शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
3
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
4
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
5
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
6
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
7
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
8
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
9
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
10
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
11
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
12
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
13
Reliance Jio ची आपल्या ग्राहकांना मोठी भेट; फक्त ₹५९९ मध्ये घरच्या TV ला बनवा कॉम्प्यूटर
14
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
15
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...
16
Pranjal Khewalkar Arrest : मोबाईलमधून हाऊस पार्टीतील महिलांशी केलेली चॅटिंग व पार्टीचे व्हिडिओ सापडले
17
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
18
Sonam Raghuvanshi : बेवफा सोनमवर चित्रपट येणार, 'हे' नाव असणार; दिग्दर्शकाने घेतली राजा रघुवंशीच्या भावाची भेट
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Sensex १९० अंकांपेक्षा जास्त वधारला, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
शेजारी राहणाऱ्या महिलेवर केले वार, गुप्तांगावरही ओरबाडलं अन् जंगलात फेकून दिलं! तरुण का झाला हैवान?

‘त्या’ नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2022 05:00 IST

मागील काही दिवसांपासून वरील दोन्ही तालुक्यांत वाघाची वाढती संख्या व सतत मानवी व पशू हल्ले होत आहेत. मानव-वन्यजीव संघर्षातून  वाघाच्या अस्तित्वावर दुष्परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी तातडीने येत्या दोन ते तीन दिवसांत नरभक्षी वाघाला पकडून जेरबंद करण्यात यावे किंवा वनविभागाला त्याला मारण्याची परवानगी देण्यात यावी. जंगलालगतच्या  शेताना वनविभागाकडून तातडीने जाळीचे कुंपण लावण्यात यावे.

लाेकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : गडचिरोली वनवृत्तातील आरमोरी व वडसा तालुक्यात होत असलेल्या वाघांच्या हल्ल्यामुळे मनुष्यहानी होत असून, वाघाचा बंदोबस्त करून तातडीने उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी आमदार कृष्णा गजबे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाधिकारी व मुख्य वनसंरक्षक यांच्याकडे पत्रकाद्वारे केली आहे.गडचिरोली वनवृत्तातील आरमोरी-वडसा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाघाचा वावर वाढलेला आहे. सद्यस्थितीत दोन्ही तालुक्यांत तेंदूपत्ता व मोहफुले संकलन करण्याचा हंगामी रोजगार सुरू असल्याने ग्रामस्थांना आपल्या उदरनिर्वाहासाठी जंगलात जाण्यावाचून पर्याय नाही. अशातच आरमोरी तालुक्यातील नलूबाई बाबूलाल जांगळे (रा. अरसोडा), नंदू  गोपाळ मेश्राम (रा. आरमोरी) या दोन व्यक्तींचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. सध्या या दोन्ही तालुक्यांत वाघांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे वनविभागाच्या नोंदीवरून दिसून येत आहे. मागील काही दिवसांपासून वरील दोन्ही तालुक्यांत वाघाची वाढती संख्या व सतत मानवी व पशू हल्ले होत आहेत. मानव-वन्यजीव संघर्षातून  वाघाच्या अस्तित्वावर दुष्परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी तातडीने येत्या दोन ते तीन दिवसांत नरभक्षी वाघाला पकडून जेरबंद करण्यात यावे किंवा वनविभागाला त्याला मारण्याची परवानगी देण्यात यावी. जंगलालगतच्या  शेताना वनविभागाकडून तातडीने जाळीचे कुंपण लावण्यात यावे. तेंदुपत्ता, मोहफुले संकलन करणारे व शेतातील धान पिकाची कापणी करणाऱ्यांना मजुरांना वनविभागाकडून सुरक्षा देण्यात यावी. शेतकऱ्यांना कापणीअभावी व वन्य प्राण्यांमुळे नुकसान झालेल्या धान, भाजीपाला व अन्य पिकांची तातडीने नुकसानभरपाई देण्यात यावी आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. आमदार गजबे यांनी आरमोरीत  उपवनसंरक्षक शर्मा यांची भेट घेऊन चर्चा करून निवेदन दिले. यावेळी पंकज खरवडे, नंदू नाकतोडे, माणिक भोयर यांचेसह कार्यकर्ते उपस्थित होते.वाघाच्या हैदाेसामुळे नागरिक भयभीत झाले असून शेतकरी ताणतणावात आहेत. वाघाचा बंदाेबस्त झाल्याशिवाय चैन पडणार नाही.

 

टॅग्स :Tigerवाघforest departmentवनविभाग