शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णांना नवजीवन देण्यासाठी पुढाकार घ्या

By admin | Updated: September 1, 2016 01:40 IST

आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. आज मानवाने विज्ञानाच्या आधाराने प्रगतीचा उच्चांक गाठला आहे.

दुर्वेश सोनवने यांचे प्रतिपादन : अवयवदानाबाबत जनजागृती चर्चासत्रगडचिरोली : आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. आज मानवाने विज्ञानाच्या आधाराने प्रगतीचा उच्चांक गाठला आहे. मात्र वातावरण, जीवन जगण्याची पद्धती, आहार यासह विविध कारणांमुळे माणूस विविध आजारांनी ग्रासला आहे. तेव्हा समाजातील विविध आजारांनी त्रस्त अशा रुग्णांना नवजीवन देण्याच्या उद्देशाने एक पाऊल प्रत्येकांनी पुढे टाकण्याची गरज आहे, असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवाने यांनी केले.महाअवयवदान संदर्भात जनमाणसांमध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशाने ३० आॅगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात अभियान राबविण्यात येत आहे. त्याअनुषांगाने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. याप्रसंगी मंचावर जि. प. चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, डॉ. शिवनाथ कुंभारे, डॉ. किरण मडावी, डॉ. प्रवीण किलनाके, डॉ. वानखेडे, डॉ. शेंद्रे, अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. मेश्राम, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे, तहसीलदार भंडारी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी नेत्रतज्ज्ञ डॉ. किरण मडावी म्हणाले, अवयवदान करणे हे अत्यंत चांगली गोष्ट असून ही आता काळाची गरज झाली आहे. आपल्या शरीरात असलेले अनमोल अवयव मृत्यूनंतरच्या संस्कारात नष्ट होतात. तेव्हा ‘मरावे परी अवयवरूपी उरावे’ या म्हणीनुसार आपल्या अवयवांना जीवंत ठेवावयाचे असेल तर दान करून सात जणांना जगण्याची आशा निर्माण करू शकता. भारत देशात ४० लाख दृष्टीहीन रुग्ण आहेत. मात्र वर्षाकाठी फक्त ३५ हजार व्यक्ती नेत्रदान करतात. त्यामुळे दृष्टीहीनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही तथाफवत दूर करण्यासाठी सर्वांनी नेत्रदानाचा संकल्प करावा, असे ते म्हणाले. (स्थानिक प्रतिनिधी)