शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
2
कामगिरी दमदार; पीएम मोदींच्या हनुमानाची 'हनुमान उडी', LJP(R) इतक्या जागांवर आघाडीवर...
3
बिहार निवडणूक निकाल: राघोपुरात तेजस्वी यादव पिछाडीवर; लखीसरायमध्ये विजय सिन्हांची आघाडी कायम
4
बिहारमध्ये NDA ला आघाडी, भाजप-जेडीयूच्या जागा वाढल्या; तेजस्वी यादवांना 'या' ५ चुका पडल्या महागात!
5
बिहारमध्ये RJD ला सर्वाधिक मते, पण केवळ ३५ जागांवर आघाडी; भाजपा-जेडीयूला किती टक्के मते मिळाली?
6
“इंदुरीकर महाराज, फेटा खाली उतरवू नका, सोशल मीडियावरील छपरींकडे दुर्लक्ष करा”; कुणाचे आवाहन?
7
"आता काँग्रेस पूर्वीपेक्षा अधिक…"; आपल्याच पक्षासंदर्भात काय बोलले शशी थरूर? भाजपच्या धोरणांकडे 'इशारा'!
8
Utpatti Ekadashi 2025: उत्पत्ती एकादशीला 'या' ६ उपायांनी पापमुक्त व्हा; पाहा पूजाविधी!
9
Maithili Thakur : "मला माझं यश दिसतंय, पण...", आघाडी घेताच लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूरची पहिली प्रतिक्रिया
10
नेटबँकिंग वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! SBI, HDFC सह सर्व बँकांच्या वेबसाइटचे डोमेन बदलले; काय आहे कारण?
11
बिहार निवडणुकीत बाहुबलींचा दबदबा कायम; 'या' 12 जागांनी वाढवली उत्सुकता, कोण पुढे? पाहा...
12
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: बिहारमध्ये भाजपा-जेडीयू युतीला ऐतिहासिक आघाडी; 'राजद'ला मोठा दणका
13
Bihar Result 2025: बिहारच्या निकालात NDA ला प्रचंड बहुमत; आता BJP-JDU मध्ये 'बिग ब्रदर'साठी चुरस
14
Bihar Election 2025 Result: बहुचर्चित मैथिली ठाकूर आघाडीवर, ‘ती’ ६० टक्के मते ठरणार निर्णायक
15
IND vs SA : बुमराहनं 'परफेक्ट सेटअप'सह असा केला सलामीवीरांचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
16
भारीच! हातात हात, तयारीत भक्कम साथ; बॉयफ्रेंडच्या मदतीने 'ती' झाली DSP, 'तो' ही आहे अधिकारी
17
तुमचं मुल १८व्या वर्षीच होईल श्रीमंत! बालदिनी NPS वात्सल्य योजनेद्वारे बाळाचं भविष्य करा सुरक्षित
18
दीड वर्षात सिनेमा बंद होणार! मांजरेकरांच्या वक्तव्यावर अजिंक्य देव म्हणाले, 'अजिबात नाही...'
19
Bihar Election Result 2025: शिंदेसेनेच्या नेत्याचा जावई बिहार निवडणुकीत पिछाडीवर; JDU ची आघाडी
20
निवडणूक आयोगाचा अनागोंदी कारभार, वेबसाईटवर तांत्रिक चुका; आघाडीवरील उमेदवार 'पराभूत' म्हणून घोषित!
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहक मंचाने मिळवून दिली विम्याची रक्कम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 23:37 IST

शेतात फवारणी करताना मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या पत्नीला तब्बल आठ वर्षानंतर जिल्हा ग्राहक मंचाने विम्याची रक्कम मिळवून देऊन तिला न्याय दिला आहे.

