शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

मिठाई विक्रेते अपडेट, मात्र ग्राहक अनभिज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 05:00 IST

दसरा, दिवाळीच्या सणात तसेच विविध कार्यक्रमांमध्ये पेढे, मिठाई, लाडू आदी गाेड पदार्थांचा वापर सर्वाधिक केला जाताे. अनेकदा दुकानदार भेसळ पेढे अथवा मिठाई किंवा मुदतबाह्य पदार्थ विक्री करतात. अन्न व औषध प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाल्यास दुकानदारांचे फावते. ग्राहकांची फसवणूक व दिशाभूल हाेऊ नये, यासाठी १ ऑक्टाेबरपासून ‘बेस्ट बिफाेर’ नियम सुरू करण्यात आला. यानुसार मिठाईच्या ट्रेसमाेर किंवा काऊंटरवर पदार्थाजवळ संबंधित पदार्थ किती दिवसात खावे याचा उल्लेख असणे बंधनकारक आहे.

ठळक मुद्देजनजागृतीचा अभाव। गडचिराेली शहरातील दुकानांच्या काऊंटरवर ‘बेस्ट बिफाेरचा’ उल्लेख

गाेपाल लाजुरकर ।लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : दूध, साखर, खवा, बेसन आदीपासून तयार केलेेल्या विक्रीच्या पदार्थांचा याेग्य दर्जा राखला जावा, ग्राहकांची दिशाभूल व फसवणूक हाेऊ नये, यासाठी राज्य शासनाच्या अन्न व औषध विभागाने १ ऑक्टाेबरपासून मिठाई व पेढ्यांच्या दुकानांसाठी नियमावली लागू केली. यानुसार मिठाईच्या ट्रेसमाेर किंवा काचेच्या काऊंटरवर ‘बेस्ट बिफाेर’ लिहिणे आवश्यक आहे. या नियमावलीबाबत विक्रेते व ग्राहक किती जागरूक आहेत, याबाबत रिॲलिटी चेक केले असता, गडचिराेली शहरातील विक्रेत्यांना नियमाबाबत माहिती आहे. मात्र ग्राहक अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. दसरा, दिवाळीच्या सणात तसेच विविध कार्यक्रमांमध्ये पेढे, मिठाई, लाडू आदी गाेड पदार्थांचा वापर सर्वाधिक केला जाताे. अनेकदा दुकानदार भेसळ पेढे अथवा मिठाई किंवा मुदतबाह्य पदार्थ विक्री करतात. अन्न व औषध प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाल्यास दुकानदारांचे फावते. ग्राहकांची फसवणूक व दिशाभूल हाेऊ नये, यासाठी १ ऑक्टाेबरपासून ‘बेस्ट बिफाेर’ नियम सुरू करण्यात आला. यानुसार मिठाईच्या ट्रेसमाेर किंवा काऊंटरवर पदार्थाजवळ संबंधित पदार्थ किती दिवसात खावे याचा उल्लेख असणे बंधनकारक आहे. गडचिराेली शहरातील सात मिठाईच्या दुकानांना भेट देऊन बेस्ट बिफाेर या नियमाची माहिती आहे का, याबाबत दुकानदारांची विचारणा केली असता, सर्वच दुकानदारांनी नियम माहित असल्याचे सांगितले. परंतु विविध ठिकाणच्या २५ ग्राहकांना या नियमाबाबत विचारणा केली असता, ते याबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे गडचिराेली अन्न व औषध प्रशासन विभागाने शहरातील नाेंदणीकृत मिठाई विक्रेत्यांची बैठक घेऊन शासनाच्या नवीन ‘बेस्ट बिफाेर’ नियमाची माहिती आधीच दिली हाेती. याचा परिणाम शहरातील मिठाई विक्रेत्यांवर झाला. त्यांनी आपापल्या दुकानांमध्ये विशिष्ट मिठाई, पेढ्यांसमाेर ‘बेस्ट बिफाेर’ लिहून किती दिवसात मिठाई खायची, याचा उल्लेख केला आहे. दिवाळी सणात लाडू व पेढ्यांना सर्वाधिक मागणी असते. त्यानुसार आवश्यकतेप्रमाणे दुकानांमध्ये मिष्टांनांचा साठा असल्याचे रिॲलिटी चेकमध्ये दिसून आले. 

दुकानदारांना नियम पाळण्याचा सूचना दिल्याकाेणते पदार्थ किती दिवस वापरायचे हे सर्वस्वी संबंधित दुकानदारावर अवलंबून असते. पदार्थाच्या दर्जानुसार शासनाच्या ‘बेस्ट बिफाेर’ नियमावलीप्रमाणे जिल्ह्यातील मिठाई विक्रेत्यांना स्वच्छता व नियम पाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यादृष्टीने क्षेत्रभेटी देऊन तपासणीही केली जात आहे.      -एस.पी.ताेरेम, अन्न सुरक्षा, अधिकारी

आवश्यक तेवढ्याच पदार्थांवर भर‘बेस्ट बिफाेर’ या सूचनेचा पदार्थाच्या ट्रेसमाेर उल्लेख असणे, हा नियम ग्राहकांसाठी अत्यंत चांगला आहे. या माध्यमातून ग्राहकांची फसवणूक हाेणार नाही. अनेक गाेड पदार्थ अल्पकाळ टिकणारे असल्याने आवश्यक तेवढेच पदार्थ बनविण्यावर आपण भर देत आहाेत. त्यामुळे पदार्थ वाया जात नाही.      -अतुल पटेल, मिठाई विक्रेता

टॅग्स :food poisoningअन्नातून विषबाधा