शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

सचिव,सरपंचावर कारवाई करा

By admin | Updated: July 2, 2014 23:20 IST

ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती फंडातून पर्यावरण संतुलीत ग्रामसमृध्दी योजनेत मोठा गैरव्यवहार करण्यात आला आहे. पाणी पुरवठा निधीची चौकशी करून कुंभीटोला ग्रा. पं. तील सरपंच

ग्रामसमृध्दी योजनेत गैरव्यवहार : निधीच्या चौकशीची सदस्यांची मागणीकुरखेडा : ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती फंडातून पर्यावरण संतुलीत ग्रामसमृध्दी योजनेत मोठा गैरव्यवहार करण्यात आला आहे. पाणी पुरवठा निधीची चौकशी करून कुंभीटोला ग्रा. पं. तील सरपंच व सचिव यांना जबाबदार ठरविण्यात आले होते. मात्र संबंधितांवर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे पाणी पुरवठा निधीच्या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी कुंभीटोला येथील उपसरपंच व ग्रा. पं. सदस्यांनी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे. कुंभीटोला येथे ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता निधीतून ९ मे ते १३ सप्टेंबर २०१३ या कालावधीत ४३ हजार ५०९ रूपयांची उचल संबंधितांकडून करण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्षात केवळ ४५० रूपये बल्ब लावण्याकरिता खर्ची घालण्यात आले, अशी तक्रार कुंभीटोला येथील पदाधिकारी व गावकऱ्यांनी संवर्ग विकास अधिकाऱ्यांकडे केली होती. या संदर्भात पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात भेट देऊन दस्ताऐवजाची तपासणी व संबंधितांचे बयाण नोंदविले होते व प्रत्यक्षात कोणताच खर्च न होता पैशाची उचल करण्यात आली आहे, असा अभिप्राय १९ डिसेंबर २०१३ ला सादर केला होता. यानंतर संबंधितांच्या विरोधात ठोस कार्यवाही करीत फौजदारी गुन्हा दाखल करणे अपेक्षित होते. मात्र संबंधितांविरोधात कोणत्याच प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाही. पर्यावरण संतुलीत ग्रामसमृध्दी योजनेतून १ लाख ४ हजार व १३ व्या वित्त आयोगाच्या निधीतून १९ हजार ५०० रूपये सचिव व सरपंच यांनी परस्पर संगनमताने ग्रा. पं. स्तरावर कुठलेही काम न करता उचलले या संदर्भातील तक्रार संवर्ग विकास अधिकाऱ्यांकडे ५ मे २०१४ ला दाखल केली. मात्र संवर्ग विकास अधिकाऱ्यांनी निधी संदर्भातील गैर व्यवहारप्रकरणी साधी चौकशीही केली नाही, असा आरोप उपसरपंच लता सहारे, ग्रामपंचायत सदस्य सोनाबाई मडावी, उर्मिला भांडारकर, योगीनाथ जनबंधू, राजू मडावी, पुंडलिक नागपूरकर यांनी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ग्रा. पं. पदाधिकाऱ्यांच्या मागणीची वेळोवेळी दखल न घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. (शहर प्रतिनिधी)