ठळक मुद्देविमा कंपनीला चपराक : तब्बल आठ वर्षानंतर मिळाला न्याय

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : शेतात फवारणी करताना मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या पत्नीला तब्बल आठ वर्षानंतर जिल्हा ग्राहक मंचाने विम्याची रक्कम मिळवून देऊन तिला न्याय दिला आहे.तक्रारकर्ती प्रमिला हनुमान वसाके मु.पो. वेलगूर, त. अहेरी, गडचिरोली, यांचे पती हनुमान दसरु वसाके यांचा शेतात फवारणी करताना विषारी किटकनाशक नाकातोंडात गेल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. प्रमिला वसाके यांचे पतीने शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा काढलेला होता. त्यानुसार तक्रारकर्ती यांनी पतीच्या अपघाती मृत्यूनंतर तालुका कृषी अधिकारी अहेरी यांच्याकडे रितसर अर्ज केला व आवश्यक कागदपत्रांची पुर्तता केली. मात्र आठ वर्षे उलटूनही तक्रारकर्ती वसाके यांचा अपघाती विमा दावा मंजूर अथवा नामंजूर झाला याबाबत तालुका कृषी अधिकारी यांनी कळविले नाही. तक्रारकर्ती ही अशिक्षित व दुर्गम भागातील असल्याने तिला याबाबत वारंवार चौकशी करणे शक्य झाले नाही. शेवटी आपल्या नातेवाईकामार्फत २०१७ रोजी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी गडचिरोली यांच्याकडे माहिती अधिकार कायद्याखाली माहिती विचारली असता त्यांनी तक्रारकर्तीचा दावा ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी नागपूर यांनी नाकारल्याबाबत माहिती दिली. परंतु विमा कंपनीने दावा नाकारल्याबाबतची प्रत दिली नाही. तेव्हा तक्रारकर्तीने जिल्हा ग्राहक मंच गडचिरोली यांच्याकडे रितसर तक्रार दाखल केली. तक्रारीमध्ये विमा दाव्याची संपूर्ण रक्कम व नुकसान भरपाई तसेच इतर खर्च यांची मागणी केली.मंचासमोर तक्रार आल्यांनतर तक्रार दाखल करुन घेऊन विरुध्द पक्ष ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी नागपूर, तालुका कृषी अधिकारी अहेरी व कबाल इन्शुरन्स कंपनी यांना लेखी उत्तर दाखल करण्याबाबत नोटीस पाठविले. मंचाने पाठविलेल्या नोटीसला ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी नागपूर यांनी आपले लेखी उत्तर दाखल केले व तक्रारीकर्तीने मागणी केलेली दाव्याची रक्कम अमान्य करीत तक्रार खारीज करण्याबाबत मंचास विनंती केली. मंचाने उभय पक्षाचा युक्तीवाद ऐकूण घेतला. मंचाचे निष्कर्षानुसार तक्रारकर्ती ही अशिक्षित व आदिवासी बहूल भागातील महिला असल्यामुळे दावा नाकारल्याबाबतचे पत्र तक्रारकर्तीला प्राप्त झाल्याबाबत ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी पुराव्यानिशी सिध्द करु शकली नाही. त्यामुळे तक्रारकर्तीचा दावा मुदतबाह्य आहे, असे म्हणणे योग्य होणार नाही. असा मंचाने आपल्या निकालपत्रामध्ये म्हटले आहे.तक्रार अंशत: मंजूर करुन विमा दाव्याची रक्कम एक लाख रूपये, त्यावर १२ टक्के व्याज, मानसिक त्रासाकरिता १० हजार रूपये व तक्रारीचा खर्च पाच हजार रूपये विमा कंपनीने तक्रारकर्त्या विधवा महिलेलला द्यावे, असा आदेश मंचाचे प्रभारी अध्यक्ष रोझा खोब्रागडे, सदस्य सादिक झवेरी यांनी पारित केला. याकरिता तक्रारकर्तीतर्फे अधिवक्ता उदय क्षिरसागर व गैरअर्जदार विमा कंपनीतर्फे अधिवक्ता ए. सी. सूर्यवंशी यांनी काम पाहिले.कीटकनाशकाच्या बाधेने झालेला मृत्यू भरपाईस पात्रतक्रारकर्तीच्या पतीने विष प्राषन करुन आत्महत्या केली. याबाबतची विमा कंपनी कुठलेही पुरावे दाखल केले नाही. सद्यपरिस्थितीत विषारी औषधाची फवारणी करताना फवारणीबाबत आवश्यक माहिती नसल्याने विषारी औषध नाकातोंडात गेल्याने मृत्यू होत आहेत. त्यापैकीच हे एक प्रकरण असल्याचे मंचाने म्हटले.