शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

तालुका औद्योगिक वसाहती रखडल्या

By admin | Updated: February 9, 2016 01:07 IST

देशासह राज्यात व जिल्ह्यातही मेक इन इंडिया कार्यक्रम जोरात राबविण्यात येत आहे.

मेक इन गडचिरोलीतही काम थंडच : देसाईगंज वसाहतीसाठी शासनाला भरावे लागणार पैसेगडचिरोली : देशासह राज्यात व जिल्ह्यातही मेक इन इंडिया कार्यक्रम जोरात राबविण्यात येत आहे. गडचिरोली जिल्ह्यातही औद्योगिक विकासाला वाव देण्यासाठी राज्य व केंद्र सरकार प्रयत्न करीत असल्याचे चित्र असले, तरी नवीन सरकारच्या दीड वर्षाच्या काळात जिल्ह्यातील तालुका औद्योगिक वसाहतीचा प्रश्न मात्र प्रलंबित असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बेरोजगार तरूणांची आपल्या परिसरात उद्योग टाकण्याचे स्वप्न भंगण्याची स्थिती आहे. आघाडी सरकारच्या काळात गडचिरोली औद्योगिक वसाहतीशिवाय कुरखेडा अहेरी, धानोरा या तीन ठिकाणी तालुका औद्योगिक वसाहती निर्माण करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार कुरखेडा, धानोरा व अहेरी येथे वसाहतीसाठी जागाही निश्चित करण्यात आली होती. मात्र कुरखेडा येथील एमआयडीसीत मागणी आली नसल्याने येथे जागा वाटप करण्यात आली नाही, अशी भूमिका शासन व प्रशासनाने घेतली आहे. अहेरी येथे ९.२८ हेक्टर जागा एमआयडीसीसाठी अधिग्रहीत करण्यात आली आहे. या ठिकाणी केवळ तीन उद्योगांनी नोंदणी केली असली तरी उद्योग सुरू झाले नाही. त्यामुळे एमआयडीसी सुरू होऊ शकली नाही, अशी माहिती देण्यात येत आहे. धानोरा येथेही औद्योगिक वसाहतीचा फलक तेवढा उभा आहे. येथे एकही उद्योग सुरू होऊ शकलेला नाही. मागील १० ते १५ वर्षांपासून ही स्थिती आहे. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना तत्कालीन उद्योगमंत्री नारायण राणे यांनी देसाईगंज येथे औद्योगिक वसाहत सुरू करण्याची घोषणा विधीमंडळाच्या अधिवेशनात केली होती.रेल्वेमार्ग उपलब्ध असलेल्या वडसा येथे एमआयडीसी स्थापन करण्यासाठी सध्या पशुसंवर्धन विभागाच्या ताब्यात असलेली विसोरा परिसरातील २०० हेक्टर आर जमीन एमआयडीसी विभागाने मागितली आहे. सदर जागा मिळविण्यासाठी शासनाला एनपीव्हीपोटी पशुसंवर्धन विभागाला २१.५४ कोटी रूपये अदा करावी लागणार आहे. तसा प्रस्तावही शासनाला सादर करण्यात आला आहे. या जागेसाठी राज्य सरकारला रक्कम उपलब्ध करून द्यावी लागेल. तेव्हाच पशुपैदास केंद्राच्या जागेवर एमआयडीसी उभी करण्याचा मार्ग सुकर होईल. चामोर्शी तालुक्यात आष्टी व देसाईगंज येथे जागा मिळविण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती डीपीडीसीच्या बैठकीत सप्टेंबर महिन्यात घेण्यात आली होती. मात्र त्यानंतर काम पुढे गेले नाही. एकूणच जिल्ह्याच्या तालुकास्तरावरील औद्योगिक वसाहतीच्या कामाबाबत राज्य सरकार उदासीन असल्याचे दिसत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)