शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

नक्षलवादाचे समर्थन करणाऱ्या संघटनांवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 23:44 IST

गेल्या आठवड्यात पोलीसांच्या कारवाईत ४० नक्षली ठार झाले. पोलीसांच्या या ऐतिहासीक कामगिरीची संपूर्ण देशाने प्रशंसा केली. तसेच सदर कारवाई पार पडलेल्या जवानांचे सर्वत्र कौतूक होत असतांना नक्षल्यांचा पुळका घेत पोलीसांच्या शौर्यावर संशय व्यक्त करीत नक्षलींचे समर्थन करीत सत्यशोधन समितीने पोलीसांच्या कारवाईवर शंका उपस्थित केली.

ठळक मुद्देभूमकाल संघटनेची पत्रकार परिषदेत मागणी : निष्पापांचा बळी जातो त्यावेळी का केले जात नाही सत्यशोधन?

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गेल्या आठवड्यात पोलीसांच्या कारवाईत ४० नक्षली ठार झाले. पोलीसांच्या या ऐतिहासीक कामगिरीची संपूर्ण देशाने प्रशंसा केली. तसेच सदर कारवाई पार पडलेल्या जवानांचे सर्वत्र कौतूक होत असतांना नक्षल्यांचा पुळका घेत पोलीसांच्या शौर्यावर संशय व्यक्त करीत नक्षलींचे समर्थन करीत सत्यशोधन समितीने पोलीसांच्या कारवाईवर शंका उपस्थित केली. नक्षल्यांकडून आदिवासींची हत्या होत असताना स्वत:ला मानवाधिकारवादी म्हणविणाऱ्या संघटना कुठे जातात? असा थेट सवाल करीत सत्यशोधन समितीच्या नावाने काम करणाऱ्या नक्षल समर्थक संघटनावर कारवाई करावी, अशी मागणी भूमकाल संघटनेचे अध्यक्ष डॉ. अरविंद सोवनी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेतून केली.यावेळी पत्रकार परिषदेला भूमकाल संघटनेचे सचिव प्रा. श्रीकांत भोवते, सदस्य अविनाश सोवनी उपस्थित होते. पत्रकार परिषदेत माहिती देताना डॉ. अरविंद सोवनी म्हणाले की, देशात प्रत्येक तासाला नक्षलवादी घटना होतात. आजपर्यंत हजारो सामान्य लोकांना शुल्लक कारणासाठी केवळ शंकेच्या आधारावर मारले जाते. महाराष्ट्रात गडचिरोली ४०७ आदिवासी, २५ दलित, २४ बंगाली तसेच ४० इतर नागरीकांच्या हत्या नक्षलवाद्यांकडून करण्यात आल्या. अनेक आदिवासींच्या नक्षल्यांनी निर्घृणपणे हत्या केलेल्या आहेत. आजपर्यंत अधिकतर हत्या केवळ पोलीस खबरी असल्याच्या कारणावरुन करण्यात आल्या. यातील ९५ टक्के लोक पोलीस खबरी नसल्याचे निष्पन्न झाले आहे. नक्षलवादी नि:ष्पाप आदिवासी, गैरआदिवासींचे बळी घेत असतांना सत्यशोधन समितीचे दलित आदिवासी प्रेम कुठे जाते? सामान्य जनतेला न्याय मिळावा यासाठी अशा सीपीडीआर, सीडीआरओ, सीएलसी, आयएपीएल आदी मानवाधिकारवादी संघटना कुठे जातात असा थेट सवाल त्यांनी यावेळी केला. एरव्ही नक्षलवाद्यांकडून होणारी जाळपोळ, निरागस आदिवासींची होणारी हत्या, पोलीस जवानांचे घेतलेले बळी याविरुद्ध या मानवाधिकारवादी संघटनेने कधीच सत्यशोधन केलेले नाही. नक्षल भागातील समस्यांवर काम करण्याचा दावा करणाºया या संघटनांनी नक्षलवाद्यांनी ज्या विकासकामांविरुद्ध जाळपोळ करुन मजुरांना मारले अशा घटनेविरोधात प्रश्न का उपस्थित केला नाही?या संघटना राष्ट्रविरोधी भावना लोकांमध्ये वाढीसाठी काम करीत असतात. त्यामुळे अशा संघटनांवर कायमची बंदी घालून संघटनेच्या लोकांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी डॉ. अरविंद सोवनी यांनी लावून धरली.सत्यशोधन समितीचा काढता पाय२२ व २३ एप्रिल रोजी पोलीस व नक्षल यांच्या चकमकीबाबत मानवाधिकाराचे कसे हनन झाले आहे, याची माहिती सत्यशोधन समितीच्या सदस्यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यानंतर भूमकाल संघटनेचे डॉ. अरविंद सोवणी व त्यांचे श्रीकांत भोवते व अविनाश सोवनी त्या ठिकाणी पोहोचले. चकमकी संदर्भात खुली चर्चा करण्याचे आवाहन डॉ. अरविंद सोवनी यांनी केले असता, सत्यशोधन समितीच्या सदस्यांनी काढता पाय घेत चर्चा करण्याचे टाळले.