शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

गावठी आंब्याची लज्जत यावर्षी महागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 05:00 IST

गडचिरोली जिल्ह्यात संकरित आंब्यांच्या फळबागा फार कमी प्रमाणात आहेत. गावठी आंब्याची झाडे आहेत. तसेच काही गावांमध्ये आमराई आहे. फेब्रुवारी महिन्याला सुरूवात होताच आबालवृद्धांचे लक्ष आमराईकडे जाते. जानेवारी महिन्यात आंब्याच्या झाडांना मोहर येते. मोहरामुळे हिरवे आंब्याचे झाड पिवळे झुंज दिसायला लागतात. मात्र यावर्षी वातावरणात झालेल्या बदलाचा मोठा फटका आंबा व मोहाला बसला.

ठळक मुद्देगारपिटीचा फटका : वातावरणातील बदलामुळे मोहोर झडला, जुन्या आमराया होताहेत नष्ट

विष्णू दुनेदार ।लोकमत न्यूज नेटवर्कतुळशी : फळांचा राजा म्हणून आंब्याच्या फळाची संपूर्ण भारतात ओळख आहे. मात्र वातावरणातील बदलामुळे यावर्षी आंब्याच्या झाडांना फार कमी मोहर आला. १५ दिवसांपूर्वी झालेल्या गारपीठमुळे असलेला मोहरही झडून गेला. त्यामुळे आता आंब्याच्या झाडाला फारच कमी कैऱ्या लागल्या आहेत. काही झाडांना तर एकही कैरी दिसत नाही. केवळ हिरवेगार आंब्याचे झाड दिसून येते. आंब्याचे उत्पादन घटणार असल्याने आंब्याचे भाव गगणाला भिडतील. त्यामुळे खवय्यांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहे.गडचिरोली जिल्ह्यात संकरित आंब्यांच्या फळबागा फार कमी प्रमाणात आहेत. गावठी आंब्याची झाडे आहेत. तसेच काही गावांमध्ये आमराई आहे. फेब्रुवारी महिन्याला सुरूवात होताच आबालवृद्धांचे लक्ष आमराईकडे जाते. जानेवारी महिन्यात आंब्याच्या झाडांना मोहर येते. मोहरामुळे हिरवे आंब्याचे झाड पिवळे झुंज दिसायला लागतात. मात्र यावर्षी वातावरणात झालेल्या बदलाचा मोठा फटका आंबा व मोहाला बसला. यावर्षी पावसाळ्यात सतत दोन महिने पाऊस पडला. त्यानंतर हिवाळ्यातही अधूनमधून ढगाळ वातावरण राहत असल्याने पाहिजे तशी थंडी पडली नाही. ढगाळ वातावरणामुळे आंब्याच्या झाडाला मोहर आले नाही. त्यानंतर मार्च महिन्यात दोन ते तीनवेळा गारपीट झाली. गारपीटचा मोठा फटका मोहराला बसला. आंब्याच्या झाडावरील संपूर्ण मोहोर झडला. त्यामुळे आता झाडाला कैºया नाहीत.गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आंब्याची झाडे होती. मात्र शेतीसाठी या झाडांची कत्तल झाली. मात्र काही गावांमध्ये आमराई शिल्लक आहे. नवीन झाडांची लागवड होत असल्याने आमराई नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे गावठी आंब्याची चव पुढच्या पिढीला चाखायला मिळणे जवळपास कठीण आहे. परिणामी शहरातील बरेचसे लोक आपल्या अंगणात आंब्याचे रोपटे लावतात.आंब्याविना झाली गुढीपाडव्याची पूजागुढीपाडव्याच्या सणाला आंब्याची पूजा करून गुढी उभारली जाते. तसेच या दिवशी विविध कडधान्यांचा उसळ व आंब्याचा पणा किंवा चटणी करण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे. वयोवृद्ध नागरिक गुढीपाडव्याचा सण झाल्याशिवाय आंबा खात नाही. त्यामुळेच गुढीपाडव्याच्या सणाला आंब्याचे महत्त्व आहे. मात्र यावर्षी कच्चे आंबे बाजारपेठेत आले नाही. त्यामुळे आंब्याच्या फळाविनाच गुढीपाडव्याची पूजा करावी लागली.गुढी पाडव्याच्या दिवशी गडचिरोली शहरात काही मोजके विक्रेते गावठी आंब्याची विक्री करीत होते. मात्र आंब्याचा भाव वधारलेला होता. ४० रुपये पाव या दराने गांधी चौकात आंबे विकली जात होती. शेतकऱ्यांकडूनच आंब्याचे भाव वाढून आल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

टॅग्स :Mangoआंबा