शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

भाषेत विद्यार्थी माघारले

By admin | Updated: September 24, 2016 02:58 IST

शिक्षण विभागाच्यावतीने दुसरी ते आठव्या वर्गातील विद्यार्थ्यांची पहिली पायाभूत चाचणी ९ व १० आॅगस्ट रोजी घेण्यात आली होती.

पायाभूत चाचणीचा निकाल : जिल्हा परिषदेच्या शाळांमधील वास्तवगडचिरोली : शिक्षण विभागाच्यावतीने दुसरी ते आठव्या वर्गातील विद्यार्थ्यांची पहिली पायाभूत चाचणी ९ व १० आॅगस्ट रोजी घेण्यात आली होती. या चाचणीचा जिल्हाभरातील विद्यार्थ्यांचा निकाल नुकताच संकलित झाला असून यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांचे विद्यार्थी गणिताच्या तुलनेत भाषा विषयामध्ये माघारले असल्याचे दिसून आले.प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत दुसरी ते आठव्या वर्गातील विद्यार्थ्यांची दरवर्षी तीन पायाभूत चाचण्या घेणे बंधनकारक करण्यात आले. या चाचण्यांच्या प्रश्नपत्रिका महाराष्ट्र शिक्षण परिषदेच्या मार्फत उपलब्ध करून दिल्या जातात. सदर चाचणीमध्ये भाषा व गणित या दोन विषयांचा समावेश करण्यात येतो. विशेष म्हणजे, सदर चाचणी प्रत्येक माध्यमाच्या, प्रत्येक संस्थेच्या शाळेला बंधनकारक करण्यात आली आहे.या चाचणीमध्ये विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या गुणानुक्रमे त्यांना श्रेणी दिली जाते. ८१ ते १०० गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘अ’ श्रेणी, ६१ ते ८० गुण प्राप्त करणाऱ्यांना ‘ब’ श्रेणी, ४१ ते ६० गुण प्राप्त करणाऱ्यांना ‘क’ श्रेणी व ४० पेक्षा कमी गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘ड’ श्रेणी दिली जाते. ‘अ’ श्रेणीमध्ये असलेले विद्यार्थी प्रगत मानले जातात. ‘ब’ श्रेणी प्राप्त झालेले विद्यार्थी सर्वसाधारण तर ‘क’ व ‘ड’ श्रेणी प्राप्त झालेले विद्यार्थी अप्रगत मानले जातात.जिल्हा परिषदेच्या एकूण जिल्हाभरात १ हजार ५५३ शाळाा आहेत. या शाळांमध्ये ६५ हजार २८६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या सर्वच विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी घेण्यात आली असता, भाषा विषयामध्ये केवळ ३१ शाळांमधील विद्यार्थी ‘अ’ श्रेणीत, ६२६ शाळांमधील विद्यार्थी ‘ब’ श्रेणीत, ८२३ शाळांमधील विद्यार्थी ‘क’ श्रेणीत तर ६७ शाळांमधील विद्यार्थी ‘ड’ श्रेणीत असल्याचे दिसून येते. गणित विषयामध्ये १४७ शाळांना ‘अ’ श्रेणी, ८२८ शाळांना ‘ब’ श्रेणी, ५८३ शाळांना ‘क’ श्रेणी तर ३४ शाळा ‘ड’ श्रेणीत असल्याचे दिसून येते. भाषा विषयापेक्षा गणित हा विषय कठीण मानला जात होता. त्यामुळे आजपर्यंत विद्यार्थी गणितामध्येच मागे पडत होते. मात्र यावर्षी पहिल्यांदाच गणिताच्या तुलनेत भाषा विषयात विद्यार्थी मागे असल्याचे दिसून येते. भाषा विषयात ‘अ’ श्रेणीत ३१ शाळा आहेत. तर गणित विषयात १४७ शाळा ‘अ’ श्रेणीत असल्याचे दिसून येते. त्यामुळे आता जिल्हाभरातील शिक्षकांना भाषा विषयाकडे अधिक लक्ष द्यावे लागणार आहे. (नगर प्रतिनिधी)ज्ञानरचनावादाने विद्यार्थी गणितात पुढेगणित हा विषय रटाळ असल्याने विद्यार्थी या विषयाकडे दुर्लक्ष करतात. जास्त वेळ त्यांची एकाग्रता टिकून राहत नाही. त्यामुळे या विषयामध्ये बहुतांश विद्यार्थी माघारत होते. मात्र नवीन शिक्षण पध्दतीनुसार गणित हा विषय विविध शैक्षणिक साहित्य, ज्ञानरचनावाद, शारीरिक हावभाव यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकविला जात आहे. त्यामुळे विद्यार्थी गणित हा विषय आवडीने शिकत आहेत. परिणामी विद्यार्थ्यांची गणितात प्रगती झाली आहे. भाषा विषयातही विद्यार्थ्यांची प्रगती सर्वसाधारण समाधानकारक असली तरी ऱ्हस्व, दीर्घ, उकार, वेलांटी, अगदी बरोबर असेल तरच तो शब्द बरोबर मानावा, असे निर्देश शिक्षण परिषदेच्या वतीने देण्यात आले आहेत. त्यानुसार शिक्षकांनी प्रश्नपत्रिका तपासल्या आहेत. पदवीधर झालेल्या मराठी वाङ्मयाच्या विद्यार्थ्याला बहुतांश शब्दातील ऱ्हस्व, दीर्घ कळत नाही तर दुसऱ्या ते आठव्या वर्गाच्या विद्यार्थ्यांना ते कसे कळणार. त्यामुळेच विद्यार्थी भाषेत माघारले आहेत.अप्रगत विद्यार्थ्यांसाठी विशेष वर्ग‘क’ व ‘ड’ श्रेणी जे विद्यार्थी आले आहेत. ते विद्यार्थी अप्रगत आहेत, असे मानले जाणार आहे. या विद्यार्थ्यांना किमान ‘ब’ श्रेणीत आणण्यासाठी शिक्षकांना विशेष परिश्रम घ्यावा लागणार आहे. या विद्यार्थ्यांवर शिक्षण विभागातील पर्यवेक्षीय यंत्रणेची विशेष नजर राहणार आहे. त्यामुळे सदर विद्यार्थी प्रगत करण्यासाठी शिक्षक सुध्दा विशेष प्रयत्न करतील, अशी अपेक्षा आहे.