शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

तलाठी कार्यालय झाले कुलूपबंद

By admin | Updated: April 28, 2016 01:03 IST

जिल्हाभरातील तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी ११ एप्रिलपासून टप्प्याटप्प्याने आंदोलन सुरू केले आहे.

शेतकऱ्यांचे हाल : खरिपाच्या तोंडावर सातबारा मिळेनावैरागड/आष्टी : जिल्हाभरातील तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी ११ एप्रिलपासून टप्प्याटप्प्याने आंदोलन सुरू केले आहे. २६ एप्रिलपासून तलाठी व मंडळ अधिकारी बेमुदत संपावर गेले आहेत. परिणामी साऱ्याच तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालय कुलूपबंद झाले आहेत. यामुळे ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर सातबारा व गाव नमूना आठ अ प्रमाणपत्रासाठी शेतकऱ्यांची प्रचंड पंचाईत होत आहे. १५ दिवसांवर खरीप हंगाम येऊन पोहोचला आहे. दुष्काळ परिस्थितीवर मात करून पुन्हा नव्या उमेदीने सहकारी संस्थांकडून पीक कर्ज घेऊन खरीप हंगामात धान व इतर पिकांची लागवड करण्याचे नियोजन शेतकऱ्यांनी केले आहे. मात्र पीक कर्जासाठी बँका व सहकारी संस्था सर्वच शेतकऱ्यांना सातबारा व गाव नमूना आठ अ प्रमाणपत्राची मागणी करीत आहेत. मात्र तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांच्या आंदोलन व संपामुळे सातबारा मिळणे कठीण झाले आहे. परिणामी संपूर्ण जिल्हाभरात पीक कर्जाची प्रक्रिया रखडली आहे. तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी आपल्या रास्त मागण्यांसाठी आंदोलन पुकारले आहे. मात्र याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. सातबारा व गाव नमूना आठ अ प्रमाणपत्राअभावी शेतकऱ्यांना पीक कर्ज घेण्यास यंदा विलंब होणार आहे. परिणामी शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. (वार्ताहर) विद्यार्थ्यांचीही अडचणसन २०१६-१७ या सत्रातील शाळा, महाविद्यालय प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना तलाठ्यांकडून मिळणारे रहिवासी व उत्पन्नाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. या प्रमाणपत्रासाठी जिल्हाभरातील हजारो विद्यार्थी संबंधित तलाठी कार्यालयाकडे चकरा मारीत आहेत. मात्र तलाठी संपावर गेल्यामुळे विद्यार्थी प्रचंड अडचणीत सापडले आहेत.