शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पुराच्या तडाख्यातून सुटले; पण शासकीय कर्जाच्या फेऱ्यात अडकले !

By गेापाल लाजुरकर | Updated: June 7, 2023 21:31 IST

२८ वर्षांपासून किन्हाळा व अरततोंडीवासी वाहताहेत कर्जाचा भार

देसाईगंज : गाढवी नदीच्या काठावर वसलेल्या किन्हाळा व अरततोंडी या दाेन्ही गावांना नेहमीच पुराचा फटका बसत होता. यामुळे या गावांचे पुनर्वसन १९९४ मध्ये करण्यात आले. पुनर्वसित कुटुंबांना १० हजार रुपये मदत व १५ हजार रुपये घरबांधणीसाठी कर्जाऊ देण्यात आले. २८ वर्षांपूर्वी दिलेली कर्जाऊ रक्कम दाेन्ही गावातील नागरिकांनी परतफेड केली नाही. पुराच्या तडाख्यातून सुटले; पण शासकीय कर्जाच्या फेऱ्यात अडकले, अशी स्थिती हाेऊन शासकीय कर्जाचा भार येथील नागरिक अद्यापही वाहत आहेत.

किन्हाळा व अरततोंडी ही गावे सखल भागात गाढवी नदीजवळ वसली होती. या गावांमध्ये दरवर्षी पावसाळ्यात गाढवी नदीच्या पुराचे पाणी शिरत होते. परिणामी दरवर्षीच्या पावसाळ्यात ही गावे रिकामे खाली करावी लागत हाेती. १९९४ मध्ये आलेल्या महापुराच्या तडाख्यात ही दाेन्ही गावे सापडली. ह्या समस्येेमुळे शासनाने दाेन्ही गावांचे पुनर्वसन करण्यात आले. परंतु त्यांना आर्थिक स्वरुपात अद्यापही दिलासा दिला नाही. आजपर्यंत शासनाने उद्योगपतींचे, महामंडळांचे शेकडो कोटी रुपयांचे कर्ज माफ केले. मात्र, शासनाच्या आदेशानुसार ज्या नागरिकांनी गाव सोडले, त्या गावकऱ्यांना दिलेले कर्ज माफ केले नाही. शासनाच्या दुटप्पी धाेरणामुळे गावातील नागरिक निराश आहेत. दोन्ही गावातील नागरिक कर्जाचा भार वाहत आहेत.संयुक्त कुटुंबातील इतर सदस्य वाऱ्यावर

सध्यास्थितीत किन्हाळाचे १०० टक्के माेहटोलालगत पुनर्वसन झाले, तर अरततोंडीचे अजूनही पूर्णपणे पुनर्वसन झाले नाही. पुनर्वसितांना शासनाने तीन हजार हेक्टर क्षेत्रफळ जागा उपलब्ध करून दिली. त्याचबरोबर त्यांना प्रत्येकी १० हजार रुपयांची मदत व १५ हजार रुपये कर्ज स्वरुपात दिले. परंतु तोकड्या रकमेवर कुणालाही घर बांधणे शक्य झाले नाही. शिवाय ही जागा व मदतीची रक्कम कुटुंब प्रमुखालाच मिळाली. संयुक्त कुटुंबातील इतर सदस्यांना वाऱ्यावर सोडण्यात आले.कर्जावरील व्याज वाढतीवर

कसेबसे पुनर्वसन झाल्यानंतर १९९४ पासून आजपर्यंत शासनाने दिलेल्या १५ हजार रुपयांच्या कर्जाऊ रक्कमेवर अजूनही व्याजाचे चक्र सुरू असून ती रक्कम हजारोंच्या घरात गेली आहे. दरवर्षी तलाठ्यांकडून ह्या कर्जाच्या रकमेच्या परतफेडीबाबत विचारणा केली जाते. काही रक्कम भरण्यास सांगून कागदपत्रे दिली जातात. तर काही तलाठी अडवणूक करीत नाही. पुनर्वसीतांकडून रक्कम वसुली केली जाते.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली