शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

आलापल्लीच्या एसीएफवर कारवाई करा

By admin | Updated: August 3, 2015 01:06 IST

आलापल्ली वन विभागाचे उपविभागीय वनाधिकारी रवी अग्रवाल हे महिला कर्मचाऱ्यांना जाणूनबुजून मानसिक त्रास देत आहेत.

चौकशीची मागणी : महिला कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास देत असल्याचा आरोपअहेरी : आलापल्ली वन विभागाचे उपविभागीय वनाधिकारी रवी अग्रवाल हे महिला कर्मचाऱ्यांना जाणूनबुजून मानसिक त्रास देत आहेत. त्यामुळे त्यांची उच्चस्तरीय चौकशी करावी व त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी वनकर्मचारी संघटनांकडून उपवनसंरक्षकांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.उपविभागीय वनाधिकारी रवी अग्रवाल यांच्या जाचाला कंटाळून वनकर्मचारी संघटनांनी त्यांच्याबद्दलची तक्रार उपवनसंरक्षक हेमंतकुमार मिना यांच्याकडे ९ जून रोजी केली होती. त्यावेळी मिना यांनी अग्रवाल यांची चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र १० दिवसांचा कालावधी उलटूनही मिना यांनी चौकशी समिती गठित केली नाही. त्यामुळे वनकर्मचाऱ्यांनी याबद्दलची तक्रार २६ जून रोजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडेही केली आहे. अग्रवाल यांच्यावर अजूनही कारवाई झाली नसल्याने वन विभागाचे अधिकारी त्यांची पाठराखण करीत असल्याचा आरोप वनकर्मचारी संघटनांकडून करण्यात येत आहे.याबाबत उपवनसंरक्षक मिना यांच्यासोबत संपर्क साधला असता, काही वनकर्मचाऱ्यांनी आपल्याकडे तक्रार केली आहे. त्यानुसार चौकशी समिती नेमण्यात आली आहे. याबाबत मुख्य वनसंरक्षकांनाही कळविण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणाबाबत आपण जास्त बोलू शकत नाही, अशी माहिती लोकमतशी बोलताना दिली. उपविभागीय वनाधिकारी रवी अग्रवाल यांना विचारणा केली असता, आपण कर्मचाऱ्यांना कामाबाबतच बोलत असून ज्या कर्मचाऱ्यांना काम करणे जड जाते, असे कर्मचारी आपल्याबद्दल तक्रार करीत असल्याचे सांगितले. (शहर प्रतिनिधी)