शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

जिल्ह्यात उद्योगवाढीसाठी जम्मू व उत्तरांचल राज्याच्या धर्तीवर कर धोरण लागू करावे

By admin | Updated: July 7, 2015 01:21 IST

गडचिरोली या उद्योगविरहित जिल्ह्यात उद्योगधंदे वाढीस लागावे, या दृष्टीकोनातून केंद्र व राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहे

पत्रकार परिषद : अशोक नेते करणार केंद्र सरकारकडे मागणीगडचिरोली : गडचिरोली या उद्योगविरहित जिल्ह्यात उद्योगधंदे वाढीस लागावे, या दृष्टीकोनातून केंद्र व राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहे. जम्मू काश्मीर व उत्तरांचल राज्यात उद्योगधंद्याबाबत जे करमाफीचे धोरण आहे, तेच धोरण नक्षलग्रस्त गडचिरोलीसाठी केंद्र सरकारने लागू करावे, अशी मागणी आपण आगामी अधिवेशनात केंद्र सरकारकडे करणार आहे, अशी माहिती गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी सोमवारी पत्र परिषदेत दिली.हॉलिडे पॅकेज अंतर्गत उद्योगांच्या करासंदर्भातील हे धोरण राबविले जाते. तेच धोरण येथे राबवावे, अशी मागणीही त्यांनी केली. आपण खासदार म्हणून निवडून आल्यानंतर गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे अनेक प्रश्न मार्गी लावले असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी अधिवेशनात स्वतंत्र विदर्भ राज्य व्हावे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भारतरत्न पुरस्कार द्यावे, वन कायद्यात शिथीलता आणावी, सुशिक्षीत बेरोजगारांना नोकरी लागेपर्यंत प्रती महा दोन हजार रूपये बेकारी भत्ता देण्यात यावा, या मागणीचे चार अशासकीय ठराव आपण लोकसभेच्या अधिवेशनात सादर करणार आहोत. याशिवाय जिल्हा विकासाच्या दृष्टीकोणातून आरोग्य, कृषी, उद्योग, दूरसंचार, शेतकऱ्यांची समस्या, पीक विम्याच्या लाभात वाढ करावी, बीपीएलचे पुनर्सर्वेक्षण आदीसह १९२ प्रश्न आपण मांडणार आहोत, असे त्यांनी सांगितले.देसाईगंज न.प.च्या मुख्याधिकाऱ्याविरोधात हक्कभंग दाखल करणारदेसाईगंज नगर पालिकेत सुरू असलेल्या आर्थिक गैरव्यवहाराविषयी नगरसेवक व नागरिक यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर तक्रारी आपल्याकडे आल्यात. देसाईगंज नगर पालिकेचे मुख्याधिकारी मनमानी कारभार करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यांना या तक्रारीच्या संदर्भात विचारणा करण्यासाठी आपण बोलाविले होते. परंतु ते आले नाहीत. त्यामुळे त्यांच्याविरूध्द हक्कभंगाची कारवाई करणार असल्याचे खा. अशोक नेते यांनी यावेळी सांगितले. भाजपची सत्ता या नगर पालिकेत असली तरी पक्षाची सत्ता एका अधिकाऱ्यामुळे बदनाम होत आहे. ही योग्य बाब नाही. त्यामुळे आपण एक लोकप्रतिनिधी म्हणून या प्रश्नाकडे लक्ष घातले, असेही त्यांनी आवर्जुन सांगितले.रेड्डींची विभागीय चौकशी झाली सुरूगडचिरोली येथील मुख्य वनसंरक्षक टी. एस. के. रेड्डी यांनी आपल्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणावर खरेदी व इतर प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार केला आहे. त्यांच्या संदर्भात आपण महाराष्ट्र शासनाकडे तक्रार करून त्यांची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. या संदर्भात त्यांची विभागीय चौकशी सुरू असल्याची माहिती आपल्याला शासनाकडून मिळाली आहे, अशी माहिती खासदार अशोक नेते यांनी पत्रकार परिषदेत दिली.