शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
3
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
4
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
5
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
6
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
7
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
8
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
11
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
12
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
13
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
14
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
15
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
16
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
17
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
18
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
19
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
20
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर

उन्हाळ्यातील टाकाऊ वस्तू नदीपात्रात

By admin | Updated: May 27, 2014 23:43 IST

उन्हाळ्यात टाकाऊ वस्तूंची विल्हेवाट अनेक शहरात ठिकाणी लावली जाते. परंतु टाकाऊ वस्तूंची विल्हेवाट लावतांना नदीपात्र, तलाव, बोड्या यांचा सर्वाधिक वापर केला जातो. स्वच्छ सुंदर असलेल्या

गडचिरोली : उन्हाळ्यात टाकाऊ वस्तूंची विल्हेवाट अनेक शहरात ठिकाणी लावली जाते. परंतु टाकाऊ वस्तूंची विल्हेवाट लावतांना नदीपात्र, तलाव, बोड्या यांचा सर्वाधिक वापर केला जातो. स्वच्छ सुंदर असलेल्या नदीपात्रात, तलाव-नाल्याच्या ठिकाणी सार्वजनिक मोकळय़ा जागेत गावातील टाकाऊ साहित्य, गावातील नाल्याचा उपसा केलेला गाळ, घरातील केरकचरा, काचेच्या प्लॉस्टीकच्या बाटला व इजा करणार्‍या वस्तू टाकल्या जातात. त्यामुळे नदी-नाल्याचे जलस्त्रोत दुषित होतात.

पाडलेल्या इमारतींचे टाकाऊ साहित्य तलाव, बोडी व नदीपात्रात तसेच शहरालगत असलेल्या मोकळय़ा जागेत टाकले जात आहेत. त्यामुळे पावसाळ्यात जनावरे व नागरिकांना इजा होण्याची शक्यता असते. त्यामुळे उन्हाळ्यात टाकाऊ वस्तू बाहेर फेकण्यासंदर्भात निर्बंध असणे आवश्यक आहे. स्वत:च्या घराचे जीर्ण सिमेंटचे छत तोडून टाकाऊ साहित्य, तसेच प्लॉस्टीक, फायबर वस्तूंचे मोडकळीस आलेले साहित्य बाहेर फेकले जातात. त्यामुळे नदीचे पात्र व तलाव, बोडींचे खोल असलेले पात्र भरण्याच्या मार्गावर आले आहे. सिमेंट, गिट्टीसह असलेले साहित्य पावसाळय़ातही वाहून जात नाही. त्यामुळे नदीपात्रातच टाकाऊ साहित्याचा थर जमा होत असतो. परिणामी खोल असलेले नदीपात्र खोल असलेले नदीपात्र उथळ होत आहे.

या घाटावर शेतकरी आपले बैल धुण्यासाठी तसेच महिलाही कपडे धुण्यासाठी येत असतात. त्यामुळे महिला व पुरूषांना याचा त्रास होत असतो. नदीपात्रात टाकाऊ साहित्य टाकणार्‍या व्यक्तींवर कारवाईची मागणी केली जात आहे. रेती घाटावर नाल्यांचा उपसा केलेली घाणमाती नदीपात्रात टाकल्या जात आहे. त्यात दगड, काच, लोखंडी तार असल्याने नदीपात्रात नागरिकांना धोका निर्माण झाला होता. घातक साहित्यामुळे दीर्घकाळपर्यंत नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. नदीपात्रात ट्रॅक्टर सहजतेने जाण्यासाठी माती, मुरूम, दगड नदीपात्रात टाकतात. त्यामुळे नैसर्गिकरित्या स्वच्छ सुंदर असलेले नदीपात्र खराब होते. गौण खनिजावर करोड रूपयाचा महसूल मिळविणारे विभाग असे अघोरी कृत्य करणार्‍या लोकांवर कोणतीही कारवाई करत नाही. नदीपात्र व तलाव, बोडी यासह अनेक जलस्त्रोतांमध्ये मानवी प्रकोपाच्या हस्तक्षेपामुळे पर्यावरणास धोका निर्माण झाला आहे. अवैध व नियमबाहय़ होणारे गौण उत्खनन तसेच नैसर्गिकरित्या स्वच्छ असलेल्या नदीपात्रात नाल्यांचा उपसा केलली माती, मुरूम, दगड इतर टाकावू साहित्य टाकून खराब केले जाते.

(शहर प्रतिनिधी)