शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

चामोर्शीचे एसडीओ व मुलचेरा तहसीलदारांवर कारवाई करा

By admin | Updated: June 12, 2017 01:00 IST

मुलचेरा तालुक्यातील धन्नूर येथील वीज कोसळून मृत्यूमुखी पडलेल्यांचे शवविच्छेदन करण्यास विलंब झाल्याने चामोर्शी येथील

आमदारांची मागणी : शवविच्छेदनास विलंब झाल्याचा आरोपलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मुलचेरा तालुक्यातील धन्नूर येथील वीज कोसळून मृत्यूमुखी पडलेल्यांचे शवविच्छेदन करण्यास विलंब झाल्याने चामोर्शी येथील उपविभागीय अधिकारी व मुलचेराचे तहसीलदार यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आ. डॉ. देवराव होळी यांनी केली आहे.आ.डॉ. देवराव होळी यांनी म्हटले आहे की, मुलचेरा तालुक्यातील धन्नूर येथे वीज कोसळून ४ जण मृत्यूमुखी पडले व सात जण जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच आपण आष्टी येथील ग्रामीण रूग्णालयात भेट देवून जखमींची विचारपूस केली व कुटुंबीयांचे सांत्वन केले. यानंतर धन्नुर येथे जावून मृतकांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी गावात एकच शव पोहोचले होते. मृतक पिता - पुत्र व एकाचे शव अहेरी येथील शवविच्छेदनगृहातून धन्नूर येथे पोहोचण्यास वेळ लागणार असल्याचे कळले. यामुळे आपण अहेरी येथील उपजिल्हा रूग्णालयात पोहोचलो. या ठिकाणी जि. प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार आधिपासूनच उपस्थित होते. यावेळी आपण बराच वेळ उपस्थित होतो. मात्र चामोर्शीचे उपविभागीय अधिकारी व मुलचेराच्या तहसीलदारांनी भेट न दिल्यामुळे शवविच्छेदनास विलंब झाला. मुलचेरा येथील तहसीलदार व चामोर्शीचे उपविभागीय अधिकारी यांनी धन्नूर येथे मृतकांच्या कुटुंबातील सदस्यांना भेट देऊन निघून गेले. यामुळे नागरिकांनी प्रचंड रोष व्यक्त केला. धन्नूर येथे एकाच कुटूंबातील पिता - पुत्र व दोन कुटुंबातील जीव गेला. मात्र तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांनी मृतकांच्या कुटुंबीयांबद्दल उदासिनता दाखविली असल्याचेही म्हटले आहे.अहेरी येथील शवविच्छेदनगृहात आ. डॉ. होळी, जि.प. उपाध्यक्ष कंकडालवार उपस्थित झाले. मात्र उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार वेळेवर उपस्थित झाले नाही. यामुळे शवविच्छेदनास बराच विलंब झाला. यामुळे मृतकांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला. यामुळे या अधिकार्यांवर तत्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आ. डॉ. देवराव होळी यांनी केली आहे.