शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

दारूबंदी कायद्यांतर्गत शेकडो दारूविक्रेत्या महिलांवर कारवाई

By admin | Updated: August 23, 2015 01:57 IST

१ एप्रिलपासून दारूबंदी विरोधात धडक मोहीम पोलिसांकडून राबविली जात असून या मोहिमेंतर्गत मागील चार महिन्यांत १०० पेक्षा अधिक महिला आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे.

सहभाग वाढला : कमी श्रमात पैसा मिळत असल्याने आकर्षणगडचिरोली : १ एप्रिलपासून दारूबंदी विरोधात धडक मोहीम पोलिसांकडून राबविली जात असून या मोहिमेंतर्गत मागील चार महिन्यांत १०० पेक्षा अधिक महिला आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे महिलांचा अवैध दारूविक्रीत सहभागावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. कमी खर्चात अधिक पैसा मिळविण्याचे साधन म्हणून दारू व्यवसायाकडे बघितले जात असल्याने या व्यवसायात महिलांची संख्या वाढत चालली आहे. गडचिरोली हा देशातील अतिमागास जिल्हा असून या जिल्ह्यात कोणतेही उद्योग नाहीत. त्यामुळे नक्षलवाद वाढत चालला आहे, असा युक्तीवाद सातत्याने केला जातो. १९९२ मध्ये गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी करण्यात आली. मात्र त्यानंतर गावागावांत दारूचा अवैध व्यवसाय फोफावला. अत्यंत कमी मेहनतीत भरघोस पैसा मिळवून देणारा राजरोस मार्ग म्हणून दारूच्या अवैध धंद्याकडे वृद्धांपासून तरूणांपर्यंत सर्व वर्गातील लोक जुळले. यात महिलांचाही मोठ्या प्रमाणावर सहभाग राहिला आहे. आपल्या पतीसोबतच अनेक महिला दारूची अवैध विक्री करीत असल्याचे धक्कादायक वास्तव गडचिरोली जिल्ह्यात आता उजेडात आले आहे. घरपोच दुचाकीच्या सहाय्याने दारू पोहोचविण्याचे काम महिला करीत असल्याचे दिसून येत आहे. गडचिरोली पोलीस दलाने १ एप्रिल २०१५ पासून अवैध दारूविक्रीविरोधात जोरदार कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत १५२ कारवाया करून ३५८ पुरूष आरोपींना तर जवळपास १०० महिला आरोपींना अटक करण्यात आली आहे. या सर्वांकडून ९३ लाख ३८ हजार ४९७ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नऊ चारचाकी वाहने व १९ दुचाकी वाहने पोलिसांनी जप्त केले आहे. आतापर्यंत मागील चार महिन्यांत १०० पेक्षा अधिक महिला आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. एकीकडे दारूमुळे महिलांना सामाजिक जीवनात त्रास होतो, असा दावा करणाऱ्या महिला संघटनाही महिलांचा दारूविक्रीतील सहभाग पाहून चकरावून गेल्या आहेत. अनेक चांगल्या घरच्या महिलाही वाहनाद्वारे जिल्ह्यात दारूविक्री करीत असल्याने ग्राहकांची त्यांच्याकडे जोरदार गर्दी आढळून आल्याचे भरारी पथकातील कर्मचाऱ्यांनी खासगीत बोलताना सांगितले. महिलांचा अवैध धंद्यात सहभाग वाढल्यामुळे शेतीसारख्या व्यवसायात परिश्रम करण्यासाठी महिला मजूर ग्रामीण भागात मिळेनासे झाले आहेत. गडचिरोली शहरासह तालुका मुख्यालयात अनेक दुकानांवर नोकर पाहिजेच्या पाट्या लावल्या आहेत. दुकानदार पाच हजार रूपये महिना द्यायला तयार असतानाही त्यांना महिला व पुरूष सेल्समन मिळत नसल्याचे चित्र जिल्हाभरात दिसून येत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)