शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
2
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
5
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
6
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
7
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
8
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
9
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
10
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
11
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
12
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
13
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
14
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
15
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
16
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
17
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
18
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
19
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
20
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही

रंगली चर्चा पालकमंत्र्यांची

By admin | Updated: November 2, 2014 22:33 IST

भाजप सरकार सत्तारूढ झाल्यानंतर गडचिरोली या मागास जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार याची चर्चा शहराच्या पानटपरीपासून ते गावाच्या चावडीपर्यंत रंगू लागली आहे. २००९ मध्ये

वजनदार मंत्री द्या : मागील पाच वर्ष आर. आर. पाटील यांनी सांभाळली धुरागडचिरोली : भाजप सरकार सत्तारूढ झाल्यानंतर गडचिरोली या मागास जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार याची चर्चा शहराच्या पानटपरीपासून ते गावाच्या चावडीपर्यंत रंगू लागली आहे. २००९ मध्ये ५१ पोलीस जवान शहीद झाल्यानंतर गडचिरोली जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची धुरा तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आपल्याकडे लादून घेतली. विधानसभेत गडचिरोलीच्या कायदा सुव्यवस्थेवर वादळी चर्चा झाल्यानंतर पाटील यांनी हा निर्णय घेतला. त्यावेळी विरोधी बाकावर असलेले सुधीर मुनगंटीवार यांचा याबाबत खास आग्रह होता. आता मुनगंटीवार हे राज्याचे कॅबिनेट मंत्री झाले आहे. भाजपच्या सरकारात गडचिरोली या मागास जिल्ह्याला पालकमंत्री कोण मिळतो, याची चर्चा सध्या जिल्ह्याच्या सर्व भागात रंगत आहे. २००९ मध्ये अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना गडचिरोलीच्या पालकत्व पदाची जबाबदारी आर. आर. पाटील यांनी आपल्यावर लादून घेतली. गडचिरोलीच्या विकासाला चालना देण्यासाठी पाटील यांनी प्रयत्नही केलेत. परंतु या भागाचा हवा तसा विकास झाला नाही. अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहे. गडचिरोली जिल्हा हा मुंबईच्या हिशोबात अजुनही ३० ते ३५ वर्ष मागे आहे. महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्याच बैठकीनंतर मागास भागाच्या विकासाकडे आपले लक्ष राहिल, असे जाहीर केले आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाला चालना देण्यासोबतच या भागात रेल्वे, हवाईपट्टी, सिंचनाचे प्रश्न, औद्योगिक विकास तसेच पायाभूत सुविधा निर्माण करणे या कामांचे मोठे आव्हान आहे. त्यामुळे या जिल्ह्यासाठी तडफदार व धडाडीचा पालकमंत्री मिळणेही आवश्यक आहे. विदर्भातील माणूस जर गडचिरोलीचा पालकमंत्री झाला तर विकासाला अधिक चालना मिळेल, असा विश्वास या जिल्ह्यातील जनतेला आहे. आर. आर. पाटील पालकमंत्री असताना त्यांनी जनतेपेक्षा अधिकाऱ्यांचे ऐकूण नियोजन करण्यावर भर दिला. त्यामुळे जनतेत मोठी नाराजी त्यांच्याविषयी होती. त्यांनी प्रत्येक महिन्याला गडचिरोलीला भेट देऊन आपले कर्तव्य पार पाडले. मात्र सर्वसामान्य माणसापर्यंत विकासाचे चित्र त्यांना निर्माण करता आले नाही. त्यामुळे आता नव्या सरकारच्या पालकमंत्र्यांकडून जनतेला मोठ्या अपेक्षा आहे. चांगला व अभ्यासू पालकमंत्री गडचिरोलीला लाभावा, अशी आशा जनता व्यक्त करीत आहे. सुधीर मुनगंटीवार यांचे नावही पालकमंत्री पदासाठी सर्वसामान्यांमध्ये चर्चेत आहे. त्यांनीच त्यावेळी आर. आर. पाटील यांना आव्हान देऊन पालकमंत्री पदाची धुरा घ्यायला लावली होती. मुनगंटीवार यांनी आता स्वत: जिल्ह्याचे पालकत्व घ्यावे, असा एक विचारप्रवाह आहे. मुनगंटीवार यांच्याकडे वनखाते देण्यात आले आहे. गडचिरोली जिल्ह्यात ७८ टक्के जंगल आहे. वनखात्याच्या अडसरामुळे येथील अनेक सिंचन प्रकल्प रखडलेले आहेत. त्यामुळे त्यांनी पालकत्व घेतल्यास या जिल्ह्याला न्याय देणे शक्य होईल, असा मतप्रवाह नागरिकांमध्ये आहे. युतीचे सरकार असताना शिवसेनेचा मंत्री गडचिरोलीचा पालकमंत्री होता. या काळात गजानन किर्तीकर यांनी पालकमंत्री पद सांभाळले होते. आताही सेना-भाजपची युती होऊ घातली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या वाट्याला पालकमंत्री पद जाते काय? अशीही जनमाणसात चर्चा आहे. मात्र सध्या जिल्ह्यात तिनही आमदार भाजपचे तसेच खासदारही भाजपचेच आहे. त्यामुळे भाजपचा पालकमंत्री होईल, असा भाजपचा दावा आहे. (जिल्हा प्रतिनिधी)