शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

चामोर्शीत नळाला गढूळ व चिखलयुक्त पाण्याचा पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:30 IST

पावसाळ्यात नदीला गढूळ पाणी येत आहे. परंतु, मार्कंडादेव रोडवर नगरपंचायत प्रशासनाचे जल शुद्धीकरण केंद्र आहे. नदीतील गढूळ पाणी जलशुद्धीकरण ...

पावसाळ्यात नदीला गढूळ पाणी येत आहे. परंतु, मार्कंडादेव रोडवर नगरपंचायत प्रशासनाचे जल शुद्धीकरण केंद्र आहे. नदीतील गढूळ पाणी जलशुद्धीकरण केंद्रात टाकून त्या ठिकाणी ते पाणी शुद्ध करून शहराला पाणीपुरवठा केला जातो. मागील २० दिवसांपासून जलशुद्धीकरण केंद्रातील यंत्रात बिघाड झाल्याने त्यापासून पाणी शुद्ध होत नसल्याने चामोर्शी शहरवासीयांना पिण्यासाठी गडूळ व चिखलयुक्त पाणी भरावे लागत आहे. पावसाचे दिवस असल्याने गढूळ पाण्यामुळे रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. त्यामुळे नगरपंचायत प्रशासनाने यंत्राची दुरुस्ती करून चामोर्शीकरांना शुद्ध पाणीपुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

जलशुद्धीकरण निर्मितीला पंधरा वर्षांपेक्षा अधिक काळ झाला असून जलशुद्धीकरण केंद्रात असलेल्या विविध यंत्राची झीज होत आहे. त्यामुळे त्या यंत्रात बिघाड होऊन पावसाळ्याच्या दिवसात नागरिकांना गढूळ पाणी पिण्याची वेळ आलेली असून प्रशासनाने या जलशुद्धीकरण केंद्रातील मशिनरीकडे लक्ष घालून यंत्राची दुरुस्ती लवकरात लवकर करून चामोर्शी शहरवासीयांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा, अशी मागणी शहरवासीयांनी केली आहे.

बॉक्स -

दुरुस्ती करणार

जलशुद्धीकरण केंद्रातील शुद्ध पाणी करणारे बेड चोकअप झाल्याने पाणी शुद्ध करण्यास अडथळा निर्माण होत आहे. दुरुस्ती करून येत्या चार दिवसांत शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात येईल, अशी माहिती नगरपंचायत चामोर्शीचे अभियंता निखिल कारेकर यांनी दिली.

240721\img-20210714-wa0146.jpg

जलशुद्धीकरण केंन्द्र फाटो