शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

भामरागडात आदिवासी विद्यार्थ्यांसाठी समर कॅम्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 22:20 IST

उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये विद्यार्थ्याना व्यक्तीमत्व विकासासाठी शहरांमध्ये समर कॅम्पचे आयोजन केले जाते. परंतू भामरागडसारख्या आदिवासी तालुक्यातील पालकांची समर कॅम्पसाठी पैसे मोजण्याची परिस्थिती नाही. त्यामुळे या तालुक्यामध्ये समर कॅम्पचे आयोजन करण्यास कोणतीही संस्था तयार होत नाही. मात्र समर कॅम्पचे महत्त्व लक्षात घेऊन गडचिरोली पोलीस दल व गट साधन केंद्र भामरागडने पुढाकार घेतला आहे.

ठळक मुद्दे११७६ विद्यार्थ्यांचा सहभाग : पोलीस दल व गट साधन केंद्राचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये विद्यार्थ्याना व्यक्तीमत्व विकासासाठी शहरांमध्ये समर कॅम्पचे आयोजन केले जाते. परंतू भामरागडसारख्या आदिवासी तालुक्यातील पालकांची समर कॅम्पसाठी पैसे मोजण्याची परिस्थिती नाही. त्यामुळे या तालुक्यामध्ये समर कॅम्पचे आयोजन करण्यास कोणतीही संस्था तयार होत नाही. मात्र समर कॅम्पचे महत्त्व लक्षात घेऊन गडचिरोली पोलीस दल व गट साधन केंद्र भामरागडने पुढाकार घेतला आहे.२२ ते २४ एप्रिल या तीन दिवसांच्या कालावधीत तालुक्यातील सहा ठिकाणी नि:शुल्क समर कॅम्पचे आयोजन केले आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी विद्यार्थ्यांची राहण्याचीही सोय करण्यात आली असल्याने या समर कॅम्पला ‘विशेष विद्यार्थी बाल आनंद निवास शिबिर’ असे नाव देण्यात आले आहे.भामरागड तालुक्यातील भामरागड, गोंगवाडा, लाहेरी, नारगुंडा, ताडगाव, मन्नेराजाराम या केंद्रांवर एकाच वेळी शिबिरांचे आयोजन केले आहे. शिबिरांचे उद्घाटन सोमवारी (दि.२२) झाले. याप्रसंगी धोडराजचे पोलीस उपनिरिक्षक श्रीकांत काळे, गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनावने, गोंगवाडाचे केंद्र प्रमुख भाऊराव निखाडे, समन्वयक राज वाळवी, कैलास जगने, धनराज पोरटे आदी मान्यवर उपस्थित होते. संचालन चांगदेव सोरते तर आभार राजू धात्रक यांनी मानले. सहाही केंद्रांवर सुमारे १ हजार १७६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. दुसरी ते सातवीपर्यंतचे विद्यार्थी या आनंद निवासी शिबिरात सहभागी होणार आहेत. पोलिसांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना कलर बॉक्स, नोटबूक, बालपेन, साबन, हेअर आॅईल, पावडर, स्केच पेन, मार्कर पेन आदी साहित्यांचे वितरण करण्यात आले.अशी आहे दिनचर्यासकाळी ५.३० ते ६.३० वाजेपर्यंत योगाचे प्रशिक्षण दिले जाईल. सकाळी ६.३० ते ८.३० पर्यंत आंघोळ व इतर कार्यासाठी वेळ दिला जाईल. ८.३० ते ९ वाजेपर्यंत सकाळचा नास्ता, ९ ते ९.४५ वाजेपर्यंत आदर्श परिपाठ, ९.४५ ते १० वाजेपर्यंत ग्रुप निर्मिती व सवंगडी परिचय, १० ते ११ वाजेपर्यंत खेळ व कृतीयुक्त गीत, ११.३० ते १ वाजेपर्यंत भाष व गणित विषयाशी सुसंगत उपक्रम, दुपारी १ ते ३ वाजेपर्यंत दुपारची विश्रांती, दुपारी ३ ते ३.४५ पर्यंत पेपर आर्ट, ३.४५ ते ४.३० वाजेपर्यंत स्टोरी तयार करणे, ४.३० ते ५ वाजेपर्यंत कृतीशील गीते, टायर गेम, ५.२० ते ५.५० पर्यंत साखळी पूर्ण करणे, ५.५० ते ६.३० पर्यंत शब्दांची शर्यत, अंताक्षरी खेळणे, ६.३० ते ८.३० वाजेपर्यंत जेवन, ८.३० ते १० वाजेपर्यंत सकारात्मक व प्रेरणादायी उपक्रमांवर चित्रपट दाखविले जातील.