शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
2
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
3
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
4
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
5
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
6
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
7
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
8
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
9
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
10
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
11
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
12
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
13
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
14
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
15
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
16
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
17
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
18
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
19
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
20
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?

जिल्हाभरातील तलाठी आंदोलनावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 00:31 IST

विविध मागण्यांसाठी जिल्हाभरातील तलाठ्यांनी टप्प्याटप्प्याने आंदोलन सुरू केले आहे. सोमवारी एकदिवसीय धरणे आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. पुरवठा विभागाची स्वतंत्र आकृतीबंद असताना महसूल विभागातील कर्मचाऱ्यांना पुरवठा विभागात नियमबाह्यपणे पदोन्नती देण्यात आली आहे.

ठळक मुद्देशासकीय कामे ठप्प : १९ आॅगस्टपासून बेमुदत काम बंद करण्याचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : विविध मागण्यांसाठी जिल्हाभरातील तलाठ्यांनी टप्प्याटप्प्याने आंदोलन सुरू केले आहे. सोमवारी एकदिवसीय धरणे आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.पुरवठा विभागाची स्वतंत्र आकृतीबंद असताना महसूल विभागातील कर्मचाऱ्यांना पुरवठा विभागात नियमबाह्यपणे पदोन्नती देण्यात आली आहे. याची चौकशी करावी, १२ व २४ वर्ष सेवा झालेल्या तलाठी व मंडळ अधिकारी यांना कालबद्ध पदोन्नतीचा लाभ द्यावा. मंडळ अधिकारी संवर्गाच्या गोपनीय अहवालाच्या नस्ती आस्थापन शाखेतून गहाळ झाल्याबाबत संबंधितांवर जबाबदारी निश्चित करावी. तलाठ्यांचे स्थायीकरणाचे आदेश द्यावेत. तलाठ्यांच्या उपविभागाबाहेर विनंती बदल्या कराव्या. अतिरिक्त साजाचा कार्यभार असलेल्या तलाठी व मंडळ अधिकारी यांना अतिरिक्त सादील भत्ता व मेहनताना द्यावा. मंडळ अधिकारी, अव्वल कारकून, परस्पर अदलाबदलीच्या कालबाह्य धोरणाची अंमलबजावणी थांबवावी. सेवा ज्येष्ठता यादी विहीत कालावधीत प्रसिद्ध करावी. व्हॉट्सअ‍ॅप किंवा सोशल मीडियाद्वारे दिलेले अतितत्काळ आदेश पाळणे बंधनकारक करू नये. कोतवालांचे आदेश तलाठी कार्यालयात करताना परत न झालेल्या कोतवालांच्याबाबत तहसीलदार यांच्या प्रमाणपत्राची योग्य चौकशी करावी. जमिनविषयीची बरीच माहिती आॅनलाईन आहे. निवडणूक, नैसर्गिक आपत्ती या कामाव्यतिरिक्त इतर शासकीय कामे सुट्टीच्या दिवशी व रात्री करण्यासाठी सक्ती करू नये. कोणत्याही विभागाची कामे पटवारी, मंडळ अधिकारी वर्गावर लादली जातात. ती कामे ज्या विभागाशी संबंधित आहेत, त्यांच्याकडून त्यांचा आढावा घ्यावा. फेरफारच्या नोंद एक महिन्याच्या आत निकाली काढण्याची सक्ती करू नये, मेघा कुळमेथे यांची पदस्थाना त्यांच्या मूळ पदावर आसरअल्ली येथे तलाठी म्हणून करावी आदी मागण्यांसाठी तलाठी आंदोलन करीत आहेत. सदर आंदोलन टप्प्याटप्प्याने सुरू आहे.टप्प्यानुसार सुरू आहे तलाठ्यांचे आंदोलनतलाठ्यांच्या मागण्या सोडवाव्या, यासाठी विदर्भ पटवारी व मंडळ अधिकारी संघ नागपूर जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने यापूर्वी अनेकवेळा आंदोलने करून निवेदने देऊन शासनाचे लक्ष वेधण्यात आले. मात्र शासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे २ व ३ आॅगस्ट रोजी जिल्हाभरातील तलाठी व मंडळ अधिकाºयांनी काळ्याफिती लावून काम केले. ५ आॅगस्ट रोजी सामूहिक रजा टाकून उपविभागस्तरावर एक दिवसाचे धरणे आंदोलन केले. ६ आॅगस्टपासून ८ आॅगस्टपर्यंत शेतकºयांची सर्व कामे केली जात आहेत. मात्र शासकीय कामे बंद ठेवण्यात आली आहेत. १३ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाईल. त्यानंतरही शासनाने तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या मागण्यांकडे लक्ष न दिल्यास १९ आॅगस्टपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. कार्यालयाच्या चाव्या अधिकाºयांकडे सोपवून बेमुदत आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला आहे.

टॅग्स :Strikeसंप