शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

घरे पाडणाऱ्यांवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2016 01:08 IST

येनापूर येथील शासनाच्या आबादी जागेवर मागील २५ वर्षांपासून अतिक्रमण करून राहत असलेल्या तीन कुटुंबांची घरे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी अचानकपणे पाडली.

पत्रकार परिषदेत मागणी : येनापूर येथील घटना; आंदोलनाचा इशाराचामोर्शी : येनापूर येथील शासनाच्या आबादी जागेवर मागील २५ वर्षांपासून अतिक्रमण करून राहत असलेल्या तीन कुटुंबांची घरे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी अचानकपणे पाडली. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा पीडित महिलांनी दिला आहे. सोमनपल्ली ग्रामपंचायती अंतर्गत येनापूर हे गाव येते. या गावातील आबादी जागेवर जवळपास ७० कुटुंब अतिक्रमण करून वास्तव्यास आहेत. २०१३-१४ मध्ये या घरांचे घरटॅक्सही सुरू करण्यात आले. मात्र सोमनपल्लीचे तत्कालीन सरपंच नीलकंठ निकाळे, ग्रामपंचायत सदस्य व पोलीस पाटील लोमा गेडाम यांनी आमची घरे अतिक्रमणात बांधली आहेत, असे सांगून घरे पाडण्यात आली. त्यामुळे आमचे कुटुंब उघड्यावर पडले आहे. याबाबत तहसील कार्यालय चामोर्शी, जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केल्यानंतर आमच्याकडून तीन हजार रूपये दंड वसूल करण्यात आला व या ठिकाणी आपण झोपड्या बांधून राहण्यास सुरूवात केली असता, तलाठी श्रीरामे यांनी ही जागा दुर्गापूर ग्रामपंचायतीच्या हद्दीत येत असल्याचे सांगितले. त्यानुसार दुर्गापूर ग्रामपंचायतीमध्ये अर्ज केला असता, त्या जागेचा ग्रामपंचायतीकडे दस्तावेज नसल्याचे सांगितले. ११ जानेवारी रोजी दुर्गापूर ग्रामपंचायतीने कोणतीही नोटीस न देता जेसीबी लावून आणखी घरे पाडली. त्यामुळे पुन्हा आपण बेघर झालो आहोत. यासाठी जबाबदार दोन्ही ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी मनिषा विनायक राऊत, पद्मा बंडू गडलवार, निर्मलाबाई आत्माराम कुरखेडे यांनी केली आहे. अन्यथा तहसीलसमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. (शहर प्रतिनिधी)