शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
6
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
7
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
8
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
9
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
10
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
11
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
12
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
13
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
14
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
15
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
16
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
17
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
18
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
19
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
20
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय

पाच हजारात गुंडाळले जाताहेत तेंदू लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 00:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : तेंदूपत्ता लिलावाच्या तिसऱ्या फेरीत काही गावांचे लिलाव होत आहेत. मात्र या लिलावात केवळ ५ हजार ते ५ हजार ५०० प्रती स्टॅन्डर्ड बॅग भाव मिळत असल्याने गावकऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र पर्याय नसल्याने ठेकेदार बोलेल तेवढ्या किमतीला लिलाव सोडावा लागत आहे.मागील वर्षी तेंदूपत्ता लिलावाच्या कालावधीत ...

ठळक मुद्देमागील वर्षीच्या तुलनेत चारपट कमी भाव : कंत्राटदारांकडून अत्यल्प प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : तेंदूपत्ता लिलावाच्या तिसऱ्या फेरीत काही गावांचे लिलाव होत आहेत. मात्र या लिलावात केवळ ५ हजार ते ५ हजार ५०० प्रती स्टॅन्डर्ड बॅग भाव मिळत असल्याने गावकऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र पर्याय नसल्याने ठेकेदार बोलेल तेवढ्या किमतीला लिलाव सोडावा लागत आहे.मागील वर्षी तेंदूपत्ता लिलावाच्या कालावधीत देशाच्या तेंदूपत्ता बाजारात प्रचंड तेजी होती. ही तेजी वर्षभर कायम राहिल. हा अंदाज बांधून तेंदूपत्ता कंत्राटदारांनी सुमारे १५ ते २२ हजार रूपये एवढा प्रती स्टॅन्डर्ड बॅग भाव देऊन तेंदूपत्ता खरेदी केला. मात्र तेंदूपत्ता संकलनाच्या तीन ते चार महिन्यानंतर तेंदूपत्त्याची मागणी व भाव दोन्ही कमी झाले. परिणामी मागील वर्षीचा काही तेंदूपत्ता अजुनही गोदामात पडून आहे. भावही घसरल्याने कंत्राटदारांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे यावर्षी कंत्राटदारांनी पहिल्या दोन लिलावांमध्ये सहभागच घेतला नाही. तिसऱ्या फेरीच्या लिलावासाठी काही गावांमध्ये कंत्राटदारांनी बोली लावली. मात्र सदर बोली ५ हजार ते ५ हजार ५०० एवढ्या दरम्यानच आहे. मागील वर्षीच्या तुलनेत केवळ २५ टक्के एवढाच भाव यावर्षी मिळाला आहे. मात्र नाईलाज असल्याने कंत्राटदार बोलेल तेवढ्याला लिलाव सोडावा लागत आहे. कोरची तालुक्यातील १०५ व धानोरा तालुक्यातील ८४ ग्रामसभांचे लिलाव झाले आहेत. या ग्रामसभांना ५ हजार ते ५ हजार ५०० दरम्यानचाच भाव मिळाला आहे. त्यामुळे इतर ग्रामसभांनाही यापेक्षा अधिक भाव मिळण्याची आशा धुसर झाली आहे.बहुतांश ग्रामसभांना लिलावाची प्रतीक्षाचकोरची व धानोरा तालुक्यातील काही ग्रामसभांच्या तेंदूपत्त्याचे लिलाव पार पडले आहेत. त्यांना कमी का होईना उत्पन्न मिळणार आहे. मात्र १५ दिवसांवर तेंदूपत्ता तोडणीचा हंगाम आला असताना अजूनपर्यंत एटापल्ली, भामरागड, सिरोंचा, कुरखेडा तालुक्यातील ग्रामसभांचे लिलाव झाले नाही. त्यामुळे ग्रामसभांचे पदाधिकारी चिंतेत पडले आहेत. कंत्राटदार न मिळाल्यास लाखो रूपयांचे उत्पन्न बुडणार आहे. याचा मोठा फटका ग्रामसभांना बसणार आहे. काही ग्रामसभांचे पदाधिकारी स्वत: कंत्राटदारांशी संपर्क साधून तेंदूपत्त्याच्या लिलाव प्रक्रियेत भाग घेण्यासाठी निमंत्रीत करीत असल्याचे दिसून येत आहे.