शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
4
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
5
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
6
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
7
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
8
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
9
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
10
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
11
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
12
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
13
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
14
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
15
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
16
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
17
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
18
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
19
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
20
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय

सर्वेक्षणातच रखडल्या उपसा सिंचन योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 22:51 IST

मोठ्या नद्यांची देण असतानाही सिंचन सुविधांअभावी गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुबार पिकांपासून वंचित राहावे लागत आहेत. अशा स्थितीत जिल्ह्याच्या दक्षिण भागात प्रस्तावित असलेल्या सिंचनाच्या योजनाही रखडल्या आहेत.

ठळक मुद्देसिरोंचा तालुका तहानलेला : चार योजनांसह तुमडीहेटी प्रकल्पाचे काम थंडबस्त्यात

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मोठ्या नद्यांची देण असतानाही सिंचन सुविधांअभावी गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुबार पिकांपासून वंचित राहावे लागत आहेत. अशा स्थितीत जिल्ह्याच्या दक्षिण भागात प्रस्तावित असलेल्या सिंचनाच्या योजनाही रखडल्या आहेत. तेलंगणा सरकारने अवघ्या तीन वर्षात पूर्ण केलेल्या गोदावरी नदीवरील कालेश्वरम प्रकल्पामुळे गडचिरोली जिल्ह्यातील आणि विशेषत: सिरोंचा तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या तालुक्यासाठी कालेश्वरम प्रकल्पाच्या वरील बाजुने (बॅकवॉटरवर) असलेल्या चार योजनांच्या कामांना अद्याप सुरुवातही झालेली नाही.टेकडा, पेंटीपाका आणि रंगयापल्ली अशा तीन उपसा सिंचन योजनांमधून सिरोंचा तालुक्यातील ५०६६ हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली आणण्याचे नियोजन आहे. याशिवाय रेगुंठा उपसा सिंचन योजनेतून या तालुक्यातील २०५२ हेक्टर शेतजमिनीला तर तुमडीहेटी प्रकल्पातून गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातल्या २५ हजार हेक्टरला पाणी मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. परंतू प्रत्यक्षात या योजनांची सद्यस्थिती पाहता गेल्या ३-४ वर्षात या योजनांच्या कामांना गतीच आली नसल्याचे दिसून येते.तीन प्रमुख योजनांची प्राथमिक मंजुरी झाली आहे. परंतू पुढील प्रक्रिया मात्र अतिशय संथगतीने सुरू आहे. छोट्याछोट्या योजना असतानाही या कामांना गती मिळत नसल्यामुळे प्रशासकीय कामकाजावर सरकारी नियंत्रण नसल्याचे स्पष्ट होत आहे.कालेश्वरम प्रकल्पाच्या गतीने सदर योजनांचे काम झाले असते तर आतापर्यंत या योजनांचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचणे शक्य झाले असते. परंतू प्रत्यक्षात तसे झालेले नाही.टेकडा सिंचन योजना १४ वर्षांपासून वनवासातसिरोंचा तालुक्यात टेकडा फाट्यापासून ८ किली अंतरावर प्राणहिता नदीवर प्रस्तावित असलेल्या टेकडा उपसा सिंचन योजनेची मागणी अनेक वर्षांपूर्वीची आहे. ३७ कोटी ३५ लाख रुपये किमतीच्या या योजनेतून २००० हेक्टर शेती सिंचनाखाली येऊ शकते. त्यासाठी ४.२३ किमी लांबीचा टेकडा मुख्य कालवा आणि ३.९० किमी लांबीच्या नेमडा मुख्य कालव्याद्वारे सिरोंचा तालुक्यातील १४ गावांना सिंचनाची सोय होणार आहे. या योजनेसाठी ६७.०१५ हेक्टर खासगी तर ६ हेक्टर वनक्षेत्राची आवश्यकता आहे. या योजनेला १९ मे २००५ रोजी मंजुरी मिळाली आहे. पण गेल्या १४ वर्षात या योजनेचा अंतिम सर्वसाधारण आराखडा तयार झालेला नाही.१२ गावांची पेंटीपाका योजना थंडबस्त्यातसिरोंचा तालुक्यात गोदावरी नदीवरील मेडिगड्डा बॅरेजच्या पाणी पसाºयातून नदीच्या डाव्या तिरावर पेंटीपाका उपसा सिंचन योजना प्रस्तावित आहे. ही योजना गोदावरी या मुख्य खोºयाच्या उर्वरित गोदावरी (जी-१०) या उपखोºयाअंतर्गत येते. गोदावरी पाणी तंटा लवादानुसार जी-१० या उपखोºयात महाराष्टÑ राज्याला २८.३२ दलघमी पाणी वापराचे हक्क आहे. योजनेची किंमत ४४.७५ कोटी असून सिंचन क्षमता २२१८ हेक्टर आहे. त्यासाठी ६.५४ किमी लांबीचा डाव्या कालवा तर २१० मीटर लांबीच्या उजव्या फिडर कॅनलद्वारे पेंटीपाका लघु पाटबंधारे तलावात पाणी सोडण्यात येणार आहे.या योजनेतून आयपेठा, तुमनूरमाल, तुमनूरचेक, पेंटीपाकाचेक, मुगापूर, पेंटीपाका वेस्टलँड, मृदुक्रिष्णापूर, राजनपल्ली, आरडा, मदीकुंठा, जामनपल्ली वेस्टलँड व रामानुजापूर या १२ गावातील शेतकºयांना सिंचनाची सुविधा होणार आहे. या योजनेला २६ मे २०१० रोजी मंजुरी मिळाली आहे. मात्र योजनेच्या कामाला अद्यापही गती आलेली नाही. योजनेचे संकल्पन करण्यासाठी आवश्यक माहिती मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना, नाशिक या कार्यालयास सादर करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.रंगयापल्ली उपसा सिंचन योजना अडकली लालफितशाहीतसिरोंचा तालुक्यात प्राणहिता नदीच्या डाव्या तिरावर मौजा पोचमपल्ली येथे प्रस्तावित असलेल्या या योजनेच्या मानचित्र अभ्यास अहवालास जलसंपदा विभाग नागपूरकडून १५ डिसेंबर २०११ नुसार मंजुरी मिळाली आहे. तसेच पाणी उपलब्धता प्रस्तावानुसार २९ सप्टेंबर २०१६ रोजी ६.५७१ दलघमी पाणी वापरास मंजुरी मिळाली आहे. १५ कोटी ७२ लाख रुपयांच्या या योजनेतून ८४८ हेक्टर शेतीला सिंचन होणे अपेक्षित आहे. त्यासाठी ७ किमी लांब कालवा बांधला जाणार आहे. या भागाच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी सिंचनाकरिता या योजनेशिवाय दुसरा पर्याय नसल्यामुळे नक्षलदृष्ट्या संवेदनशिल भाग असूनही मंजुरी मिळाली. योजनेच्या सर्व्हेक्षण कामासाठी निविदा काढण्याची परवानगी मागणारा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. परंतू अजूनही हे काम लालफितशाहीत अडकून आहे.