शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
3
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
4
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
5
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
6
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
7
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
8
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
9
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
10
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
11
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
12
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
13
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
14
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
15
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
16
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
17
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
18
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
19
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
20
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...

पाच हजारात गुंडाळले जाताहेत तेंदू लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 00:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : तेंदूपत्ता लिलावाच्या तिसऱ्या फेरीत काही गावांचे लिलाव होत आहेत. मात्र या लिलावात केवळ ५ हजार ते ५ हजार ५०० प्रती स्टॅन्डर्ड बॅग भाव मिळत असल्याने गावकऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र पर्याय नसल्याने ठेकेदार बोलेल तेवढ्या किमतीला लिलाव सोडावा लागत आहे.मागील वर्षी तेंदूपत्ता लिलावाच्या कालावधीत ...

ठळक मुद्देमागील वर्षीच्या तुलनेत चारपट कमी भाव : कंत्राटदारांकडून अत्यल्प प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : तेंदूपत्ता लिलावाच्या तिसऱ्या फेरीत काही गावांचे लिलाव होत आहेत. मात्र या लिलावात केवळ ५ हजार ते ५ हजार ५०० प्रती स्टॅन्डर्ड बॅग भाव मिळत असल्याने गावकऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र पर्याय नसल्याने ठेकेदार बोलेल तेवढ्या किमतीला लिलाव सोडावा लागत आहे.मागील वर्षी तेंदूपत्ता लिलावाच्या कालावधीत देशाच्या तेंदूपत्ता बाजारात प्रचंड तेजी होती. ही तेजी वर्षभर कायम राहिल. हा अंदाज बांधून तेंदूपत्ता कंत्राटदारांनी सुमारे १५ ते २२ हजार रूपये एवढा प्रती स्टॅन्डर्ड बॅग भाव देऊन तेंदूपत्ता खरेदी केला. मात्र तेंदूपत्ता संकलनाच्या तीन ते चार महिन्यानंतर तेंदूपत्त्याची मागणी व भाव दोन्ही कमी झाले. परिणामी मागील वर्षीचा काही तेंदूपत्ता अजुनही गोदामात पडून आहे. भावही घसरल्याने कंत्राटदारांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे यावर्षी कंत्राटदारांनी पहिल्या दोन लिलावांमध्ये सहभागच घेतला नाही. तिसऱ्या फेरीच्या लिलावासाठी काही गावांमध्ये कंत्राटदारांनी बोली लावली. मात्र सदर बोली ५ हजार ते ५ हजार ५०० एवढ्या दरम्यानच आहे. मागील वर्षीच्या तुलनेत केवळ २५ टक्के एवढाच भाव यावर्षी मिळाला आहे. मात्र नाईलाज असल्याने कंत्राटदार बोलेल तेवढ्याला लिलाव सोडावा लागत आहे. कोरची तालुक्यातील १०५ व धानोरा तालुक्यातील ८४ ग्रामसभांचे लिलाव झाले आहेत. या ग्रामसभांना ५ हजार ते ५ हजार ५०० दरम्यानचाच भाव मिळाला आहे. त्यामुळे इतर ग्रामसभांनाही यापेक्षा अधिक भाव मिळण्याची आशा धुसर झाली आहे.बहुतांश ग्रामसभांना लिलावाची प्रतीक्षाचकोरची व धानोरा तालुक्यातील काही ग्रामसभांच्या तेंदूपत्त्याचे लिलाव पार पडले आहेत. त्यांना कमी का होईना उत्पन्न मिळणार आहे. मात्र १५ दिवसांवर तेंदूपत्ता तोडणीचा हंगाम आला असताना अजूनपर्यंत एटापल्ली, भामरागड, सिरोंचा, कुरखेडा तालुक्यातील ग्रामसभांचे लिलाव झाले नाही. त्यामुळे ग्रामसभांचे पदाधिकारी चिंतेत पडले आहेत. कंत्राटदार न मिळाल्यास लाखो रूपयांचे उत्पन्न बुडणार आहे. याचा मोठा फटका ग्रामसभांना बसणार आहे. काही ग्रामसभांचे पदाधिकारी स्वत: कंत्राटदारांशी संपर्क साधून तेंदूपत्त्याच्या लिलाव प्रक्रियेत भाग घेण्यासाठी निमंत्रीत करीत असल्याचे दिसून येत आहे.