शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

गृह अलगीकरणात असताना मोकाट फिरणाऱ्यांवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:36 IST

देसाईगंज : शहरासह तालुक्यात कोरोनाने थैमान घातले असून, अवघ्या २० दिवसात जवळपास २७ नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दिवसागणिक कोरोनाचा ...

देसाईगंज : शहरासह तालुक्यात कोरोनाने थैमान घातले असून, अवघ्या २० दिवसात जवळपास २७ नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दिवसागणिक कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना, गृह अलगीकरणात असलेले कोरोनाबाधित रुग्ण मोकाट फिरत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जावून अनेकांचा जीव जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा बाधित रुग्णांवर कारवाई करावी, अशी मागणी देसाईगंज सिटीझन फोरमच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

देसाईगंज तालुक्यात २० एप्रिलपर्यंत ३६० कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली. यापैकी १२० कोरोनाबाधितांना गृह अलगीकरणात ठेवले आहे. दिनांक २१ एप्रिल रोजी एकाच दिवशी ७३ कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळले तर २३ एप्रिल रोजी ३७ कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळले. शासकीय कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात आलेल्या रुग्णांवर प्रशासनाची देखरेख असल्याने या माध्यमातून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यात यश मिळत आहे. परंतु, गृह अलगीकरणात असलेले बाधित रुग्णच कोरोनाचे सुपर स्प्रेडर ठरत आहेत. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसह तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा तहसीलदार यांना याबाबत माहिती देऊनही अद्यापही संबंधितांवर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. कोरोनाबाधित रुग्णांनी १४ दिवस अलगीकरणात राहून आरोग्य तपासणी करणे अनिवार्य असून, आरोग्य तपासणीत निगेटिव्ह आल्यासही काही दिवस नागरिकांच्या संपर्कात न येण्याच्या सूचना वजा निर्देश देण्यात आले आहेत. परंतु, गृह अलगीकरणात असलेले रुग्ण चक्क इतरही गावात फेरफटका मारून अनेकांच्या संपर्कात आल्याने स्थिती अधिकच बिकट हाेण्याची शक्यता आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अशा बाधित रुग्णांबाबत चौकशी करून तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी सिटीझन फोरमचे अध्यक्ष हितेश कनोजिया, उपाध्यक्ष रामलाल दुर्वा, गणपत देवढगले, राघवेंद्र शिंगणे, आदिराज श्रीवास्तव, बन्सी पडोळे, धर्मा वाघुंडे, इकबाल चौधरी, मुजफ्फर शेख यांनी केली आहे. गृह अलगीकरणातील व्यक्ती माेकाट फिरत असल्याची माहिती मिळाल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे तहसीलदार संताेष महल्ले व तालुका आराेग्य अधिकारी डाॅ. अभिषेक कुमरे यांनी सांगितले.