शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
5
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
6
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
7
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
8
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
9
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
10
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
11
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
12
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
13
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
14
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
15
जीएसटी कपातीचा फायदा संपत चालला...! एमजीने पहिली घोषणा केली, जानेवारीपासून कारच्या किंमतीत होणार मोठी वाढ
16
जर्मनी दौऱ्यात राहुल गांधींना Rolls-Royce ची भुरळ; भारतात 'ही' लक्झरी कार कितीला मिळते?
17
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
18
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा
19
"उंच भरारी, पण पाय जमिनीवर!" आजारी असताना एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी केली मदत; अमृता खानविलकर भारावली
20
'३ इडियट्स'च्या सीक्वलचे शीर्षक असेल '४ इडियट्स'! आमिर खानच्या सिनेमासाठी निर्माते चौथ्या अभिनेत्याच्या शोधात
Daily Top 2Weekly Top 5

भूमी अधिग्रहण विधेयक मागे घ्या

By admin | Updated: April 27, 2015 01:13 IST

केंद्र शासनाने आणलेले भूमी अधिग्रहण विधेयक मागे घेण्यात यावे, अशी मागणी

आरमोरी : केंद्र शासनाने आणलेले भूमी अधिग्रहण विधेयक मागे घेण्यात यावे, अशी मागणी तालुक्यातील मेंढा येथील शेतकऱ्यांनी तहसीलदारांच्या मार्फतीने मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.मेंढा येथील १३ शेतकऱ्यांच्या जमिनी बळजबरीने चव्हेला धरणासाठी वापरण्यात आले आहेत. त्यामुळे सदर शेतकरी भूमीहिन झाले आहेत. ही पाळी इतर शेतकऱ्यांवर येऊ नये, यासाठी केंद्र शासनाने आणलेल्या भूमी अधिग्रहण विधेयकाला या गावातील शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. विशेष म्हणजे पाच ते सहा वर्षांचा कालावधी उलटूनही या शेतकऱ्यांना अजूनपर्यंत जमिनीचा मोबदला देण्यात आला नाही. एकेकाळी सधन शेतकरी म्हणून ओळख असलेल्या या शेतकऱ्यांना आता शेतमजूर म्हणून काम करावे लागत आहे. केंद्राच्या नवीन भूमी अधिग्रहण कायद्यामध्ये शेतकऱ्यांची परवानगी न घेताच जमीन उद्योगासाठी देण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे नवीन भूमी अधिग्रहण कायद्याला राज्यशासनाने विरोध दर्शवावा, त्याचबरोबर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीही याविरोधात आंदोलन उभे करावे, अशी मागणी निवेदनातून केली आहे.निवेदन देतेवेळी मुखरू वरखडे, बाजीराव सयाम, रमेश कुळमेथे, उरकुडा राऊत, कृष्णा सिडाम, विवेश्वर दर्रो, रामसू नैताम, कोंडू कुळसंगे, बारिकराव मडावी, मोहन मडावी, गोविंदा नेवारे, चेपटू वरखडे, सीताराम पेंदाम, सितकुरा सिडाम, कुसण सिडाम, गणपत गेडाम, ऋषी पेंदाम, तुळशीराम सयाम, केशव मडकाम, मंगरू सेंदरे, लक्ष्मण नेवारे, ऋषी पेंदाम आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)