शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
8
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
9
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
10
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
11
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
12
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
13
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
14
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
15
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
16
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
17
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
18
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
19
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
20
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

भामरागडात आदिवासी विद्यार्थ्यांसाठी समर कॅम्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 22:20 IST

उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये विद्यार्थ्याना व्यक्तीमत्व विकासासाठी शहरांमध्ये समर कॅम्पचे आयोजन केले जाते. परंतू भामरागडसारख्या आदिवासी तालुक्यातील पालकांची समर कॅम्पसाठी पैसे मोजण्याची परिस्थिती नाही. त्यामुळे या तालुक्यामध्ये समर कॅम्पचे आयोजन करण्यास कोणतीही संस्था तयार होत नाही. मात्र समर कॅम्पचे महत्त्व लक्षात घेऊन गडचिरोली पोलीस दल व गट साधन केंद्र भामरागडने पुढाकार घेतला आहे.

ठळक मुद्दे११७६ विद्यार्थ्यांचा सहभाग : पोलीस दल व गट साधन केंद्राचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये विद्यार्थ्याना व्यक्तीमत्व विकासासाठी शहरांमध्ये समर कॅम्पचे आयोजन केले जाते. परंतू भामरागडसारख्या आदिवासी तालुक्यातील पालकांची समर कॅम्पसाठी पैसे मोजण्याची परिस्थिती नाही. त्यामुळे या तालुक्यामध्ये समर कॅम्पचे आयोजन करण्यास कोणतीही संस्था तयार होत नाही. मात्र समर कॅम्पचे महत्त्व लक्षात घेऊन गडचिरोली पोलीस दल व गट साधन केंद्र भामरागडने पुढाकार घेतला आहे.२२ ते २४ एप्रिल या तीन दिवसांच्या कालावधीत तालुक्यातील सहा ठिकाणी नि:शुल्क समर कॅम्पचे आयोजन केले आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी विद्यार्थ्यांची राहण्याचीही सोय करण्यात आली असल्याने या समर कॅम्पला ‘विशेष विद्यार्थी बाल आनंद निवास शिबिर’ असे नाव देण्यात आले आहे.भामरागड तालुक्यातील भामरागड, गोंगवाडा, लाहेरी, नारगुंडा, ताडगाव, मन्नेराजाराम या केंद्रांवर एकाच वेळी शिबिरांचे आयोजन केले आहे. शिबिरांचे उद्घाटन सोमवारी (दि.२२) झाले. याप्रसंगी धोडराजचे पोलीस उपनिरिक्षक श्रीकांत काळे, गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनावने, गोंगवाडाचे केंद्र प्रमुख भाऊराव निखाडे, समन्वयक राज वाळवी, कैलास जगने, धनराज पोरटे आदी मान्यवर उपस्थित होते. संचालन चांगदेव सोरते तर आभार राजू धात्रक यांनी मानले. सहाही केंद्रांवर सुमारे १ हजार १७६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. दुसरी ते सातवीपर्यंतचे विद्यार्थी या आनंद निवासी शिबिरात सहभागी होणार आहेत. पोलिसांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना कलर बॉक्स, नोटबूक, बालपेन, साबन, हेअर आॅईल, पावडर, स्केच पेन, मार्कर पेन आदी साहित्यांचे वितरण करण्यात आले.अशी आहे दिनचर्यासकाळी ५.३० ते ६.३० वाजेपर्यंत योगाचे प्रशिक्षण दिले जाईल. सकाळी ६.३० ते ८.३० पर्यंत आंघोळ व इतर कार्यासाठी वेळ दिला जाईल. ८.३० ते ९ वाजेपर्यंत सकाळचा नास्ता, ९ ते ९.४५ वाजेपर्यंत आदर्श परिपाठ, ९.४५ ते १० वाजेपर्यंत ग्रुप निर्मिती व सवंगडी परिचय, १० ते ११ वाजेपर्यंत खेळ व कृतीयुक्त गीत, ११.३० ते १ वाजेपर्यंत भाष व गणित विषयाशी सुसंगत उपक्रम, दुपारी १ ते ३ वाजेपर्यंत दुपारची विश्रांती, दुपारी ३ ते ३.४५ पर्यंत पेपर आर्ट, ३.४५ ते ४.३० वाजेपर्यंत स्टोरी तयार करणे, ४.३० ते ५ वाजेपर्यंत कृतीशील गीते, टायर गेम, ५.२० ते ५.५० पर्यंत साखळी पूर्ण करणे, ५.५० ते ६.३० पर्यंत शब्दांची शर्यत, अंताक्षरी खेळणे, ६.३० ते ८.३० वाजेपर्यंत जेवन, ८.३० ते १० वाजेपर्यंत सकारात्मक व प्रेरणादायी उपक्रमांवर चित्रपट दाखविले जातील.