शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमादरम्यान झाला गोळीबार  
3
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
4
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
5
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
6
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
7
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
8
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
9
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
10
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
11
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
12
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
13
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
14
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
15
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
16
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
17
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
18
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
19
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
20
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता

विद्यार्थ्यांना मिळणार शुद्ध व थंडगार पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 23:06 IST

राज्याच्या आदिवासी विकास विभागाकडून भारतीय संविधान २७५/१ योजनेअंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली कार्यालयाला कोट्यवधीचा निधी प्राप्त झाला आहे.

ठळक मुद्देगडचिरोली प्रकल्प : २४ शासकीय आश्रमशाळांमध्ये योजना मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्याच्या आदिवासी विकास विभागाकडून भारतीय संविधान २७५/१ योजनेअंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली कार्यालयाला कोट्यवधीचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून प्रकल्प कार्यालयाच्या वतीने कार्यवाही सुरू करण्यात आली असून प्रकल्पाअंतर्गत असलेल्या २४ आश्रमशाळांमध्ये पाणी शुद्धीकरण यंत्र बसविण्यात येणार आहे. काही शाळांमध्ये हे काम अंतिम टप्प्यात असून २०१८ या नवीन वर्षापासून सर्वच २४ शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना पिण्याचे शुद्ध व थंड पाणी मिळणार आहे.गडचिरोली प्रकल्पाआंतर्गत कारवाफा, सोडे, रांगी, पेंढरी, गोडलवाही, मुरूमगाव, येरमागड, कोरची, मसेली, रामगड, सोनसरी, अंगारा, घाटी, भाकरोंडी, कुरंडी माल, रेगडी, पोटेगाव, मार्र्कंडादेव, भाडभिडी, कोटगूल, गॅरापत्ती व गडचिरोली येथील इंग्रजी माध्यमाची शासकीय आश्रमशाळा अशा मिळून एकूण २४ शासकीय आश्रमशाळा आहेत. आदिवासी विकास विभागाच्या योजनेनुसार सर्वच २४ शासकीय आश्रमशाळांमध्ये जलशुद्धीकरण यंत्राची योजना मंजूर करण्यात आली आहे. प्रती आश्रमशाळा ५० हजार रूपयातून हे यंत्र बसविले जात आहे.गडचिरोली प्रकल्पातील आश्रमशाळांमध्ये इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतचे मिळून जवळपास १० हजार विद्यार्थी निवासी राहून शिक्षण घेत आहेत. आश्रमशाळांमध्ये बोअरवेल, हातपंप, विहीर आदी पाणीपुरवठ्याच्या सुविधा आहेत. विद्यार्थ्यांना गढूळ व दूषित पाण्यापासून जलजन्य आजार होऊ नये, यासाठी गडचिरोली प्रकल्प कार्यालयाअंतर्गत जलशुद्धीकरण यंत्र बसविण्याच्या योजनेचे नियोजन करण्यात आले. यासाठी प्रकल्प अधिकारी डॉ. विपीन ईटनकर व सहायक प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी पुढाकार घेऊन राज्याच्या आदिवासी विकास विभागाकडे पाठपुरावा केला. त्यानंतर डॉ. ईटनकर यांनी राज्य शासनाकडून आश्रमशाळा व वसतिगृहाच्या या सुविधांसाठी जवळपास अडीच कोटींचा निधी प्राप्त करून घेतला आहे.आश्रमशाळांमध्ये जलशुद्धीकरण यंत्र बसविण्याचे काम दर्जेदार व गुणवत्तापूर्ण व्हावे, यासाठी शासकीय यंत्रणेला हे काम सोपविण्यात आले आहे. डिसेंबर अखेर हे काम पूर्ण होणार असल्याने नवीन वर्षापासून आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना पिण्याचे शुद्ध व थंड पाणी मिळणार आहे.२१ वसतिगृहातयोजना कार्यान्वितगडचिरोली प्रकल्पाअंतर्गत नाविण्यपूर्ण (टीएसपी) योजनेअंतर्गत सर्वच २१ शासकीय वसतिगृहांमध्ये जलशुद्धीकरण यंत्र बसविण्यात आले आहे. यासाठी प्रत्येक वसतिगृहाला जवळपास ५० हजार रूपयांचा खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे वसतिगृहातील विद्यार्थ्यांना पिण्याचे शुद्ध व थंड पाणी मिळत आहे. या योजनेमुळे विद्यार्थी समाधानी आहेत.