शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
5
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
6
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
7
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
8
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
10
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
11
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
12
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
13
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
14
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
15
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
16
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
17
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
18
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
19
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

चव्हेलातील सिंचन कागदोपत्रीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 22:28 IST

निर्मल ग्राम पुरस्कृत चव्हेला येथील माती बंधाऱ्याचे बांधकाम पूर्ण झाले असले तरी या बंधाऱ्यात एकही पाणी जमा झाले नाही. त्यामुळे शेत जमिनीला सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली नाही.

ठळक मुद्दे३० लाखांचा खर्च पाण्यात : जुन्याच पाळीवर माती टाकून लाटला निधी

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : निर्मल ग्राम पुरस्कृत चव्हेला येथील माती बंधाऱ्याचे बांधकाम पूर्ण झाले असले तरी या बंधाऱ्यात एकही पाणी जमा झाले नाही. त्यामुळे शेत जमिनीला सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली नाही. अधिकारी व कंत्राटारांनी संगनमत करून बंधाºयाच्या बांधकामातील बराच पैसा जिरविला असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.धानोरा येथून आठ किमी अंतरावर असलेल्या चव्हेला येथील शेतशिवारात माती बंधारा २०१७ मध्ये मंजूर करण्यात आला. यासाठी ३० लाख रूपये मंजूर झाले. एका बाजूस मातीची पाळ व दुसऱ्या बाजूस डोंगराळ भाग आहे. बंधाऱ्यात पावसाचे पाणी जमा झाल्यानंतर माळंदा, चव्हेला, पवनी या गावातील हजारो एकर जमीन ओलीत होईल, असे नियोजन होते. मात्र पाळीला अनेक ठिकाणी छिद्र पडल्याने पाणी वाहून गेले. ग्रामस्थांना विश्वासात घेऊन काम केले असते तर साडेचार हजार एकर शेतजमिनीला सिंचन झाले असते. वेस्ट वेअरचे बांधकाम ५० फुट दूर अंतरावर होणे आवश्यक होते. मात्र जवळच बांधकाम करण्यात आले.सध्या अस्तित्त्वात असलेली पाळ चव्हेला वासीयांनी श्रमदानातून १० फुट उंच बांधली आहे. त्याठिकाणी थातुरमातूर काम करून सुमारे ३० लाख १४ हजार रूपये उचलण्यात आले आहेत. यामध्ये कंत्राटदार व अधिकारी यांची मिलीभगत असल्याचा स्पष्ट आरोप नागरिकांनी केला आहे.बंधाºयाच्या पाळीला सिमेंट काँक्रिटची पिचिंग केले असते तर पाणी साचून राहिले असते. याचा लाभ ३०० शेतकऱ्यांना झाला असता. जंगली प्राण्यांनासुद्धा उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली असती. गावातील पाण्याची पातळी वाढली असती. परंतु भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे ३० लाख रूपये खर्च होऊनही सिंचनाची सुविधा मिळू शकली नाही, असा आरोप चव्हेलाचे उपसरपंच आनंदराव उसेंडी, माजी उपसरपंच हनमंतू नरोटे, ग्रामसभाध्यक्ष अमित नरोटे, निरंगू गावडे, बाजीराव आत्राम, ऋषी नरोटे यांनी केला आहे.बंधाºयाच्या भ्रष्टाचाराबाबत अधिकाऱ्यांकडे अनेकवेळा तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र गावकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेण्यात आली नाही. याचा अर्थ या बंधाऱ्याच्या भ्रष्टाचारात कंत्राटदारासह स्थानिक कर्मचारी, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे हात गुंतले असल्याचा स्पष्ट आरोप गावकऱ्यांनी केला असून याची चौकशीची मागणी केली आहे.आमदारांचे आश्वासन हवेतच विरलेआ. डॉ. देवराव होळी यांनी या बंधाऱ्याला भेट दिली होती. बंधाºयाचे बांधकाम बघून झाल्यानंतर या बंधाऱ्याला पर्यटन स्थळाच्या दृष्टीने विकसित केले जाईल, असे आश्वासन गावकऱ्यांना दिले. मात्र त्यांचे आश्वासन हवेतच विरले, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.या गावाने अनेक पुरस्कार पटकाविले. पुरस्काराच्या निधीतून गावाचा विकास करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आमदार, खासदारांनी या गावाच्या विकासासाठी एकही निधी दिला नाही, अशी खंत गावकऱ्यांनी व्यक्त केली. स्थानिक लोकप्रतिनिधींचे या गावाच्या विकासाकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे आमदार, खासदार, मंत्री यांना यापुढे गावात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा गावकºयांनी दिला आहे.