शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
5
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
6
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
7
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
8
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
9
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
10
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
11
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
12
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
13
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
14
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
15
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
16
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
17
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
18
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
19
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
20
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना

विधी चिकित्सालयाचा लाभ घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 23:32 IST

कायद्याची अर्धवट व चुकीची माहिती तसेच छोट्या वादाकरिता न्यायालयीन प्रक्रियेत नागरिकांचे आयुष्य उद्ध्वस्त व्हायचे,....

ठळक मुद्देगेवर्धात केंद्राचे उद्घाटन : प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय मेहरे यांचे आवाहन

आॅनलाईन लोकमतकुरखेडा : कायद्याची अर्धवट व चुकीची माहिती तसेच छोट्या वादाकरिता न्यायालयीन प्रक्रियेत नागरिकांचे आयुष्य उद्ध्वस्त व्हायचे, ही बाब शासनाच्या निदर्शनास आल्याने न्यायालयीन प्रक्रिया सोपी करीत न्याय लोकांच्या दारापर्यंत पोहोचविण्याकरिता व त्यांना मानसिक ताणतणावातून मुक्ती देण्याकरिता मार्गदर्शन केंद्र म्हणून तालुका व ग्रामपंचायत स्तरावर विधी सहायक चिकित्सालय सुरू करण्यात येत आहे. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय मेहरे यांनी केले.गेवर्धा येथे कुरखेडा तालुका विधी सेवा समितीच्या वतीने शनिवारी ग्रामपंचायत कार्यालयात विधी सहाय्य चिकित्सालय केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्राचे उद्घाटन न्यायाधीश मेहरे यांच्या हस्ते करण्यात आले, याप्रसंगी मध्यस्थी जनजागृती कार्यक्रमात नागरिकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.कार्यक्रमाला कुरखेडाचे दिवाणी व फौजदारी न्यायाधीश एम.आर. बागडे, उपविभागीय पोलीस अधिकारी काळे, सरपंच टिकाराम कोरेटी, तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. बुद्धे, सहायक सरकारी अधिवक्ता अ‍ॅड. नाकाडे, नायब तहसीलदार मडावी, सहायक गटविकास अधिकारी मेश्राम, अ‍ॅड. उमेश वालदे, अ‍ॅड. रूपाली माकडे, अ‍ॅड. नागमोती, उपसरपंच संदीप नखाते, ग्रामविकास अधिकारी विशाखा राऊत, सदस्य रोशन सय्यद, पंढरी नाकाडे, व्यंकटी नागीलवार, अशरफ अली सय्यद उपस्थित होते.पुढे बोलताना न्यायाधीश मेहरे म्हणाले, आजच्या महिला कार्यक्षम असून त्या सर्वच क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत आहेत. याप्रसंगी स्थानिक महिला अ‍ॅड. रूपाली माकडे, ग्रामसचिव विशाखा राऊत व उत्तम अभिनय सादर करणाºया बालिकेला मंचावर पाचारण करून प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश संजय मेहरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन अ‍ॅड. छन्ना जनबंधू तर आभार अ‍ॅड. ए.पी. नाकाडे यांनी मानले. यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.मध्यस्थी जनजागृती कार्यक्रमतालुका विधी सेवा समिती देसाईगंजच्या वतीने मध्यस्थी जनजागृती कार्यक्रम शनिवारी घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष संजय मेहरे होते कार्यक्रमात मध्यस्थी केंद्राची भूमिका, न्यायालयीन प्रक्रियेत मध्यस्थी केंद्राचे महत्त्व याबाबत न्यायाधीश संजय मेहरे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अ‍ॅड. संजय गुरू, संचालन अ‍ॅड. ए.पी. नाकाडे तर आभार दिवाणी व फौजदारी न्यायाधीश के.आर. सिंघेल यांनी मानले. यावेळी अ‍ॅड. ढोरे, अ‍ॅड. मंगेश शेंडे, अ‍ॅड. मडावी, अ‍ॅड. चोपकर, अ‍ॅड. बुद्धे, अ‍ॅड. खोब्रागडे, अ‍ॅड. पिल्लारे, गटविकास अधिकारी सुनीता मरस्कोल्हे व पक्षकार उपस्थित होते.