शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

भूमी अधिग्रहण विधेयक मागे घ्या

By admin | Updated: April 27, 2015 01:13 IST

केंद्र शासनाने आणलेले भूमी अधिग्रहण विधेयक मागे घेण्यात यावे, अशी मागणी

आरमोरी : केंद्र शासनाने आणलेले भूमी अधिग्रहण विधेयक मागे घेण्यात यावे, अशी मागणी तालुक्यातील मेंढा येथील शेतकऱ्यांनी तहसीलदारांच्या मार्फतीने मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.मेंढा येथील १३ शेतकऱ्यांच्या जमिनी बळजबरीने चव्हेला धरणासाठी वापरण्यात आले आहेत. त्यामुळे सदर शेतकरी भूमीहिन झाले आहेत. ही पाळी इतर शेतकऱ्यांवर येऊ नये, यासाठी केंद्र शासनाने आणलेल्या भूमी अधिग्रहण विधेयकाला या गावातील शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. विशेष म्हणजे पाच ते सहा वर्षांचा कालावधी उलटूनही या शेतकऱ्यांना अजूनपर्यंत जमिनीचा मोबदला देण्यात आला नाही. एकेकाळी सधन शेतकरी म्हणून ओळख असलेल्या या शेतकऱ्यांना आता शेतमजूर म्हणून काम करावे लागत आहे. केंद्राच्या नवीन भूमी अधिग्रहण कायद्यामध्ये शेतकऱ्यांची परवानगी न घेताच जमीन उद्योगासाठी देण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे नवीन भूमी अधिग्रहण कायद्याला राज्यशासनाने विरोध दर्शवावा, त्याचबरोबर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीही याविरोधात आंदोलन उभे करावे, अशी मागणी निवेदनातून केली आहे.निवेदन देतेवेळी मुखरू वरखडे, बाजीराव सयाम, रमेश कुळमेथे, उरकुडा राऊत, कृष्णा सिडाम, विवेश्वर दर्रो, रामसू नैताम, कोंडू कुळसंगे, बारिकराव मडावी, मोहन मडावी, गोविंदा नेवारे, चेपटू वरखडे, सीताराम पेंदाम, सितकुरा सिडाम, कुसण सिडाम, गणपत गेडाम, ऋषी पेंदाम, तुळशीराम सयाम, केशव मडकाम, मंगरू सेंदरे, लक्ष्मण नेवारे, ऋषी पेंदाम आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)