शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
6
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
7
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

‘त्या’ नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2022 05:00 IST

मागील काही दिवसांपासून वरील दोन्ही तालुक्यांत वाघाची वाढती संख्या व सतत मानवी व पशू हल्ले होत आहेत. मानव-वन्यजीव संघर्षातून  वाघाच्या अस्तित्वावर दुष्परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी तातडीने येत्या दोन ते तीन दिवसांत नरभक्षी वाघाला पकडून जेरबंद करण्यात यावे किंवा वनविभागाला त्याला मारण्याची परवानगी देण्यात यावी. जंगलालगतच्या  शेताना वनविभागाकडून तातडीने जाळीचे कुंपण लावण्यात यावे.

लाेकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : गडचिरोली वनवृत्तातील आरमोरी व वडसा तालुक्यात होत असलेल्या वाघांच्या हल्ल्यामुळे मनुष्यहानी होत असून, वाघाचा बंदोबस्त करून तातडीने उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी आमदार कृष्णा गजबे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाधिकारी व मुख्य वनसंरक्षक यांच्याकडे पत्रकाद्वारे केली आहे.गडचिरोली वनवृत्तातील आरमोरी-वडसा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाघाचा वावर वाढलेला आहे. सद्यस्थितीत दोन्ही तालुक्यांत तेंदूपत्ता व मोहफुले संकलन करण्याचा हंगामी रोजगार सुरू असल्याने ग्रामस्थांना आपल्या उदरनिर्वाहासाठी जंगलात जाण्यावाचून पर्याय नाही. अशातच आरमोरी तालुक्यातील नलूबाई बाबूलाल जांगळे (रा. अरसोडा), नंदू  गोपाळ मेश्राम (रा. आरमोरी) या दोन व्यक्तींचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. सध्या या दोन्ही तालुक्यांत वाघांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे वनविभागाच्या नोंदीवरून दिसून येत आहे. मागील काही दिवसांपासून वरील दोन्ही तालुक्यांत वाघाची वाढती संख्या व सतत मानवी व पशू हल्ले होत आहेत. मानव-वन्यजीव संघर्षातून  वाघाच्या अस्तित्वावर दुष्परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी तातडीने येत्या दोन ते तीन दिवसांत नरभक्षी वाघाला पकडून जेरबंद करण्यात यावे किंवा वनविभागाला त्याला मारण्याची परवानगी देण्यात यावी. जंगलालगतच्या  शेताना वनविभागाकडून तातडीने जाळीचे कुंपण लावण्यात यावे. तेंदुपत्ता, मोहफुले संकलन करणारे व शेतातील धान पिकाची कापणी करणाऱ्यांना मजुरांना वनविभागाकडून सुरक्षा देण्यात यावी. शेतकऱ्यांना कापणीअभावी व वन्य प्राण्यांमुळे नुकसान झालेल्या धान, भाजीपाला व अन्य पिकांची तातडीने नुकसानभरपाई देण्यात यावी आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. आमदार गजबे यांनी आरमोरीत  उपवनसंरक्षक शर्मा यांची भेट घेऊन चर्चा करून निवेदन दिले. यावेळी पंकज खरवडे, नंदू नाकतोडे, माणिक भोयर यांचेसह कार्यकर्ते उपस्थित होते.वाघाच्या हैदाेसामुळे नागरिक भयभीत झाले असून शेतकरी ताणतणावात आहेत. वाघाचा बंदाेबस्त झाल्याशिवाय चैन पडणार नाही.

 

टॅग्स :Tigerवाघforest departmentवनविभाग