शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

पुराच्या तडाख्यातून सुटले; पण शासकीय कर्जाच्या फेऱ्यात अडकले !

By गेापाल लाजुरकर | Updated: June 7, 2023 21:31 IST

२८ वर्षांपासून किन्हाळा व अरततोंडीवासी वाहताहेत कर्जाचा भार

देसाईगंज : गाढवी नदीच्या काठावर वसलेल्या किन्हाळा व अरततोंडी या दाेन्ही गावांना नेहमीच पुराचा फटका बसत होता. यामुळे या गावांचे पुनर्वसन १९९४ मध्ये करण्यात आले. पुनर्वसित कुटुंबांना १० हजार रुपये मदत व १५ हजार रुपये घरबांधणीसाठी कर्जाऊ देण्यात आले. २८ वर्षांपूर्वी दिलेली कर्जाऊ रक्कम दाेन्ही गावातील नागरिकांनी परतफेड केली नाही. पुराच्या तडाख्यातून सुटले; पण शासकीय कर्जाच्या फेऱ्यात अडकले, अशी स्थिती हाेऊन शासकीय कर्जाचा भार येथील नागरिक अद्यापही वाहत आहेत.

किन्हाळा व अरततोंडी ही गावे सखल भागात गाढवी नदीजवळ वसली होती. या गावांमध्ये दरवर्षी पावसाळ्यात गाढवी नदीच्या पुराचे पाणी शिरत होते. परिणामी दरवर्षीच्या पावसाळ्यात ही गावे रिकामे खाली करावी लागत हाेती. १९९४ मध्ये आलेल्या महापुराच्या तडाख्यात ही दाेन्ही गावे सापडली. ह्या समस्येेमुळे शासनाने दाेन्ही गावांचे पुनर्वसन करण्यात आले. परंतु त्यांना आर्थिक स्वरुपात अद्यापही दिलासा दिला नाही. आजपर्यंत शासनाने उद्योगपतींचे, महामंडळांचे शेकडो कोटी रुपयांचे कर्ज माफ केले. मात्र, शासनाच्या आदेशानुसार ज्या नागरिकांनी गाव सोडले, त्या गावकऱ्यांना दिलेले कर्ज माफ केले नाही. शासनाच्या दुटप्पी धाेरणामुळे गावातील नागरिक निराश आहेत. दोन्ही गावातील नागरिक कर्जाचा भार वाहत आहेत.संयुक्त कुटुंबातील इतर सदस्य वाऱ्यावर

सध्यास्थितीत किन्हाळाचे १०० टक्के माेहटोलालगत पुनर्वसन झाले, तर अरततोंडीचे अजूनही पूर्णपणे पुनर्वसन झाले नाही. पुनर्वसितांना शासनाने तीन हजार हेक्टर क्षेत्रफळ जागा उपलब्ध करून दिली. त्याचबरोबर त्यांना प्रत्येकी १० हजार रुपयांची मदत व १५ हजार रुपये कर्ज स्वरुपात दिले. परंतु तोकड्या रकमेवर कुणालाही घर बांधणे शक्य झाले नाही. शिवाय ही जागा व मदतीची रक्कम कुटुंब प्रमुखालाच मिळाली. संयुक्त कुटुंबातील इतर सदस्यांना वाऱ्यावर सोडण्यात आले.कर्जावरील व्याज वाढतीवर

कसेबसे पुनर्वसन झाल्यानंतर १९९४ पासून आजपर्यंत शासनाने दिलेल्या १५ हजार रुपयांच्या कर्जाऊ रक्कमेवर अजूनही व्याजाचे चक्र सुरू असून ती रक्कम हजारोंच्या घरात गेली आहे. दरवर्षी तलाठ्यांकडून ह्या कर्जाच्या रकमेच्या परतफेडीबाबत विचारणा केली जाते. काही रक्कम भरण्यास सांगून कागदपत्रे दिली जातात. तर काही तलाठी अडवणूक करीत नाही. पुनर्वसीतांकडून रक्कम वसुली केली जाते.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली