शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

उन्हाळ्यातील टाकाऊ वस्तू नदीपात्रात

By admin | Updated: May 27, 2014 23:43 IST

उन्हाळ्यात टाकाऊ वस्तूंची विल्हेवाट अनेक शहरात ठिकाणी लावली जाते. परंतु टाकाऊ वस्तूंची विल्हेवाट लावतांना नदीपात्र, तलाव, बोड्या यांचा सर्वाधिक वापर केला जातो. स्वच्छ सुंदर असलेल्या

गडचिरोली : उन्हाळ्यात टाकाऊ वस्तूंची विल्हेवाट अनेक शहरात ठिकाणी लावली जाते. परंतु टाकाऊ वस्तूंची विल्हेवाट लावतांना नदीपात्र, तलाव, बोड्या यांचा सर्वाधिक वापर केला जातो. स्वच्छ सुंदर असलेल्या नदीपात्रात, तलाव-नाल्याच्या ठिकाणी सार्वजनिक मोकळय़ा जागेत गावातील टाकाऊ साहित्य, गावातील नाल्याचा उपसा केलेला गाळ, घरातील केरकचरा, काचेच्या प्लॉस्टीकच्या बाटला व इजा करणार्‍या वस्तू टाकल्या जातात. त्यामुळे नदी-नाल्याचे जलस्त्रोत दुषित होतात.

पाडलेल्या इमारतींचे टाकाऊ साहित्य तलाव, बोडी व नदीपात्रात तसेच शहरालगत असलेल्या मोकळय़ा जागेत टाकले जात आहेत. त्यामुळे पावसाळ्यात जनावरे व नागरिकांना इजा होण्याची शक्यता असते. त्यामुळे उन्हाळ्यात टाकाऊ वस्तू बाहेर फेकण्यासंदर्भात निर्बंध असणे आवश्यक आहे. स्वत:च्या घराचे जीर्ण सिमेंटचे छत तोडून टाकाऊ साहित्य, तसेच प्लॉस्टीक, फायबर वस्तूंचे मोडकळीस आलेले साहित्य बाहेर फेकले जातात. त्यामुळे नदीचे पात्र व तलाव, बोडींचे खोल असलेले पात्र भरण्याच्या मार्गावर आले आहे. सिमेंट, गिट्टीसह असलेले साहित्य पावसाळय़ातही वाहून जात नाही. त्यामुळे नदीपात्रातच टाकाऊ साहित्याचा थर जमा होत असतो. परिणामी खोल असलेले नदीपात्र खोल असलेले नदीपात्र उथळ होत आहे.

या घाटावर शेतकरी आपले बैल धुण्यासाठी तसेच महिलाही कपडे धुण्यासाठी येत असतात. त्यामुळे महिला व पुरूषांना याचा त्रास होत असतो. नदीपात्रात टाकाऊ साहित्य टाकणार्‍या व्यक्तींवर कारवाईची मागणी केली जात आहे. रेती घाटावर नाल्यांचा उपसा केलेली घाणमाती नदीपात्रात टाकल्या जात आहे. त्यात दगड, काच, लोखंडी तार असल्याने नदीपात्रात नागरिकांना धोका निर्माण झाला होता. घातक साहित्यामुळे दीर्घकाळपर्यंत नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. नदीपात्रात ट्रॅक्टर सहजतेने जाण्यासाठी माती, मुरूम, दगड नदीपात्रात टाकतात. त्यामुळे नैसर्गिकरित्या स्वच्छ सुंदर असलेले नदीपात्र खराब होते. गौण खनिजावर करोड रूपयाचा महसूल मिळविणारे विभाग असे अघोरी कृत्य करणार्‍या लोकांवर कोणतीही कारवाई करत नाही. नदीपात्र व तलाव, बोडी यासह अनेक जलस्त्रोतांमध्ये मानवी प्रकोपाच्या हस्तक्षेपामुळे पर्यावरणास धोका निर्माण झाला आहे. अवैध व नियमबाहय़ होणारे गौण उत्खनन तसेच नैसर्गिकरित्या स्वच्छ असलेल्या नदीपात्रात नाल्यांचा उपसा केलली माती, मुरूम, दगड इतर टाकावू साहित्य टाकून खराब केले जाते.

(शहर प्रतिनिधी)