शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

रंगली चर्चा पालकमंत्र्यांची

By admin | Updated: November 2, 2014 22:33 IST

भाजप सरकार सत्तारूढ झाल्यानंतर गडचिरोली या मागास जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार याची चर्चा शहराच्या पानटपरीपासून ते गावाच्या चावडीपर्यंत रंगू लागली आहे. २००९ मध्ये

वजनदार मंत्री द्या : मागील पाच वर्ष आर. आर. पाटील यांनी सांभाळली धुरागडचिरोली : भाजप सरकार सत्तारूढ झाल्यानंतर गडचिरोली या मागास जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार याची चर्चा शहराच्या पानटपरीपासून ते गावाच्या चावडीपर्यंत रंगू लागली आहे. २००९ मध्ये ५१ पोलीस जवान शहीद झाल्यानंतर गडचिरोली जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची धुरा तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आपल्याकडे लादून घेतली. विधानसभेत गडचिरोलीच्या कायदा सुव्यवस्थेवर वादळी चर्चा झाल्यानंतर पाटील यांनी हा निर्णय घेतला. त्यावेळी विरोधी बाकावर असलेले सुधीर मुनगंटीवार यांचा याबाबत खास आग्रह होता. आता मुनगंटीवार हे राज्याचे कॅबिनेट मंत्री झाले आहे. भाजपच्या सरकारात गडचिरोली या मागास जिल्ह्याला पालकमंत्री कोण मिळतो, याची चर्चा सध्या जिल्ह्याच्या सर्व भागात रंगत आहे. २००९ मध्ये अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना गडचिरोलीच्या पालकत्व पदाची जबाबदारी आर. आर. पाटील यांनी आपल्यावर लादून घेतली. गडचिरोलीच्या विकासाला चालना देण्यासाठी पाटील यांनी प्रयत्नही केलेत. परंतु या भागाचा हवा तसा विकास झाला नाही. अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहे. गडचिरोली जिल्हा हा मुंबईच्या हिशोबात अजुनही ३० ते ३५ वर्ष मागे आहे. महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्याच बैठकीनंतर मागास भागाच्या विकासाकडे आपले लक्ष राहिल, असे जाहीर केले आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाला चालना देण्यासोबतच या भागात रेल्वे, हवाईपट्टी, सिंचनाचे प्रश्न, औद्योगिक विकास तसेच पायाभूत सुविधा निर्माण करणे या कामांचे मोठे आव्हान आहे. त्यामुळे या जिल्ह्यासाठी तडफदार व धडाडीचा पालकमंत्री मिळणेही आवश्यक आहे. विदर्भातील माणूस जर गडचिरोलीचा पालकमंत्री झाला तर विकासाला अधिक चालना मिळेल, असा विश्वास या जिल्ह्यातील जनतेला आहे. आर. आर. पाटील पालकमंत्री असताना त्यांनी जनतेपेक्षा अधिकाऱ्यांचे ऐकूण नियोजन करण्यावर भर दिला. त्यामुळे जनतेत मोठी नाराजी त्यांच्याविषयी होती. त्यांनी प्रत्येक महिन्याला गडचिरोलीला भेट देऊन आपले कर्तव्य पार पाडले. मात्र सर्वसामान्य माणसापर्यंत विकासाचे चित्र त्यांना निर्माण करता आले नाही. त्यामुळे आता नव्या सरकारच्या पालकमंत्र्यांकडून जनतेला मोठ्या अपेक्षा आहे. चांगला व अभ्यासू पालकमंत्री गडचिरोलीला लाभावा, अशी आशा जनता व्यक्त करीत आहे. सुधीर मुनगंटीवार यांचे नावही पालकमंत्री पदासाठी सर्वसामान्यांमध्ये चर्चेत आहे. त्यांनीच त्यावेळी आर. आर. पाटील यांना आव्हान देऊन पालकमंत्री पदाची धुरा घ्यायला लावली होती. मुनगंटीवार यांनी आता स्वत: जिल्ह्याचे पालकत्व घ्यावे, असा एक विचारप्रवाह आहे. मुनगंटीवार यांच्याकडे वनखाते देण्यात आले आहे. गडचिरोली जिल्ह्यात ७८ टक्के जंगल आहे. वनखात्याच्या अडसरामुळे येथील अनेक सिंचन प्रकल्प रखडलेले आहेत. त्यामुळे त्यांनी पालकत्व घेतल्यास या जिल्ह्याला न्याय देणे शक्य होईल, असा मतप्रवाह नागरिकांमध्ये आहे. युतीचे सरकार असताना शिवसेनेचा मंत्री गडचिरोलीचा पालकमंत्री होता. या काळात गजानन किर्तीकर यांनी पालकमंत्री पद सांभाळले होते. आताही सेना-भाजपची युती होऊ घातली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या वाट्याला पालकमंत्री पद जाते काय? अशीही जनमाणसात चर्चा आहे. मात्र सध्या जिल्ह्यात तिनही आमदार भाजपचे तसेच खासदारही भाजपचेच आहे. त्यामुळे भाजपचा पालकमंत्री होईल, असा भाजपचा दावा आहे. (जिल्हा प्रतिनिधी)