शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

चव्हेलातील सिंचन कागदोपत्रीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 22:28 IST

निर्मल ग्राम पुरस्कृत चव्हेला येथील माती बंधाऱ्याचे बांधकाम पूर्ण झाले असले तरी या बंधाऱ्यात एकही पाणी जमा झाले नाही. त्यामुळे शेत जमिनीला सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली नाही.

ठळक मुद्दे३० लाखांचा खर्च पाण्यात : जुन्याच पाळीवर माती टाकून लाटला निधी

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : निर्मल ग्राम पुरस्कृत चव्हेला येथील माती बंधाऱ्याचे बांधकाम पूर्ण झाले असले तरी या बंधाऱ्यात एकही पाणी जमा झाले नाही. त्यामुळे शेत जमिनीला सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली नाही. अधिकारी व कंत्राटारांनी संगनमत करून बंधाºयाच्या बांधकामातील बराच पैसा जिरविला असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.धानोरा येथून आठ किमी अंतरावर असलेल्या चव्हेला येथील शेतशिवारात माती बंधारा २०१७ मध्ये मंजूर करण्यात आला. यासाठी ३० लाख रूपये मंजूर झाले. एका बाजूस मातीची पाळ व दुसऱ्या बाजूस डोंगराळ भाग आहे. बंधाऱ्यात पावसाचे पाणी जमा झाल्यानंतर माळंदा, चव्हेला, पवनी या गावातील हजारो एकर जमीन ओलीत होईल, असे नियोजन होते. मात्र पाळीला अनेक ठिकाणी छिद्र पडल्याने पाणी वाहून गेले. ग्रामस्थांना विश्वासात घेऊन काम केले असते तर साडेचार हजार एकर शेतजमिनीला सिंचन झाले असते. वेस्ट वेअरचे बांधकाम ५० फुट दूर अंतरावर होणे आवश्यक होते. मात्र जवळच बांधकाम करण्यात आले.सध्या अस्तित्त्वात असलेली पाळ चव्हेला वासीयांनी श्रमदानातून १० फुट उंच बांधली आहे. त्याठिकाणी थातुरमातूर काम करून सुमारे ३० लाख १४ हजार रूपये उचलण्यात आले आहेत. यामध्ये कंत्राटदार व अधिकारी यांची मिलीभगत असल्याचा स्पष्ट आरोप नागरिकांनी केला आहे.बंधाºयाच्या पाळीला सिमेंट काँक्रिटची पिचिंग केले असते तर पाणी साचून राहिले असते. याचा लाभ ३०० शेतकऱ्यांना झाला असता. जंगली प्राण्यांनासुद्धा उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली असती. गावातील पाण्याची पातळी वाढली असती. परंतु भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे ३० लाख रूपये खर्च होऊनही सिंचनाची सुविधा मिळू शकली नाही, असा आरोप चव्हेलाचे उपसरपंच आनंदराव उसेंडी, माजी उपसरपंच हनमंतू नरोटे, ग्रामसभाध्यक्ष अमित नरोटे, निरंगू गावडे, बाजीराव आत्राम, ऋषी नरोटे यांनी केला आहे.बंधाºयाच्या भ्रष्टाचाराबाबत अधिकाऱ्यांकडे अनेकवेळा तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र गावकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेण्यात आली नाही. याचा अर्थ या बंधाऱ्याच्या भ्रष्टाचारात कंत्राटदारासह स्थानिक कर्मचारी, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे हात गुंतले असल्याचा स्पष्ट आरोप गावकऱ्यांनी केला असून याची चौकशीची मागणी केली आहे.आमदारांचे आश्वासन हवेतच विरलेआ. डॉ. देवराव होळी यांनी या बंधाऱ्याला भेट दिली होती. बंधाºयाचे बांधकाम बघून झाल्यानंतर या बंधाऱ्याला पर्यटन स्थळाच्या दृष्टीने विकसित केले जाईल, असे आश्वासन गावकऱ्यांना दिले. मात्र त्यांचे आश्वासन हवेतच विरले, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.या गावाने अनेक पुरस्कार पटकाविले. पुरस्काराच्या निधीतून गावाचा विकास करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आमदार, खासदारांनी या गावाच्या विकासासाठी एकही निधी दिला नाही, अशी खंत गावकऱ्यांनी व्यक्त केली. स्थानिक लोकप्रतिनिधींचे या गावाच्या विकासाकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे आमदार, खासदार, मंत्री यांना यापुढे गावात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा गावकºयांनी दिला आहे.