शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
5
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
6
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
7
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
8
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
9
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
10
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
11
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
12
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
13
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
14
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
15
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
16
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
17
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
18
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
19
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
20
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

आदिवासींची अशीही थट्टा; रस्ताही नसताना बांधले पूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2020 14:40 IST

Gadchiroli News घनदाट जंगलात वसलेल्या आदिवासींची कशी थट्टा केली जातेय याचं जिवंत उदाहरण भामरागड तालुक्यातील दुर्गम अशा गावांमध्ये दिसून येते.

ठळक मुद्दे लाखोंचा खर्च पाण्यात नियोजन कशाची ? फायदा कोणाचा ?

 लोकमत न्यूज नेटवर्क  

गडचिरोली:  घनदाट जंगलात वसलेल्या आदिवासींची कशी थट्टा केली जातेय याचं जिवंत उदाहरण भामरागड तालुक्यातील दुर्गम अशा गावांमध्ये दिसून येते. गावात जाण्यासाठी साधा कच्चा रस्ताही नसताना पायवाटेच्या मार्गावर चक्क चार ते पाच पूल (कालवट) तयार करण्यात आले.अशा धक्कादायक प्रकार भामरागडपासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या पदहूर गावांमध्ये समोर आला आहे. 

भामरागड-कोठी मार्गावरुन आतमध्ये तीन किलोमीटर अंतरावर 20 ते 25 लोकवस्ती असलेलं पदहूर गाव  मिरगुडवंचा ग्रामपंचायत अंतर्गत या गावाचा समावेश आहे. गावात शंभर टक्के आदिवासी नागरिक राहतात. मात्र स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही येथील आदिवासींनी विकासाची वाट बघितलेली नाही. एकीकडे आधुनिकीकरणात थरावरथर अशा टोलेजंग इमारती शहरात उभ्या राहत आहेत. समुद्राच्या पाण्यातून रेल्वे धावणार आहे. तर दुसरीकडे मात्र गडचिरोलीच्या दुर्गम भागातील आदिवासी पक्क्या रस्त्याअभावी आजही नरक यातना सहन करत आहेत.

गरज नसलेल्या ठिकाणी पुलाचे बांधकाम-पदहूर गावातील आदिवासींना भामरागड येण्यासाठी पायवाटेत मोठा नाला पडतो. या नाल्यावर पूल नाही. त्यामुळे पाण्यातूनच नागरिकांना वाट काढावी लागते. आश्चर्याची बाब म्हणजे जिथे गरज नव्हती, अशा चार ते पाच ठिकाणी काही वर्षांपूर्वी पुलाचे (कालवट) बांधकाम करण्यात आले आहे. मात्र कच्चा रस्ताही नसल्याने या पुलाचा कोणताही उपयोग होत नाही.तर पुल बांधकाम नियोजन कोणासाठी लोकप्रतिनिधींचा जवळचा टेकेदारांना काम उपलब्ध करुन देण्याची उद्धेश सफल झाला मात्र गावकऱ्यांना जाण्या येण्यासाठी  वाहनांची वाहतूक तर दूरच आहे.नागरिक वाहतूक सुरु झाल्या पुर्वीच पुलाला सध्या मोठे भगदाड पडले आहे. तर वाहन चालणार का ? त्यामुळे विनाकारण बांधण्यात आलेल्या पुुलाच्या दर्जाची प्रचिती येते.

गावात पहिली ते चौथीपर्यंत जिल्हा परिषद शाळा, तीही करोनामुळे  बंद अवस्थेत आहे. दोन वर्षापूर्वी अंदाजे पाच लाख रुपये खर्च करून सौरऊर्जेवर चालणारी दुहेरी नळ योजना गावात सुरू करण्यात आली. नळयोजना सुरू झाल्याने पाण्याचा प्रश्न मिटेल, अशी आशा होती. मात्र एक वर्ष लोटत नाही  नळयोजना बंद पडली. आता दोन  वर्ष लोटली असून आजही नळयोजना बंद आहे. सदर योजनेचा उप करणे ह्या भंगार मध्ये जमा होणारच . याकडे ना ग्रामपंचायतीचे लक्ष, ना प्रशासनाचे. अशी दुहेरी नळ योजनेचा अवस्था दिसत आहे.

टॅग्स :Governmentसरकार