शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
2
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
3
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
4
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
5
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
6
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
7
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
8
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
9
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
10
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
11
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
12
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
13
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
14
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
15
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
16
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
17
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
19
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
20
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण

जंगलातील पाणवठ्यात टँकरने पाणी पुरवठा

By admin | Updated: April 8, 2015 01:10 IST

दिवसेंदिवस उन्हाची दाहकता वाढत असल्याने सर्वत्र पाणी टंचाईची समस्या निर्माण होत आहे.

चामोर्शी : दिवसेंदिवस उन्हाची दाहकता वाढत असल्याने सर्वत्र पाणी टंचाईची समस्या निर्माण होत आहे. त्यातच भूगर्भातील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे वन विभागाने निर्माण केलेल्या जंगलातील पाणवठे कोरडे पडले आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांची गावाकडे भटकंती सुरू आहे. यावर उपाययोजना म्हणून चामोर्शी वन परिक्षेत्र कार्यालयाने जंगलातील २३ कृत्रिम पाणवठ्यात वन विभागाच्या टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचा उपक्रम गेल्या काही दिवसांपासून हाती घेतला आहे. चामोर्शी वन परिक्षेत्रांतर्गत २० नियत क्षेत्र असून यामध्ये ८० गावांचा समावेश आहे. या वन परिक्षेत्रातील जंगलाचे व वन्यप्राण्यांच्या रक्षणासाठी एक वन परिक्षेत्राधिकारी, तीन क्षेत्र सहायक, २९ वनरक्षक, आठ वनमजूर कार्यरत आहेत. यंदा भरपूर पाऊस होऊनही एप्रिल महिन्यापासून बहुतांश भागात पाणीटंचाई समस्या निर्माण झाली आहे. अनेक गावानजीक तसेच जंगल परिसरातील तलाव, बोडी, नाले, कोरडे पडत असल्याने वन्यप्राणी व गावातील जनावरांनाही पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. जंगल परिसरात असलेले पाण्याचे स्त्रोत उन्हाच्या दाहकतेमुळे पूर्णत: कोरडे पडले आहे. परिणामी पाण्याच्या शोधात वन्यप्राणी व जनावरे गावाकडे धाव घेतात. यामुळे शिकारीचे प्रमाण वाढले आहे. याला आळा घालण्यासाठी वन्यप्राण्यांना जंगल परिसरात पाण्याची सुविधा व्हावी, याकरिता चामोर्शी वन परिक्षेत्र कार्यालयामार्फत चामोर्शी उपक्षेत्रातील सोनापूर अड्याळ, वाकडी, भिक्षी, हळदी, विसापूर, तसेच जामगिरी उपक्षेत्रात जामगिरी, गहूबोडी, नारायणपूर, राजगोपालपूर तसेच भाडभिडी उपक्षेत्रात कर्कापल्ली व हळदवाही गावानजीकच्या जंगल परिसरात वन विभागाच्या वतीने २३ कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले असून या पाणवठ्यामध्ये टँकरच्या सहाय्याने पाणी पुरवठा केला जात आहे. या उपक्रमासाठी चामोर्शीचे वन परिक्षेत्राधिकारी शंकर गाजलवार, क्षेत्र सहायक संजय पेंपकवार, आर. के. जल्लेवार, शंकर गुरनुले यांच्या मार्गदर्शनात वनरक्षक व वनमजूर जंगलातील पाणवठ्यांस पाणी पुरवठा करण्याचे काम करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)