शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

मिठाई विक्रेते अपडेट, मात्र ग्राहक अनभिज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 05:00 IST

दसरा, दिवाळीच्या सणात तसेच विविध कार्यक्रमांमध्ये पेढे, मिठाई, लाडू आदी गाेड पदार्थांचा वापर सर्वाधिक केला जाताे. अनेकदा दुकानदार भेसळ पेढे अथवा मिठाई किंवा मुदतबाह्य पदार्थ विक्री करतात. अन्न व औषध प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाल्यास दुकानदारांचे फावते. ग्राहकांची फसवणूक व दिशाभूल हाेऊ नये, यासाठी १ ऑक्टाेबरपासून ‘बेस्ट बिफाेर’ नियम सुरू करण्यात आला. यानुसार मिठाईच्या ट्रेसमाेर किंवा काऊंटरवर पदार्थाजवळ संबंधित पदार्थ किती दिवसात खावे याचा उल्लेख असणे बंधनकारक आहे.

ठळक मुद्देजनजागृतीचा अभाव। गडचिराेली शहरातील दुकानांच्या काऊंटरवर ‘बेस्ट बिफाेरचा’ उल्लेख

गाेपाल लाजुरकर ।लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : दूध, साखर, खवा, बेसन आदीपासून तयार केलेेल्या विक्रीच्या पदार्थांचा याेग्य दर्जा राखला जावा, ग्राहकांची दिशाभूल व फसवणूक हाेऊ नये, यासाठी राज्य शासनाच्या अन्न व औषध विभागाने १ ऑक्टाेबरपासून मिठाई व पेढ्यांच्या दुकानांसाठी नियमावली लागू केली. यानुसार मिठाईच्या ट्रेसमाेर किंवा काचेच्या काऊंटरवर ‘बेस्ट बिफाेर’ लिहिणे आवश्यक आहे. या नियमावलीबाबत विक्रेते व ग्राहक किती जागरूक आहेत, याबाबत रिॲलिटी चेक केले असता, गडचिराेली शहरातील विक्रेत्यांना नियमाबाबत माहिती आहे. मात्र ग्राहक अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. दसरा, दिवाळीच्या सणात तसेच विविध कार्यक्रमांमध्ये पेढे, मिठाई, लाडू आदी गाेड पदार्थांचा वापर सर्वाधिक केला जाताे. अनेकदा दुकानदार भेसळ पेढे अथवा मिठाई किंवा मुदतबाह्य पदार्थ विक्री करतात. अन्न व औषध प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाल्यास दुकानदारांचे फावते. ग्राहकांची फसवणूक व दिशाभूल हाेऊ नये, यासाठी १ ऑक्टाेबरपासून ‘बेस्ट बिफाेर’ नियम सुरू करण्यात आला. यानुसार मिठाईच्या ट्रेसमाेर किंवा काऊंटरवर पदार्थाजवळ संबंधित पदार्थ किती दिवसात खावे याचा उल्लेख असणे बंधनकारक आहे. गडचिराेली शहरातील सात मिठाईच्या दुकानांना भेट देऊन बेस्ट बिफाेर या नियमाची माहिती आहे का, याबाबत दुकानदारांची विचारणा केली असता, सर्वच दुकानदारांनी नियम माहित असल्याचे सांगितले. परंतु विविध ठिकाणच्या २५ ग्राहकांना या नियमाबाबत विचारणा केली असता, ते याबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे गडचिराेली अन्न व औषध प्रशासन विभागाने शहरातील नाेंदणीकृत मिठाई विक्रेत्यांची बैठक घेऊन शासनाच्या नवीन ‘बेस्ट बिफाेर’ नियमाची माहिती आधीच दिली हाेती. याचा परिणाम शहरातील मिठाई विक्रेत्यांवर झाला. त्यांनी आपापल्या दुकानांमध्ये विशिष्ट मिठाई, पेढ्यांसमाेर ‘बेस्ट बिफाेर’ लिहून किती दिवसात मिठाई खायची, याचा उल्लेख केला आहे. दिवाळी सणात लाडू व पेढ्यांना सर्वाधिक मागणी असते. त्यानुसार आवश्यकतेप्रमाणे दुकानांमध्ये मिष्टांनांचा साठा असल्याचे रिॲलिटी चेकमध्ये दिसून आले. 

दुकानदारांना नियम पाळण्याचा सूचना दिल्याकाेणते पदार्थ किती दिवस वापरायचे हे सर्वस्वी संबंधित दुकानदारावर अवलंबून असते. पदार्थाच्या दर्जानुसार शासनाच्या ‘बेस्ट बिफाेर’ नियमावलीप्रमाणे जिल्ह्यातील मिठाई विक्रेत्यांना स्वच्छता व नियम पाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यादृष्टीने क्षेत्रभेटी देऊन तपासणीही केली जात आहे.      -एस.पी.ताेरेम, अन्न सुरक्षा, अधिकारी

आवश्यक तेवढ्याच पदार्थांवर भर‘बेस्ट बिफाेर’ या सूचनेचा पदार्थाच्या ट्रेसमाेर उल्लेख असणे, हा नियम ग्राहकांसाठी अत्यंत चांगला आहे. या माध्यमातून ग्राहकांची फसवणूक हाेणार नाही. अनेक गाेड पदार्थ अल्पकाळ टिकणारे असल्याने आवश्यक तेवढेच पदार्थ बनविण्यावर आपण भर देत आहाेत. त्यामुळे पदार्थ वाया जात नाही.      -अतुल पटेल, मिठाई विक्रेता

टॅग्स :food poisoningअन्नातून विषबाधा