शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलवर विशाल मोर्चा धडकला

By admin | Updated: April 21, 2016 01:40 IST

सुरजागड लोहप्रकल्प एटापल्ली तालुक्यातच उभारण्यात यावा, या मागणीसाठी सुरजागड बचाव संघर्ष समिती एटापल्लीच्या वतीने

लोह प्रकल्प तालुक्यातच करा : बाजारपेठ कडकडीत बंद; १० हजार नागरिक सहभागीएटापल्ली : सुरजागड लोहप्रकल्प एटापल्ली तालुक्यातच उभारण्यात यावा, या मागणीसाठी सुरजागड बचाव संघर्ष समिती एटापल्लीच्या वतीने काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा विधानसभेचे गटनेते आमदार विजय वडेट्टीवार व राकाँचे ज्येष्ठ नेते तथा माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वात हजारो लोकांचा मोर्चा बुधवारी येथील उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालयावर धडकला. या विशाल मोर्चाचा प्रारंभ दुपारी २ वाजता राजीव गांधी शाळेच्या प्रांगणातून झाला. मुख्य मार्गावरून सदर मोर्चा एसडीओ व तहसील कार्यालयावर धडकला. दरम्यान, मोर्चेकरांच्या शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन तहसीलदार संपत खलाटे यांच्याकडे सादर केले. या मोर्चाची सांगता दुपारी ४ वाजता करण्यात आली. मोर्चादरम्यान बुधवारी एटापल्ली शहरातील बाजारपेठ दिवसभर कडकडीत बंद ठेवण्यात आली होती. कडक उन्हात एटापल्ली तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून आठ ते दहा हजार आदिवासी बांधव या मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चादरम्यान आमदार विजय वडेट्टीवार व माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी मार्गदर्शन केले. या मोर्चात जि.प. अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे, माजी आमदार पेंटारामा तलांडी, काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस सगुना तलांडी, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे, सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. लालसू नरोटे, सैनू गोटा, राकाँचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, माजी पं.स. उपसभापती लालसू आत्राम, भामरागडचे नगराध्यक्ष राजू वड्डे, मुस्ताक शेख, चंद्रा कवडो, डोलेश मडावी, अभय पुण्यमूर्तीवार, मंगेश नरोटे, रमेश गंपावार, रामजी कत्तीवार, जितेंद्र टिकले, सुरेश तलांडे, संतोष आत्राम, मनोहर हिचामी, दौलत दहागावकर, संजय चरडुके, नसरू शेख, मुक्तेश्वर गावडे, सरीता राजकोंडावार, कमल हेडो, बबिता मडावी, रामसाय तलांडे, ऋषी पोरतेट, उषा ठाकरे, ललिता मट्टामी, सगुना कोडापे, बालाजी आत्राम, शालिक गेडाम, कैलाश कोरेत, मंगूजी मट्टामी, रामजी गुम्मा आदीसह राजकीय पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)उत्खननाच्या कामात कंपनीला सरकारकडून मदत - वडेट्टीवारसंपूर्ण कायद्याचे उल्लंघन करून खासगी कंपनी सुरजागड लोह पहाडीवरून कच्चा माल चोरून नेत आहेत. या कामात कंपनीला भाजपप्रणित केंद्र व राज्य सरकार मदत करीत आहे. विद्यमान सरकारचे डोके ठिकाणावर नाही. आदिवासी जनतेच्या विकासाबाबत भाजप प्रणित केंद्र व राज्य सरकारला काहीही देणे-घेणे नाही, असे आमदार विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले. सुरजागड लोह प्रकल्प पहाडी परिसरातून सुरू असलेल्या लोहखनिज उत्खननाच्या मुद्यावर आमदार वडेट्टीवार यांनी भाजप प्रणित सरकारवर प्रखर टीका केली. या आहेत मागण्यासुरजागड प्रकल्प एटापल्लीतच उभारण्यासंबंधी भूमिका स्पष्ट होत नाही, तेव्हापर्यंत सुरजागड पहाडीवरील कामे बंद करून कच्च्या लोहखनिजाची वाहतूक तत्काळ बंद करावी, शासनाच्या नियमाचे उलंघन करून जितकी झाडे संबंधित कंपनीने रस्ता बनविण्यासाठी व खोदकामात तोडली आहे. त्याच्या १० पट झाडे पुन्हा लावावीत. अन्यथा कंपनीसोबत केलेला करार रद्द करावा, ज्या ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात खनिज आहे, त्या खनिजाचे ग्रामसभेच्या मंजुरीविना उत्खनन व वाहतूक करण्यात येऊ नये. गौण खनिजाचे उत्खनन केल्या प्रकरणाची चौकशी करून संबंधित कंत्राटदारावर महसूल व वन विभागाने फौजदारी गुन्हे दाखल करावे.