शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कोसा उत्पादकांना सुगीचे दिवस

By admin | Updated: November 6, 2016 01:28 IST

सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यमान झाल्याने कोसा उत्पादनासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे.

योग्य वातावरण : उत्पादनात होणार वाढवैरागड : सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यमान झाल्याने कोसा उत्पादनासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे कोसा उत्पादकांना किमान यावर्षी तरी सुगीचे दिवस येतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यापूर्वी दोन हंगाम पार पडले असून या हंगामामध्ये मागील पाच वर्षांच्या तुलनेत अधिक कोस्याचे उत्पादन झाले आहे. त्यामुळे कोसा उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा व गोंदिया चार जिल्ह्यांमध्ये कोसाचे उत्पादन घेतले जाते. या शेतीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेकडो नागरिकांना उपजीविकेचे साधन निर्माण होते. कोस्याचा प्रथम हंगाम पावसाळा संपल्यानंतर आॅगस्ट महिन्याच्या चवथ्या आठवड्यात दुसरा हंगाम नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आणि तिसरा हंगाम डिसेंबर, जानेवारी महिन्यात हाती येते. पहिला हंगाम चांगला आला आहे.पुढील तीन हंगाम सुद्धा चांगले येतील, अशी प्रतिक्रिया मेंढोबोडी येथील कोसा उत्पादक शेतकरी विलास गेडाम, पत्रू गेडाम, देवराव गेडाम, बिसन गेडाम, मारोती कांबळे, रेवन मेश्राम, चरण मुंगीकोल्हे, पुंडलिक कांबळे, यशवंत गेडाम यांनी दिली. आॅक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात जे हंगाम काढण्यात आले त्या हंगामात मागील पाच वर्षांच्या तुलनेत अधिक उत्पादन झाले. लाभार्थी योजनेंतर्गत बिजकोष उत्पादकांना १ हजार २०० रूपयात १०० अंडीपुंज सवलतीच्या दरात मिळतात. यात रेशीम मंडळाचा आर्थिक सहभाग आहे, अशी माहिती कोसा उत्पादक शेतकरी सुधाकर बक्षी मेश्राम यांनी दिली. येन व अर्जुन या वृक्षावर अंडीपुंज तयार केली जातात. आरमोरी येथील केंद्रातून टसर रेशीम विकासाकरिता मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. मागील पाच वर्ष विविध कारणामुळे कोस्याचे उत्पादन पाहिजे त्या प्रमाणात होत नव्हते. काही कोसा उत्पादकांना तर तोट्याचा सामना करावा लागत होता. यावर्षी मात्र हंगाम चांगला आहे. (वार्ताहर)