शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

लॅपटॉपमध्ये तलाठी नापास

By admin | Updated: December 29, 2014 23:43 IST

पेपरलेस कामकाज वाढविण्याच्या दृष्टीने शासनाने संपूर्ण महाराष्ट्रातील तलाठ्यांना लॅपटॉप किंवा संगणक पुरविले़ मात्र संगणक निरक्षरतेमुळे जिल्ह्यातील ३० टक्के तलाठी संगणक,

देसाईगंज : पेपरलेस कामकाज वाढविण्याच्या दृष्टीने शासनाने संपूर्ण महाराष्ट्रातील तलाठ्यांना लॅपटॉप किंवा संगणक पुरविले़ मात्र संगणक निरक्षरतेमुळे जिल्ह्यातील ३० टक्के तलाठी संगणक, लॅपटॉप हाताळण्यात असमर्थ आहेत़ शासकीय खर्चातून मिळालेला संगणक मात्र तलाठ्यांच्या घराची शोभा वाढवित आहेत. मात्र याकडे महसूल व सबंधीत विभागाचे दुर्लक्ष होत आहे़सातबारा, नमुना आठ किंवा गावातील इतर बाबींची माहिती कळ दाबताच डोळ्यासमोर आली पाहिजे़ यादृष्टीने शासनाने राज्यभरातील तलाठ्यांना शासकीय खर्चातून संगणक किंवा लॅपटॉप पुरविले़ तलाठ्यांनी मोठ्या हिंमतीने लॅपटॉप आपल्या ताब्यात देखील घेतले. मात्र जिल्ह्यातील तीस टक्के तलाठ्यांना संगणकाचे प्राथमिक ज्ञान देखील नसल्यामुळे शासकीय अनुदानातून मिळालेले लॅपटॉप तलाठ्यांच्या घरांची शोभा वाढवित आहेत.़ संगणकाचे प्राथमिक ज्ञान नसणारे तलाठी शासनाकडून घेतल्या जाणारी एमएससीआयटी ही परीक्षा मात्र उत्तीर्ण आहेत़ याबाबत आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे़ अनेक तलाठ्यांनी शासकीय लॉपटॉप आपल्या पाल्यांना दिले आहेत़. देसाईगंज तालुक्यात तर केवळ दोन तलाठी संगणक हाताळून आपला कार्यभार चालवित आहेत़. तलाठ्यांच्या संगणक निरक्षरतेमुळे साधा सात-बारा उतारा हातोहाती तयार करावा लागत आहे़ मात्र याकडे महसूल विभागाच्या कोणत्याही अधिकाऱ्यांनी साधे लक्ष देण्याची तसदीसुध्दा घेतलेली नाही़ आधुनिक युगात संगणक साक्षरता अतिशय आवश्यक आहे़. दैनंदिन व्यवहारात संगणकाचे काम पडते़ त्याकरिता शासनानेदेखील कोट्यवधींचा खर्च करून तलाठ्यांना संगणक पुरविले आहेत़ दैनंदिन कामकाजातील स्टेशनरीच्या खर्चावर यामुळे आळा बसावा तसेच शासकीय कामे पेपरलेस पध्दीने जलद होण्याकरिता शासनाने ही योजना कार्यान्वीत केली होती़ संगणकाचा पुरवठा होऊन दोन वर्षाचा कालावधी लोटला आहे़ अनेक तलाठी कार्यालयात संगणक पोहोचले आहेत. तर अनेक कार्यालयांना संगणकाची अद्यापही प्रतीक्षा आहे. तलाठी कार्यातील काम तीव्र गतीने चालावे, या उद्देशाने संगणक पुरविण्यात आले आहेत. मात्र शासकीय स्तरावर एमएससीआयटीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या तलाठ्यांनी स्वत:च्या कार्यालयातून लॅपटॉपला हद्दपार केले आहे. (वार्ताहर)