शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
5
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
6
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
7
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
10
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
11
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
12
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
13
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
14
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
15
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
16
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
17
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
18
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
19
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
20
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2022 05:00 IST

मागील काही दिवसांपासून वरील दोन्ही तालुक्यांत वाघाची वाढती संख्या व सतत मानवी व पशू हल्ले होत आहेत. मानव-वन्यजीव संघर्षातून  वाघाच्या अस्तित्वावर दुष्परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी तातडीने येत्या दोन ते तीन दिवसांत नरभक्षी वाघाला पकडून जेरबंद करण्यात यावे किंवा वनविभागाला त्याला मारण्याची परवानगी देण्यात यावी. जंगलालगतच्या  शेताना वनविभागाकडून तातडीने जाळीचे कुंपण लावण्यात यावे.

लाेकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : गडचिरोली वनवृत्तातील आरमोरी व वडसा तालुक्यात होत असलेल्या वाघांच्या हल्ल्यामुळे मनुष्यहानी होत असून, वाघाचा बंदोबस्त करून तातडीने उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी आमदार कृष्णा गजबे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाधिकारी व मुख्य वनसंरक्षक यांच्याकडे पत्रकाद्वारे केली आहे.गडचिरोली वनवृत्तातील आरमोरी-वडसा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाघाचा वावर वाढलेला आहे. सद्यस्थितीत दोन्ही तालुक्यांत तेंदूपत्ता व मोहफुले संकलन करण्याचा हंगामी रोजगार सुरू असल्याने ग्रामस्थांना आपल्या उदरनिर्वाहासाठी जंगलात जाण्यावाचून पर्याय नाही. अशातच आरमोरी तालुक्यातील नलूबाई बाबूलाल जांगळे (रा. अरसोडा), नंदू  गोपाळ मेश्राम (रा. आरमोरी) या दोन व्यक्तींचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. सध्या या दोन्ही तालुक्यांत वाघांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे वनविभागाच्या नोंदीवरून दिसून येत आहे. मागील काही दिवसांपासून वरील दोन्ही तालुक्यांत वाघाची वाढती संख्या व सतत मानवी व पशू हल्ले होत आहेत. मानव-वन्यजीव संघर्षातून  वाघाच्या अस्तित्वावर दुष्परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी तातडीने येत्या दोन ते तीन दिवसांत नरभक्षी वाघाला पकडून जेरबंद करण्यात यावे किंवा वनविभागाला त्याला मारण्याची परवानगी देण्यात यावी. जंगलालगतच्या  शेताना वनविभागाकडून तातडीने जाळीचे कुंपण लावण्यात यावे. तेंदुपत्ता, मोहफुले संकलन करणारे व शेतातील धान पिकाची कापणी करणाऱ्यांना मजुरांना वनविभागाकडून सुरक्षा देण्यात यावी. शेतकऱ्यांना कापणीअभावी व वन्य प्राण्यांमुळे नुकसान झालेल्या धान, भाजीपाला व अन्य पिकांची तातडीने नुकसानभरपाई देण्यात यावी आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. आमदार गजबे यांनी आरमोरीत  उपवनसंरक्षक शर्मा यांची भेट घेऊन चर्चा करून निवेदन दिले. यावेळी पंकज खरवडे, नंदू नाकतोडे, माणिक भोयर यांचेसह कार्यकर्ते उपस्थित होते.वाघाच्या हैदाेसामुळे नागरिक भयभीत झाले असून शेतकरी ताणतणावात आहेत. वाघाचा बंदाेबस्त झाल्याशिवाय चैन पडणार नाही.

 

टॅग्स :Tigerवाघforest departmentवनविभाग