कमी आहे. परिणामी पावसाळ्यात पुलावर पाणी चढत असल्याने वाहतूक पूर्णत: ठप्प होते. पावसाळ्यात अहेरी उपविभागात वाहतूक प्रभावीत होऊन शेकडो गावांचा संपर्क तुटतो. राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने चामोर्शी व अहेरी तालुक्याच्या दुर्गम भागात मोजक्या बसगाड्या सोडल्या जातात. त्यामुळे या भागात काळीपिवळी टॅक्सीची वाहतूक मोठ्या प्रमाणात चालते. काळीपिवळी टॅक्सीचालक नियम धाब्यावर बसवून क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची धोकादायक वाहतूक करतात. गेल्या दोन वर्षात या भागात काळीपिवळी टॅक्सी वाहनांना अनेकदा अपघात घडले. ही समस्या निकाली काढण्यासाठी रस्त्याची पुनर्बांधणी करणे अत्यावश्यक आहे. यासंदर्भात अनेकदा मागणी करूनही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह प्रशासन रस्ता सुविधेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत आहे. (वार्ताहर)